शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

प्रदूषणामुळे पाच वर्षात ३४३ जणांचा मृत्यू

By admin | Updated: September 9, 2015 00:51 IST

प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

परिस्थिती गंभीर : जिल्हा सामान्य रुग्णालयात मिळाले आकडेचंद्रपूर : प्रदूषणाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा देशात कुप्रसिध्द झाला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. प्रदूषणामुळे मागील पाच वर्षात तब्बल ३४३ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची बाब जिल्हा सामान्य रुग्णालयातून माहितीच्या अधिकारात मिळालेल्या आकडेवारीवरून उजेडात आली आहे.सामाजिक कार्यकर्ता राजेश बेले यांनी ही माहिती मागितली होती. प्रदूषण दिवसेंदिवस आणखी वाढत असतानाही त्याला नियंत्रित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नसल्याचे दिसून येते. यासाठी व्यापक प्रमाणात वृक्षारोपण गरजेचे आहे. मात्र याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. वृक्षारोपण कार्यक्रमात हयगय केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राजेश बेले यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी ते पुढे म्हणाले, चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. मात्र या वृक्षांचे जतन व संवर्धन केले जात नाही. त्यामुळे लावलेले वृक्ष अल्पावधीतच नष्ट होऊन जातात. महानगरपालिकेने शहरातील रस्त्यावर लावलेले पाम ट्री त्याचेच उदाहरण आहे. जिल्ह्यात प्रदूषण वाढल्यामुळे नागरिकांमध्ये विविध आजाराचे लक्षण दिसत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आकडेवारीनुसार दमा, ह्दयविकार, अ‍ॅसीडीटी, त्वचा रोग, टीबी यासारखे आजारांमुळे २०११-१२ मध्ये ६६ जणांचा, २०१२-१३ मध्ये १०२ जणांचा, २०१३-१४ मध्ये ९० जणांचा, २०१४-१५ मध्ये ८५ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अहवालामध्ये मृत्यूला कारणीभूत दूषित पाणी व वायू प्रदूषण ठरविण्यात आले आहे.वाढते प्रदूषण कमी करण्यात जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधीही बेजबाबदारपणा दाखवित असल्याचा आरोप बेले यांनी यावेळी केला. एकीकडे औद्योगिकरणाला चालना देण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला नियंत्रित करताना उदासीनता दाखविली जात आहे. सीटीपीएस चंद्रपुरात आहे. प्रदूषणाचा सामना चंद्रपूरकरांना करावा लागत आहे. तरीही विजेच्या वापरात सबसीडी दिली जात नाही, याबाबतही त्यांनी खंत व्यक्त केली. याबाबत संबंधित मंत्री, अधिकाऱ्यांकडे सातत्याने पत्रव्यवहार केला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला स्वप्नील पटेल, सुदर्शन बोरीकर, फिरोज शेख, अमित रस्तोगी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)