शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

१५ रुपयाच्या मीटरला ५०० रुपयांचे बिल

By admin | Updated: July 16, 2015 01:25 IST

गोरगरिबांच्या अंधार असलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली राजीव गांधी विद्युतीकरण योजना

लाभार्थी त्रस्त : गरिबांच्या घरी अंधारातच अंधारपिंपळगाव : गोरगरिबांच्या अंधार असलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी शासनाच्या वतीने सुरु करण्यात आलेली राजीव गांधी विद्युतीकरण योजना हजारो लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. या योजनेत मिळालेल्या १५ रुपयाच्या मिटरला ५०० रुपयाचे बिल महिन्याकाठी येत असल्याने आता पोटाची खडगी भरावी की, वीज बिलाचा भरणा करावा, असा गंभीर प्रश्न अनेक गरीब कुटुंबीयांना पडला आहे.अवाजवी बिल येत असल्याने लाभार्थ्यांना बील भरणे कठीण जात आहे. त्यामुळे महावितरण वीज कापणार असल्याने गरिबांना पुन्हा अंधारात जीवन काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही योजना गरिबांना ‘चार आण्याची कोंबडी अन् बारआण्याचा मसाला’ अशीच ठरली आहे.गोरगरिबांच्या अंधार पसरलेल्या घरात उजेड पडावा, यासाठी मोठा गाजावाजा करुन शासनाने राजीव गांधी विद्युतीकरण योजना सुरु केली. १५ रुपयात गरीबाच्या खोलीत विजेचा लख प्रकाश पसरावा म्हणून ही योजना कार्यान्वित केली. जिल्ह्यातील हजारो गरिबांनी या योजनेचा लाभ घेवून आपल्या घरात विजेचा लख प्रकाश पडला. परंतु यातील किती लाभार्थी खरे व किती खोटे हा संशोधनाचा विषय ठरला. मात्रा अवाजवी बिलामुळे ही योजना आता डोकेदुखी ठरली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १५ रुपयात मीटर विजेची जोडणी व चार व्हॅटचा एक सीएफएल दिवा देण्यात आला होता. शिवाय एक ते तीन युनिट पर्यंत बिलात सवलत देण्यात आली होती. परंतु ३० युनिटच्या वर वापर केल्यास लाभार्थ्यांना सर्वसामान्य ग्राहकासारखा बिल लावण्यात येईल असे निकष ठेवण्यात आले. वास्तविक पाहता आज विज्ञान युगात कितीही गरीब असला तरी त्याच्या घरात टीव्ही व फॅन या सारख्या चैनीच्या वस्तू असतात. त्यामुळे हजारो लाभार्थ्यांचे युनिट ३० च्या वर जात आहेत. त्यामुळे काही लाभार्थ्यांना तर ५०० रुपयावर बिल येत आहे. हे वाढीव बिल पाहूण गरीब लाभार्थ्यांच्या मनात धडकी भरत असून कितीही तक्रारी करुन काहीच त्यांच्यावर मार्ग निघत नसल्याने लाभार्थी त्रस्त झाले आहेत. कर्मचारी मात्र निकष दाखवून त्यांची बोळवण करीत आहेत. या बिलामुळे पोटाची खडगी भरावी की वीज बिल भरावे असा गंभीर प्रश्न गरीब लाभार्थ्यांसमोर टाकला आहे. वीज बिलाचा भरणा न केल्यास कनेक्शन कापल्या जाईल या भीतीने अनेक लाभार्थी नाईलाजास्तव पोटाचा चिमटा घेऊन वीज कंपनीची तिजोरी भरीत आहे. गोरगरिबांच्या हितासाठी योजनेचे निकष शिथिल करुन वापराच्या युनिटमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. (वार्ताहर) सामान्य ग्राहकांनाही फटकावीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे सामान्य ग्राहकांनाही फटका सहन करावा लागत आहे. अनेक ग्राहकांचा वापर नसतानाही अवाजवी वीज बिल पाठविले जात असल्याने ग्राहक त्रस्त आहेत. त्यामुळे वीज वितरणच्या कारभाराप्रति तिव्र असंतोष पसरला असून याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.