शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

चंद्रपूर जिल्ह्यात ३५ टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचताही येत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 10:48 IST

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेतली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या गुणवत्ता चाचणीचा धक्कादायक निष्कर्ष

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने (डीआयईसीपीडी) चंद्रपूर जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १ हजार ६१४ शाळांमधील इयत्ता दुसरी ते आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची भाषा व गणित विषयाच्या अध्ययनस्तराची जुलै २००८ मध्ये चाचणी घेण्यात आली होती. यानुसार ३५.६१ टक्के विद्यार्थ्यांना मराठी उताऱ्याचे वाचनच करता येत नसल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी म्हणून जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था (डीआयईसीपीडी) मागील चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. अध्यापन, अध्ययन, बदलते अभ्यासक्रम आणि ज्ञान संरचनावादी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता व बौद्धीक दर्जा तपासणीचे अनेक प्रयोग सुरू आहेत. संस्थेने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १ हजार ६१४ शाळांमधील १ लाख ७ हजार ५२८ विद्यार्थ्यांची चाचणी घेतली. यापैकी ९८.९० टक्के विद्यार्थी परीक्षेला बसले होते. भाषा विषयात उतारा वाचन, स्वरचिन्हांसह शब्दवाचन, स्वरचिन्ह विरहित शब्दवाचन तसेच प्रारंभिक असे चार स्तर करण्यात आले. यानुसार दुसरी ते चौथीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ६४.३९ टक्के विद्यार्थ्यांना उताऱ्याचे वाचन करता आले. जिवती व पोंभुर्णा तालुका सर्वात मागे असून ब्रह्मपुरी (६४.४६) व मूल (७२.०३), तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आघाडी घेतल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. जिवती ३६.३६ टक्के व पोंभुर्णा तालुक्यातील ५०.०७ टक्के विद्यार्थ्यांनाच वाचन करता आले. सावली, बल्लारपूर, राजुरा, कोरपना तालुक्याची टक्केवारी ५१ ते ६० दरम्यान आहे. चंद्रपूर, गोंडपिपरी, सिंदेवाही, नागभीड, चिमूर, वरोरा, भद्रावती तालुक्याची टक्केवारी ६१ ते ७० आहे. मागील वर्षाच्या मराठी भाषा उतारा वाचनाची टक्केवारी ८२.५६ होती. यंदाच्या शैक्षणिक सत्रात ६४.३९ टक्के आढळली. तुलनात्मकदृष्ट्या ही तफावत १८.१७ टक्के आहे. त्यामुळे मागील वर्षी उतारा वाचन करण्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १८.१७ टक्के विद्यार्थी मागे कसे पडले, असा प्रश्न पालकांकडून विचारला जात आहे.

शिक्षकांनीच घेतली चाचणीच्संस्थेच्या निर्देशानुसार चाचणी घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य वर्गशिक्षकांनाच दिले होते. मात्र, मराठी विषयाच्या वाचनात ३५.६१ टक्के विद्यार्थी मागे पडले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षकांवरच आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

गणितातही पिछाडीच्गणित विषयाची सहा स्तरांमध्ये विभागणी करण्यात आली. गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज, संख्याज्ञान या टप्प्यांमध्ये भागाकार हा पहिला टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, इयत्ता चौथी ते आठवीतील ३६.८५ टक्के विद्यार्थ्यांना भागाकारच करता येत नसल्याचे चाचणीतून उघड झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १९.७६ टक्क्यांची तफावत आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र