शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे पाच वर्षात ३४३ जणांचा मृत्यू

By admin | Updated: September 9, 2015 00:51 IST

प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

परिस्थिती गंभीर : जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळाले आकडेचंद्रपूर : प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणामुळे मागील पाच वर्षात तब्बल ३४३ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची बाब जिल्हा सामान्य रुग्णालयातून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या आकडेवारीवरून उजेडात आली आहे.सामाजिक कार्यकर्ता राजेश बेले यांनी ही माहिती मागितली होती. प्रदूषण दिवसेंदिवस आणखी वाढत असतानाही त्याला नियंत्रित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येते. यासाठी व्यापक प्रमाणात वृक्षारोपण गरजेचे आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. वृक्षारोपण कार्यक्रमात हयगय केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राजेश बेले यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी ते पुढे म्हणाले, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. मात्र या वृक्षांचे जतन व संवर्धन केले जात नाही. त्यामुळे लावलेले वृक्ष अल्पावधीतच नष्ट होऊन जातात. महानगरपालिकेने शहरातील रस्त्यावर लावलेले पाम ट्री त्याचेच उदाहरण आहे. जिल्ह्यात प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजाराचे लक्षण दिसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारीनुसार दमा, ह्दयविकार, अ‍ॅसीडीटी, त्वचा रोग, टीबी यासारखे आजारांमुळे २०११-१२ मध्ये ६६ जणांचा, २०१२-१३ मध्ये १०२ जणांचा, २०१३-१४ मध्ये ९० जणांचा, २०१४-१५ मध्ये ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालामध्ये मृत्यूला कारणीभूत दूषित पाणी व वायू प्रदूषण ठरविण्यात आले आहे.वाढते प्रदूषण कमी करण्यात जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधीही बेजबाबदारपणा दाखवित असल्याचा आरोप बेले यांनी यावेळी केला. एकीकडे औद्योगिकरणाला चालना देण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला नियंत्रित करताना उदासीनता दाखविली जात आहे. सीटीपीएस चंद्रपुरात आहे. प्रदूषणाचा सामना चंद्रपूरकरांना करावा लागत आहे. तरीही विजेच्या वापरात सबसीडी दिली जात नाही, याबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली. याबाबत संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला स्वप्नील पटेल, सुदर्शन बोरीकर, फिरोज शेख, अमित रस्तोगी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)