शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

४० टक्के नागरिकांना ट्युबवेलचे पाणी

By admin | Updated: December 27, 2014 01:23 IST

वरोरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. १९७२ च्या लोकसंख्येनुसार पालिकेने पाणीपुरवठा योजना कर्यान्वित करुन नदीचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करुन दिले.

प्रवीण खिरटकर वरोरावरोरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. १९७२ च्या लोकसंख्येनुसार पालिकेने पाणीपुरवठा योजना कर्यान्वित करुन नदीचे शुद्ध पाणी नागरिकांना उपलब्ध करुन दिले. या योजनेला आता ४२ लोटले असून आतापर्यंत या योजनेत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे शहरातील ४० टक्के नागरिक आजही ट्युबवेलचे अशुद्ध पाणी पीत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.वरोरा शहरातील १९७२ या वर्षातील लोकसंख्या वीस हजारापर्यंत होती. त्यावर आधारीत पालिकेने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. शुद्ध पाणी मिळावे याकरिता वरोरा शहरानगजीकच्या तुळाना रस्त्यालगत त्यावेळी जलशुद्धीकरण यंत्र बसवून वर्धा नदीतून तुळाना गावानजीकच्या पात्रातून जलशुद्धीकरणात पाणी आणण्यात येते. याकरिता नदीच्या पात्रावर पंप लावून व उपजिल्हा रुग्णालयानजीक तसेच सावरकर चौकात पाण्याची टाकी उभारण्यात आली. मात्र, सावरकर चौकातील पाण्याची टाकी जीर्ण झाल्याने त्यात पाणी साठविणे मागील काही वर्षापासून बंद करण्यात आले आहे. सध्या नव्याने बांधण्यात आलेल्या वणी नाका व उपजिल्हा रुग्णालया नजीकच्या पाण्याच्या टाक्यामध्ये शुद्ध केलेले पाणी साठवून नागरिकांना नळाद्वारे दिले जाते. आज या बाबींना ४२ वर्षाचा कालावधी लोटला आहे. आजच्या स्थितीत वरोरा शहराची लोकसंख्या ६० हजारपेक्षा अधिक आहे. मात्र, या नागरिकांना नदीचे शुद्ध पाणी मिळत नाही. पाणी अपुरे पडत असल्याने नागरिकांना नळाद्वारे पाणी मिळावे याकरिता अनेक ठिकाणी ट्युबवेल तयार करुन नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. ट्युबवेलमधून निघणारे पाणी शुद्ध करण्याची कुठलीही यंत्रना पालिकेजवळ नसल्याचे आजही वरोरा शहरातील ४० टक्के नागरीक ट्युबवेलचे अशुद्ध पाणी मागील कित्येक वर्षापासून पीत आहेत. १९७२ मध्ये सुरु झालेल्या न.प. पाणीपुरवठा योजनेचा कालावधी १९९७ मध्ये पूर्ण झाल्याने न.प. प्रशासनाने वरोरा शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव पाठवविला. मात्र, १४ वर्षाचा कालावधी लोटूनही पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आलेली नाही.