शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

४,६१९ शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2022 05:00 IST

निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका नित्याची बाब झाली आहे. तरी या तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या  गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आसोला मेंढा प्रकल्प व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांश भागातील धान लागवडीखालील क्षेत्रात यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळाले. सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत होते.

दिलीप फुलबांधेलोकमत न्यूज नेटवर्कगेवरा:  सावली तालुक्यातील खरीप २०२१ या वर्षीच्या धान उत्पादक शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील धान पिकाचे  कापणीपूर्व व कापणीनंतर अवकाळीच्या अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर  शासन व जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन संबंधित यंत्रणेमार्फत पंचनामे करण्यात आले होते. यातील चार हजार ६१९ शेतकऱ्यांना आता पीक विम्याची प्रतीक्षा आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना बसणारा फटका नित्याची बाब झाली आहे. तरी या तालुक्याला सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या  गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पात समाविष्ट करण्यात आलेल्या आसोला मेंढा प्रकल्प व उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रातील बहुतांश भागातील धान लागवडीखालील क्षेत्रात यावर्षी सिंचनासाठी पाणी मिळाले. सर्वत्र शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत होते.धान पीक हातात आलेले असतानाच कापणी बांधणीदरम्यान अनेकदा अतिवृष्टी होऊन धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले. काही भागातील धानाच्या सरड्या वाहून गेल्या. प्रचंड मनस्ताप सहन करीत तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला होता. शासन व  विमा कंपन्यांनी शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे व सर्वेक्षण केले.जिल्हा प्रशासनासह राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे,मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. शासकीय सर्व सोपस्कार आटोपले असले तरी शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेतच आहेत.खरीप २०२१-२२ या वर्षात सावली तालुक्यातील २८ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी २३ हजार ९५८ हेक्टरवर भात पिकाची लागवड केली होती,यापैकी चार ६१९ एवढ्या भात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. या शेतकऱ्यांना आता विम्याची रक्कम हवी आहे.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमा