शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

६०० प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिचा ठेंगा

By admin | Updated: January 24, 2016 00:51 IST

चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा आणि भटाळी या गावातील सुमारे ६०० प्रकल्पग्रस्त शेतकरी सध्या वेकोलिच्या बेमुर्वतपणाचा अनुभव घेत आहेत.

१५० कोटींचा मोबदला थकीत : नरेश पुगलियांनी दिला आंदोलनाचा इशाराचंद्रपूर : चंद्रपूर तालुक्यातील सिनाळा आणि भटाळी या गावातील सुमारे ६०० प्रकल्पग्रस्त शेतकरी सध्या वेकोलिच्या बेमुर्वतपणाचा अनुभव घेत आहेत. या दोन्ही गावांमिळून एक हजार ८०० एकर शेतीचे मालक असलेले शेतकरी वेकोलिच्या नाठार भूमिकेमुळे हतबल झाले आहेत. दरम्यान, माजी खासदार नरेश पुगलिया यांनी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढावू भूमिका घेतली असून शेतकऱ्यांना १५० कोटींहून अधिक सव्याज मोबदला आणि नोकरी न दिल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या एका पत्रकार परिषदेत भटाळी आणि सिनाळा येथील शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. या संदर्भात माहिती देताना पुगलिया म्हणाले, भटाळी आणि सिनाळा येथील शेतकऱ्यांचा वेकोलिसोबत भूमी अधिग्रहणासाठी करार झाला आहे. या दोन्ही गावांमिळून अनुक्रमे ७०० आणि ११०० एकर शेतजमीन आहे. या शेतीची किंमत सुमारे दिडशे कोटी रूपये आहे. भटाळीतील शेतकऱ्यांसोबत १८ महिन्यांपूर्वी तर सिनाळातील शेतकऱ्यांसोबत वर्षभरापूर्वी वेकोलिने करार केला आहे. शासनाच्या धोरणानुसार, वेकोलिने प्रकल्पग्रस्तांना नोकरीची हमी दिली होती. करार करताना तत्परता दाखविणारे वेकोलिचे अधिकारी आता प्रत्यक्षात मोबदला देताना मात्र मागेपुढे पहात आहेत. प्रकल्पग्रस्त युवक नोकरीची वाट बघत आहेत. शेतीचा पुरेसा मोबदला न मिळाल्याने या शेतकऱ्यांचे खरेदी व्यवहारही अडले आहेत. अनेकांच्या तर इसाराची रक्कमही बुडाली आहे. वेकोलि अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवूनही न्याय मिळाल्याने हे शेतकरी आता हतबल झाले आहेत.दुसरीकडे नोकरीची प्रतीक्षा करीत युवकांचे वय वाढत जात आहे. वय झाले असतानाही बेरोजगार म्हणून वावरावे लागत असल्याने तेदेखील आता त्रस्त झाले आहेत.एवढ्या दिवसानंतरही मोबदला मिळाला नसल्याने आता वेकोलिने व्याजासह रक्कम द्यावी, अशी मागणी नरेश पुगलिया यांनी यावेळी केली. या शेतकऱ्यांच्या हालाखीच्या परिस्थितीला केवळ वेकोलि जबाबदार असून त्यांनी यावर तात्काळ मार्ग काढावा, अन्यथा विदर्भ किसान कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.वेकोलि चंद्रपूर क्षेत्राचे मुख्य महाव्यवस्थापक आर.के. मिश्रा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोळसामंत्री पीयूष गोयल, कांग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण आदींना या शेतकऱ्यांनी निवेदन दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)बागायती शेती दाखविली कोरडवाहूमागील १० ते १२ वर्षांंपासून बागायती शेती, फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची शेतजमीन कोरडवाहू दाखविण्याचा प्रताप वेकोलिने केला आहे. कमी मोबदला देणे हा त्यामागील उद्देश असल्याचा आरोप या शेतकऱ्यांचा आहे. अनेकांच्या शेतात बोअरवेल, विहिरी आहेत. संत्रा, चिक्कू, पेरू, फणस, लिंबांची झाडे आहेत. एकरी लाखो रूपयांचे उत्पन्न घेणारे शेतकरी वेकोलिच्या धोरणामुळे धास्तावले आहेत. मुकूंद आंबेकर, शरद राजणे यांच्यासह अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत. राज्य सरकारच्या निकषानुसार पुनर्वसानाचे धोरण राबवावे, अशी मागणी असली तरी नवे सरकार अन्यायच करत असल्याचा या शेतकऱ्यांचा आरोप आहे.