शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

५८ दिवसांच्या आंदोलनाची फलश्रुती

By admin | Updated: March 10, 2016 01:15 IST

वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी पदभरतीत १०० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी....

विद्यार्थी जिंकले : राज्यभरातून आलेले विद्यार्थी स्वगावी रवानाचंद्रपूर : वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी पदभरतीत १०० टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी चंद्रपुरात येऊन आंदोलन छेडले. सलग ५० दिवस साखळी उपोषण व त्यानंतर आमरण उपोषण केले. यादरम्यान चार विद्यार्थ्यांची प्रकृतीही खालावली. तरीही विद्यार्थी मागे हटले नाही. अखेर उपोषणाच्या आठव्या दिवशी शासनाने त्यांना ठोस आश्वासन देऊन शासन निर्णयासाठी अवधी मागितल्यानंतर आंदोलन आज बुधवारी मागे घेण्यात आले. मागील ५८ दिवसांपासून निश्चल उभा असलेला त्यांचा उपोषण मंडप आज काढण्यात आला आणि राज्यभरातून आलेले हे आंदोलक विद्यार्थी आपापल्या गावी रवाना झाले.राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि डॉ. बा.सा.को. कृषी विद्यापीठ दापोली या दोन विद्यापिठांतर्गत प्रत्येकी एक असे एकूण दोन वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमाचे महाविद्यालये आहेत. यातील प्रत्येक महाविद्यालयावर महाराष्ट्र शासनाचा दोन कोटी रुपयांचा खर्च होतो. यासोबतच भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि भारतीय वानिकी अनुसंधान व शिक्षा परिषद देहरादून यांचेही वित्तीय सहाय्य महाविद्यालयांना मिळते. वनशास्त्र पदवी अभ्यासक्रमामध्ये ४९ वनासंबंधित विषयाचा सखोल अभ्यास केला जातो. एवढेच नाही तर वनविभागद्वारे वनकार्यानुभव (सहा महिने) आणि वनशास्त्र महाविद्यालयाद्वारे वनव्यवसायिक प्रशिक्षण (सहा महिने) दिले जाते. असे असतानाही वनशास्त्र पदवीधारकांना वनविभागातील सहायक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी या पदाच्या भरतीमध्ये केवळ पाच टक्के आरक्षण दिले जात आहे. त्यामुळे शासनाचा एवढा खर्च होऊन तयार झालेल्या विद्यार्थ्यांना बेरोजगार रहावे लागते. परिणामी या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना संबंधित पदभरतीत १०० टक्के जागा आरक्षित करून सरळ सेवा भरतीद्वारे नियुक्ती करावी, अशी मागणी करीत राज्यभरातील पदवीधारक विद्यार्थ्यांनी वनमंत्र्यांच्या चंद्रपूर शहरात आंदोलन उभे केले. १२ जानेवारीपासून येथील मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील परिसरात त्यांनी साखळी उपोषण सुरू केले. आंदोलनाची दखल घेतली जाईल, अशी आशा होती. मात्र तसे झाले नाही आणि साखळी उपोषण वाढत गेले. तब्बल ५० दिवस हे आंदोलन सुरूच होते. साखळी उपोषणाचे ५० दिवस पूर्ण झाल्यानंतरही शासन दखल घेत न नसल्याने या विद्यार्थ्यांनी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १ मार्चपासून रोहित लांबे, नागेश डोंगरे, अक्षय पवार, महेश काकडे, हरीश गजभिये, पंकज लोनकर आणि सद्दाम हुसेन संदे हे आठ विद्यार्थी बेमुदत उपोषणाला बसले. दरम्यान, पाचव्या दिवशी चार विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. सद्दाम हुसेन संदे या विद्यार्थ्याला तर दवाखान्यात दाखल करण्यात आले. आज बुधवारी आमरण उपोषणाचा आठवा दिवस होता. आंदोलन चिघळत जाण्याचे चिन्ह दिसू लागले होते. दरम्यान, शासनाने आंदोलनाची दखल घेत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मागितला. त्यामुळे आंदोलन तुर्तास मागे घेण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला. आज तहसीलदार गणेश शिंदे व प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)