शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

एटीएम कोड मागून ४२ हजारांनी फसवणूक

By admin | Updated: May 18, 2017 01:12 IST

सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्या व कर्जमाफी हा विषय ऐरणीवर असताना कोणीही शेतकऱ्यांना आधार देण्यास तयार नाही.

शेतकऱ्याला फटका : कापूस विकून बँकेत टाकले होते पैसे लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : सध्या राज्यामध्ये शेतकऱ्यांचा आत्महत्या व कर्जमाफी हा विषय ऐरणीवर असताना कोणीही शेतकऱ्यांना आधार देण्यास तयार नाही. अशा परिस्थिती शेतात वर्षभर राबून परिश्रमातून आपल्या वर्षभर आपले घर चालेल इतकी रक्कम जमा करून बँकेत ठेवली. परंतु या शेतकऱ्याला ‘तुमचे ए.टी. एम. बंद झाले आहे’, असे फोनवरून सांगून एका भामट्याने त्याच्या बँक खात्यातून चक्क ४२ हजार रुपये लंपास केल्याचे बुधवारी उघडकीस आले. भद्रावती तालुक्यातील कारेगाव येथील नरेश कमलाकर लभाने (४०) यांचे वरोरा येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या बचत खाते आहे. त्यांच्याकडे बँकेचे एटीएमहीे आहे. ते बुधवारी हा काही कामानिमित्त भद्रावती येथे गेले होते. आपले काम आटोपल्यावर ते वरोरा येथे राहत असलेल्या बहिणीकडे जाण्यास एसटीमध्ये बसताच त्यांना एक अनोळखी क्रमांकावरून फोन आला. ‘मी मुंबई येथील कार्यालयातून बोलत असून तुमच्याकडे असणारे एटीएम बंद झाले आहे’, असे तो सांगू लागला. त्यावर नरेश लभाने यांनी ते सुरू करून देण्यास सांगितले. तेव्हा त्याला एटीएम काढून आधी त्यावरील अंक आणि पैशाबाबत विचारणा केली. या भोळ्या शेतकऱ्याने त्याला सर्वच सांगितले. ही सर्व प्रक्रिया झाल्यावर ‘तुमच्या मोबाईलवर एक एस. एम. एस. येईल. तो मला सांगायचा आणि लगेच तुमचे एटीएम सुरु होईल’, अशी बतावणी केली. त्यानंतर लभाने यांना चार वेळा थोडे-थोडे करीत ४२ हजार रुपयांनी गंडविण्यात आले. काही वेळानंतर लभाने यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी वरोरा येथील स्टेट बँक गाठली. तेथे एटीएम ब्लॉक केले. त्यानंतर वरोरा पोलीस ठाण्यात या फसवणुकीची तक्रार दाखल केली. शेतकऱ्यांना डिजिटल सेवेबद्दल जागृतीची गरज केंद्र सरकारने जुन्या ५०० व १०००च्या नोटा बंद केल्या आहेत. पंतप्रधान यांनी जनतेला आॅनलाईन व्यवहार करण्यावर भर देण्यास सांगितले आहे. पण पाहिजे तेवढी संगणक साक्षरता नसल्याने आणि शासनाने जागृती न केल्याने नरेश लभाने यांच्यासारखे अनेक शेतकरी हॅकर्सच्या बतावणीला बळी पडत आहेत.