शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

४६७ कामगारांच्या आयुष्यातील ‘ते’ ३६५ दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2016 05:20 IST

एक चांगलं आयुष्य जगण्याची आस घेवून बरांज कोळसा खाणीत नोकरीला लागलो. तांत्रिक कारणामुळे कोळसा खाण बंद झाली.

सचिन सरपटवार ल्ल भद्रावतीएक चांगलं आयुष्य जगण्याची आस घेवून बरांज कोळसा खाणीत नोकरीला लागलो. तांत्रिक कारणामुळे कोळसा खाण बंद झाली. आमचे पगार बंद झाले. राहात असलेल्या क्वॉर्टरमधील वीज अन् पाण्याचे कनेक्शन कापण्यात आले. पैशाची अडचण भासू लागली. उदरनिर्वाह कसा करावा, हे समजेनासे झाले. घरातील वस्तू विकाव्या लागल्या. दुध बंद केले. पोरांच्या शाळा बंद झाल्या. ठेल्यावर मुंगफल्ली विकणे सुरू केले. दारोदारी कपडे विकू लागलो. शेतमजुरीच्या कामाला जावू लागलो. गाव सोडण्याचा विचार डोक्यात येवू लागला. अनेक आंदोलने केलीत उपयोग झाला नाही. आयुष्याचाच कोळसा होतो की काय याची भिती वाटू लागली. आयुष्यात स्वप्न पाहली होती. पण आज कंपनीच्या धोरणामुळे कुठे आयुष्य गेलं, असे म्हणण्याची वेळ आली. या भावना आहेत. त्या ४६७ कामगारांच्या, ज्यांचा ३६५ पेक्षा अधिक दिवस होवूनही पगार बंद आहे. या ३६५ दिवसांत प्रत्येक दिवशी त्यांनी मरणयातना भोगल्या.बरांज (भो) स्थित कर्नाटका एम्टाची खुली कोळसा खाण गेल्या १ एप्रिल २०१५ पासून बंद आहे. आज एक वर्षे झाले. प्रशासकीयस्तरावर बैठका झाल्या. आश्वासने दिलीत. परंतु काहीही उपयोग झाला नाही. मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा झाली. पण त्याचे अजुनही काही फलीत निघाले नाही.या वर्षभरात आपल्या न्याय मागण्यासाठी प्रकल्पग्रस्त कामगारांनी विविध आंदोलन केलीत. सर्वात प्रथम टॉवरवर चढून आंदोलन करण्यात आले. नंतर चंद्रपूरपर्यंत पायदळ यात्रा, भिक मांगो आंदोलन व दहा दिवसांचे जेल भरो आंदोलन प्रकल्पग्रस्त राजू डोंगे यांच्या नेतृत्वात कामगारांनी केली. तरीही प्रशासनाचे डोळे उघडले नाही. या सर्वच आंदोलनात रामा मत्ते, रवींद्र डोंगे, निलेश रामटेके, प्रभाकर कुळमेथे, संदीप घुगुल, पांडूरंग सातपुते, मोहन दरेकर, दिनेश वानखेडे, अरविंद देवगडेव अन्य कामगारांचा सहभाग होता. शेतजमिनही गेली व पगारही नाही अशा बिकट संकटात आज हे कामगार सापडले आहेत.सध्या सदर खाण पुन्हा सुरू होण्याच्या हालचाली दिसत आहे. परंतु जोपर्यंत केपीसीएलच्या आस्थापनेवर होणार नाही तोपर्यंत खाणीचे काम सुरू करू नका अशी राजू टोंगे यांची मागणी आहे.