शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
3
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
4
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
5
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
6
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
7
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
8
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
9
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
10
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
11
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
12
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
13
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
14
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
15
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
16
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
17
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
18
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
19
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
20
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
Daily Top 2Weekly Top 5

४५५ पोलीस कर्मचाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 23:48 IST

निर्धारीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ४५५ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोमवारी काढले. यामध्ये ३५८ सर्वसाधारण व ९७ विनंती बदल्यांचा समावेश आहे. बदलीपात्र कर्मचाºयांना ३१ मे पूर्वी बदलीच्या ठिकाणी रवाना करणयाबाबतचे आदेशही संबंधित ठाणेदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांचा आदेश : ३१ मे पर्यंत रुजू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : निर्धारीत कार्यकाळ पूर्ण झालेल्या व बदलीसाठी विनंती अर्ज केलेल्या जिल्ह्यातील ४५५ पोलीस कर्मचाºयांच्या बदल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी सोमवारी काढले. यामध्ये ३५८ सर्वसाधारण व ९७ विनंती बदल्यांचा समावेश आहे. बदलीपात्र कर्मचाऱ्यांना ३१ मे पूर्वी बदलीच्या ठिकाणी रवाना करणयाबाबतचे आदेशही संबंधित ठाणेदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी दिले आहेत.मुंबई पोलीस मॅन्युअल-१९५९, भाग १ मधील नियम १६६ (५) महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कामकाज पार पाडताना होणाºया विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५, महाराष्ट्र शासनाचे पोलीस अधिनियम यात आणखी सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्या बदल्यांबाबत निर्गमित केलेल्या अद्यादेश सन २०१५ चे महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक दोन नुसार जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाच्या मान्यतेनुसार व निर्णयानुसार ज्या कर्मचाºयांची नेमणुकीच्या ठिकाणी खंडीत अथवा अखंडित पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा झाल्याने प्रशासकीय कारणास्तव या सर्वसाधारण बदल्या करण्यात आल्या. तर ९७ कर्मचाऱ्यांच्या विनंती अर्जानुसार सदर बदल्या करण्यात आल्या.यामध्ये सर्वसाधारण गटातून २९ सहाय्यक फौजदार, १२४ पोलीस हवालदार, १०६ नायब पोलीस शिपाई, ९९ पोलीस शिपाई, तर विनंती अर्जानुसार तीन सहाय्यक फौजदार, १७ पोलीस हवालदार, १७ नायब पोलीस शिपाई, ६० पोलीस शिपाई आदींच्या बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर यांनी केल्या आहेत.ठाणेदार शिरस्कर यांची बदलीमहाराष्ट्र पोलीस कायदा कलम २२ अन्वये पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ यांनी विहित कालावधी पूर्ण केलेल्या पोलीस निरिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये बल्लारपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप शिरस्कर यांची अमरावती ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे. तर गोंदिया येथील अशोक तिवारी व नागपूर येथील दीपक खोब्रागडे यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे.