शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

६०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिचा ठेंगा

By admin | Updated: January 24, 2016 00:51 IST

चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा आणि भटाळी या गावातील सुमारे ६०० प्रकल्पग्रस्त शेतकरी सध्या वेकोलिच्या बेमुर्वतपणाचा अनुभव घेत आहेत.

१५० कोटींचा मोबदला थकीत : नरेश पुगलियांनी दिला आंदोलनाचा इशाराचंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा आणि भटाळी या गावातील सुमारे ६०० प्रकल्पग्रस्त शेतकरी सध्या वेकोलिच्या बेमुर्वतपणाचा अनुभव घेत आहेत. या दोन्ही गावांमिळून एक हजार ८०० एकर शेतीचे मालक असलेले शेतकरी वेकोलिच्या नाठार भूमिकेमुळे हतबल झाले आहेत. दरम्यान, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढावू भूमिका घेतली असून शेतकऱ्यांना १५० कोटींहून अधिक सव्याज मोबदला आणि नोकरी न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत भटाळी आणि सिनाळा येथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. या संदर्भात माहिती देताना पुगलिया म्हणाले, भटाळी आणि सिनाळा येथील शेतकऱ्यांचा वेकोलिसोबत भूमी अधिग्रहणासाठी करार झाला आहे. या दोन्ही गावांमिळून अनुक्रमे ७०० आणि ११०० एकर शेतजमीन आहे. या शेतीची किंमत सुमारे दिडशे कोटी रूपये आहे. भटाळीतील शेतकऱ्यांसोबत १८ महिन्यांपूर्वी तर सिनाळातील शेतकऱ्यांसोबत वर्षभरापूर्वी वेकोलिने करार केला आहे. शासनाच्या धोरणानुसार, वेकोलिने प्रकल्पग्रस्तांना नोकरीची हमी दिली होती. करार करताना तत्परता दाखविणारे वेकोलिचे अधिकारी आता प्रत्यक्षात मोबदला देताना मात्र मागेपुढे पहात आहेत. प्रकल्पग्रस्त युवक नोकरीची वाट बघत आहेत. शेतीचा पुरेसा मोबदला न मिळाल्याने या शेतकऱ्यांचे खरेदी व्यवहारही अडले आहेत. अनेकांच्या तर इसाराची रक्कमही बुडाली आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवूनही न्याय मिळाल्याने हे शेतकरी आता हतबल झाले आहेत.दुसरीकडे नोकरीची प्रतीक्षा करीत युवकांचे वय वाढत जात आहे. वय झाले असतानाही बेरोजगार म्हणून वावरावे लागत असल्याने तेदेखील आता त्रस्त झाले आहेत.एवढ्या दिवसानंतरही मोबदला मिळाला नसल्याने आता वेकोलिने व्याजासह रक्कम द्यावी, अशी मागणी नरेश पुगलिया यांनी यावेळी केली. या शेतकऱ्यांच्या हालाखीच्या परिस्थितीला केवळ वेकोलि जबाबदार असून त्यांनी यावर तात्काळ मार्ग काढावा, अन्यथा विदर्भ किसान कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोळसामंत्री पीयूष गोयल, कांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण आदींना या शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)बागायती शेती दाखविली कोरडवाहूमागील १० ते १२ वर्षांंपासून बागायती शेती, फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची शेतजमीन कोरडवाहू दाखविण्याचा प्रताप वेकोलिने केला आहे. कमी मोबदला देणे हा त्यामागील उद्देश असल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे. अनेकांच्या शेतात बोअरवेल, विहिरी आहेत. संत्रा, चिक्कू, पेरू, फणस, लिंबांची झाडे आहेत. एकरी लाखो रूपयांचे उत्पन्न घेणारे शेतकरी वेकोलिच्या धोरणामुळे धास्तावले आहेत. मुकूंद आंबेकर, शरद राजणे यांच्यासह अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत. राज्य सरकारच्या निकषानुसार पुनर्वसानाचे धोरण राबवावे, अशी मागणी असली तरी नवे सरकार अन्यायच करत असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे.