शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

डोस संपल्याने जिल्हाभरातील ४०० लसीकरण केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:18 IST

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ४१३ केंद्रे तयार केली. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही ४० पेक्षा जास्त केंद्रे सुरू आहेत. मात्र, ...

कोरोना लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाने ४१३ केंद्रे तयार केली. चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही ४० पेक्षा जास्त केंद्रे सुरू आहेत. मात्र, पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. दुसरा डोस घेणाऱ्या ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना कालावधी पूर्ण होऊनही लस मिळत नसल्याने शहरातील केंद्रांवर भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. लस घेण्यासाठी केंद्रासमोर युवक-युवतीही गर्दी करीत आहेत. पण, काही उपयोग नसल्याचे पाहून घरी परत जात आहेत. चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील केंद्रांत आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील ५५ हजार ५३८ जणांचे लसीकरण झाले. अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. पुरेसे डोस मिळत नसल्याने केंद्रे बंद राहतात. प्रत्येक केंद्राला ८० ते १०० डोस मिळत आहेत. त्यामुळे ४५ व ६० वर्षांवरील नागरिकांना लस मिळणे कठीण झाले.

कुपन घेऊनही अनेकांचा हिरमोड

आरोग्य विभागाकडून लस मिळाल्यानंतर सकाळी दहा वाजता लसीकरणाला सुरुवात होते. नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी चंद्रपूर मनपाने कुपन पद्धत सुरू केली. केंद्रात जेवढे डोस आले तेवढीच कुपन आधी वितरण केली जातात. नागरिक पहिल्यांदा कुपनसाठी रांगा लावतात. बऱ्याचदा केंद्रात लस किती उपलब्ध आहे, हे आरोग्य पथकाकडून सांगितले जात नाही. पण, कुपन वाटणे सुरूच असते. त्यामुळे केंद्रात १०० लस उपलब्ध असताना २०० ते २५० नागरिक केवळ कुपनसाठी रांग लागतात. कुपन घेऊनही लस मिळत नाही, अशी चंद्रपुरातील स्थिती आहे.

ज्येष्ठ नागरिकांना मन:स्ताप

६० वर्षांवरील नागरिकांना लस घेण्यासाठी उपलब्ध डोसनुसार चंद्रपूर मनपा क्षेत्रात तीन किंवा चार केंद्रे सुरू असतात. त्यातही आता १८ ते ४४ गटासाठीच तीन केंद्रे सुरू आहेत. परंतु, जास्त डोस मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना निराश होऊन घरी परत जावे लागते. १८ वर्षांवरील तरूणाईसाठी लसीकरण मोहीम सुरू झाली. पण, एकाही केंद्रावर १०० पेक्षा जास्त डोस उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे युवक-युवतींचा हिरमोड होत आहे. ऑनलाईन नोंदणी करूनही लसीकरणासाठी चकरा माराव्या लागतात.

लस वितरण करताना आरोग्य विभागाची त्रेधातिरपीट

दोन आठवड्यांपूर्वी जिल्ह्याला केवळ ८ हजार डोस मिळाले होते. त्यामुळे केंद्रांना डोस वितरण करताना

जिल्हा परिषद आरोग्य विभागाची त्रेधातिरपीट उडाली होती. विभागीय आरोग्य संचालक कार्यालयातून किती डोस मिळणार याची जिल्हा आरोग्य यंत्रणेला काहीच माहिती नसते. लसीकरण सुरू झाल्यापासून ही समस्या कायम आहे. मागील आठवड्यात २२ हजार ५०० डोस मिळाल्याने सर्वच केंद्रांवरून लसीकरण सुरू झाले. गुरुवारी डोस संपल्याने ही केंद्रे पुन्हा बंद ठेवण्यात येणार आहेत.

कोट

तीन दिवसांपासून केंद्रात जात आहे. लस कोणत्या केंद्रावर उपलब्ध आहे, याची माहिती मिळायला सकाळी नऊ वाजतात. माहिती घेऊन संबंधित केंद्रावर गेल्यास आधीच कुपन घेण्यासाठी मोठी रांग दिसून येते. त्यामुळे मला पहिला डोस घेता आला नाही. कुटुंबातील आणखी दोन सदस्य लसीकरणापासून वंचित आहेत.

-श्रीकांत चापले, बालाजी बार्ड, चंद्रपूर

कोट

बाबूपेठ येथील केंद्रात मी पहिला डोस घेतला. दुसरा डोस घेण्यासाठी तीन दिवसांपासून चकरा मारत आहे. कुपन घेऊनही लस मिळाली नाही. त्यामुळे केंद्रातून घरी परत आले. हा प्रकार चार दिवसांपासून घडत आहे. ही समस्या सोडविली पाहिजे.

-स्मिता गाडे, बाबूपेठ, चंद्रपूर