शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या ३९ सुरक्षारक्षकांना कामावरून काढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST

वरोरा : वरोरा औद्योगिक परिसराच्या क्षेत्रात असलेल्या साई वर्धा पाॅवर कंपनीत कार्यरत तब्बल ३९ सुरक्षारक्षकांना गुरुवारपासून कामावरून कमी केल्यामुळे ...

वरोरा : वरोरा औद्योगिक परिसराच्या क्षेत्रात असलेल्या साई वर्धा पाॅवर कंपनीत कार्यरत तब्बल ३९ सुरक्षारक्षकांना गुरुवारपासून कामावरून कमी केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळले आहे.

वरोरा परिसरातील बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, याकरिता एमआयडीसी परिसरात दोन मोठ्या वीज कंपन्यांना परवानगी देण्यात आली. तेथे हजारो मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. साई वर्धा पाॅवर कंपनी या वीज वितरण कंपनीमध्ये सुरक्षा पुरविण्याचे कंत्राट अभिजित सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीला देण्यात आले होते. मध्यंतरीच्या काळात सदर कंपनी एनसीएलटीच्या ताब्यात गेली आणि वर्धा पाॅवर कंपनीचे हस्तांतरण साई वर्धा पाॅवर कंपनीला करण्यात आले. यामध्ये अनेक कंत्राटदारांचे पैसे थकीत असून अभिजित सिक्युरिटी सर्व्हिसेस या कंपनीचेही पैसे थकीत असल्याची माहिती समोर आली आहे.

या सुरक्षा कंपनीत ३९ सुरक्षारक्षक हे स्थानिक असून त्यांची उपजीविका त्यांच्या नोकरीवर अवलंबून आहे. मात्र कंपनीने नवीन सुरक्षा एजन्सीला हे काम दिल्यामुळे हे सर्व ३९ सुरक्षारक्षक १ जुलैपासून कमी करण्यात आले. नवीन कंपनीत आम्हाला सामावून घ्या आणि थकीत वेतन द्या या मागण्या सुरक्षारक्षकांनी कंपनीच्या व्यवस्थापनाकडे केल्या, मात्र त्याचा काहीही उपयोग न झाल्यामुळे गुरुवारपासून या सर्व सुरक्षारक्षकांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढवले आहे.

कोट

सर्व सुरक्षारक्षक हे स्थानिक आहेत. मागील दोन महिन्यांपासून त्यांना वेतन अदा करण्यात आले नाही. कंपनीने थकीत वेतन देण्यास नकार दिला आणि आता हे कंत्राट संपल्यामुळे सर्व सुरक्षारक्षकांना कामावरून कमी केले आहे.

- नंदकिशोर गव्हाणकर, व्यवस्थापक अभिजित कंपनी

कोट

अभिजित कंपनीचे कंत्राट ३० जूनला संपुष्टात आले आहे. शासकीय कंपनीला नवीन सुरक्षारक्षकांचे काम देण्यात आले आहे. जुन्या सुरक्षारक्षकांच्या रोजगाराची जबाबदारी अभिजित या कंपनीकडे असून त्यांची कोणतीही जुनी थकबाकी नाही.

- ज्ञानेश माटे, व्यवस्थापक, साई वर्धा पाॅवर कंपनी

आता कामावरून कमी केलेल्या स्थानिक सुरक्षारक्षकांना जर नवीन ठिकाणी रोजगार मिळाला नाही तर त्यांचे कुटुंब उघड्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.