शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

चंद्रपूर जिल्ह्यात ३५ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचताही येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:48 IST

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेतली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या गुणवत्ता चाचणीचा धक्कादायक निष्कर्ष

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने (डीआयईसीपीडी) चंद्रपूर जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १ हजार ६१४ शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेण्यात आली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी म्हणून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) मागील चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. अध्यापन, अध्ययन, बदलते अभ्यासक्रम आणि ज्ञान संरचनावादी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता व बौद्धीक दर्जा तपासणीचे अनेक प्रयोग सुरू आहेत. संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १ हजार ६१४ शाळांमधील १ लाख ७ हजार ५२८ विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. यापैकी ९८.९० टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते. भाषा विषयात उतारा वाचन, स्वरचिन्हांसह शब्दवाचन, स्वरचिन्ह विरहित शब्दवाचन तसेच प्रारंभिक असे चार स्तर करण्यात आले. यानुसार दुसरी ते चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ६४.३९ टक्के विद्यार्थ्यांना उताऱ्याचे वाचन करता आले. जिवती व पोंभुर्णा तालुका सर्वात मागे असून ब्रह्मपुरी (६४.४६) व मूल (७२.०३), तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. जिवती ३६.३६ टक्के व पोंभुर्णा तालुक्यातील ५०.०७ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन करता आले. सावली, बल्लारपूर, राजुरा, कोरपना तालुक्याची टक्केवारी ५१ ते ६० दरम्यान आहे. चंद्रपूर, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, वरोरा, भद्रावती तालुक्याची टक्केवारी ६१ ते ७० आहे. मागील वर्षाच्या मराठी भाषा उतारा वाचनाची टक्केवारी ८२.५६ होती. यंदाच्या शैक्षणिक सत्रात ६४.३९ टक्के आढळली. तुलनात्मकदृष्ट्या ही तफावत १८.१७ टक्के आहे. त्यामुळे मागील वर्षी उतारा वाचन करण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १८.१७ टक्के विद्यार्थी मागे कसे पडले, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

शिक्षकांनीच घेतली चाचणीच्संस्थेच्या निर्देशानुसार चाचणी घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य वर्गशिक्षकांनाच दिले होते. मात्र, मराठी विषयाच्या वाचनात ३५.६१ टक्के विद्यार्थी मागे पडले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षकांवरच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

गणितातही पिछाडीच्गणित विषयाची सहा स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली. गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, संख्याज्ञान या टप्प्यांमध्ये भागाकार हा पहिला टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, इयत्ता चौथी ते आठवीतील ३६.८५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकारच करता येत नसल्याचे चाचणीतून उघड झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १९.७६ टक्क्यांची तफावत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र