शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

१५ रुपयाच्या मीटरला ५०० रुपयांचे बिल

By admin | Updated: July 16, 2015 01:25 IST

गोरगरिबांच्या अंधार असलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली राजीव गांधी विद्युतीकरण योजना

लाभार्थी त्रस्त : गरिबांच्या घरी अंधारातच अंधारपिंपळगाव : गोरगरिबांच्या अंधार असलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली राजीव गांधी विद्युतीकरण योजना हजारो लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. या योजनेत मिळालेल्या १५ रुपयाच्या मिटरला ५०० रुपयाचे बिल महिन्याकाठी येत असल्याने आता पोटाची खडगी भरावी की, वीज बिलाचा भरणा करावा, असा गंभीर प्रश्न अनेक गरीब कुटुंबीयांना पडला आहे.अवाजवी बिल येत असल्याने लाभार्थ्यांना बील भरणे कठीण जात आहे. त्यामुळे महावितरण वीज कापणार असल्याने गरिबांना पुन्हा अंधारात जीवन काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही योजना गरिबांना ‘चार आण्याची कोंबडी अन् बारआण्याचा मसाला’ अशीच ठरली आहे.गोरगरिबांच्या अंधार पसरलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी मोठा गाजावाजा करुन शासनाने राजीव गांधी विद्युतीकरण योजना सुरु केली. १५ रुपयात गरीबाच्या खोलीत विजेचा लख प्रकाश पसरावा म्हणून ही योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यातील हजारो गरिबांनी या योजनेचा लाभ घेवून आपल्या घरात विजेचा लख प्रकाश पडला. परंतु यातील किती लाभार्थी खरे व किती खोटे हा संशोधनाचा विषय ठरला. मात्रा अवाजवी बिलामुळे ही योजना आता डोकेदुखी ठरली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १५ रुपयात मीटर विजेची जोडणी व चार व्हॅटचा एक सीएफएल दिवा देण्यात आला होता. शिवाय एक ते तीन युनिट पर्यंत बिलात सवलत देण्यात आली होती. परंतु ३० युनिटच्या वर वापर केल्यास लाभार्थ्यांना सर्वसामान्य ग्राहकासारखा बिल लावण्यात येईल असे निकष ठेवण्यात आले. वास्तविक पाहता आज विज्ञान युगात कितीही गरीब असला तरी त्याच्या घरात टीव्ही व फॅन या सारख्या चैनीच्या वस्तू असतात. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांचे युनिट ३० च्या वर जात आहेत. त्यामुळे काही लाभार्थ्यांना तर ५०० रुपयावर बिल येत आहे. हे वाढीव बिल पाहूण गरीब लाभार्थ्यांच्या मनात धडकी भरत असून कितीही तक्रारी करुन काहीच त्यांच्यावर मार्ग निघत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. कर्मचारी मात्र निकष दाखवून त्यांची बोळवण करीत आहेत. या बिलामुळे पोटाची खडगी भरावी की वीज बिल भरावे असा गंभीर प्रश्न गरीब लाभार्थ्यांसमोर टाकला आहे. वीज बिलाचा भरणा न केल्यास कनेक्शन कापल्या जाईल या भीतीने अनेक लाभार्थी नाईलाजास्तव पोटाचा चिमटा घेऊन वीज कंपनीची तिजोरी भरीत आहे. गोरगरिबांच्या हितासाठी योजनेचे निकष शिथिल करुन वापराच्या युनिटमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. (वार्ताहर) सामान्य ग्राहकांनाही फटकावीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सामान्य ग्राहकांनाही फटका सहन करावा लागत आहे. अनेक ग्राहकांचा वापर नसतानाही अवाजवी वीज बिल पाठविले जात असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यामुळे वीज वितरणच्या कारभाराप्रति तिव्र असंतोष पसरला असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.