शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

कोरपन्यात ३१ वर्षांत ३२ ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST

जयंत जेनेकर कोरपना : कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कोरपना येथे ३१ वषापूर्वी ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या ठाण्याअंतर्गंत ...

जयंत जेनेकर

कोरपना : कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कोरपना येथे ३१ वषापूर्वी ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या ठाण्याअंतर्गंत चार बिट असून ६२ गावांचा कारभार पोलिसांवर आहे. या ३१ वर्षामध्ये तब्बल ३२ ठाणेदारांनी आपली सेवा देत येथील कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळली.

परिसरात लक्ष ठेवण्यासाठी निजाम काळात शेरज बू. येथे पोलीस ठाणे होते. त्यानंतर त्याचे गडचांदूरला स्थानांतर करण्यात आले आणि कन्हाळगाव येथे पोलीस चौकी देण्यात आली होती. यादरम्यान गुन्ह्याचा वाढता आलेख बघता कोरपना येथे १९८९ ला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. याला आज ३१ वर्षे पूर्ण झाले आहे.

सुरुवातीला अशपाक पटेल यांच्या वाड्यातून येथील ठाण्याचा कारभार चालायचा.२००० मध्ये वणी मार्गावर ठाण्याची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मधुकर पांडे यांच्या हस्ते पार पडले. ठाण्याच्या निर्मितीपासून १६ पोलीस निरीक्षक, सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, नऊ पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख पदाचा कार्यभार सांभाळला. ठाण्याचे पहिले ठाणेदार एम. वी. बाकडे तर विद्यमान ठाणेदार अरुण गुरनुले आहे. सद्यस्थितीत ६२ गावे असून कोरपना , नारंडा, वनसडी, पारडी या चार बिटामचा समावेश आहे. पूर्वी या ठाणे हद्दीत जिवती तालुक्यातील येलापूर भागातील कोटापर्यंतची गावे समाविष्ट होती. मध्यतरी ती गावे कपात करण्यात आली. यामुळे आता पूर्वेस सोनुली, पश्चिम तेलंगणा राज्य सीमा, उत्तरेस यवतमाळ जिल्हा सीमा , दक्षिणेस सावलहिरा गाव पर्यंत ठाण्याची हद्द असून या अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रत्येक हालचालींवर येथील कर्मचारी लक्ष ठेवून आहे.

यांनी दिली सेवा

पोलीस निरीक्षक दीपक देशपांडे, पी. पी. पाटील, सेवानंद तामगाडगे, जी. बी. यादव, नानाजी ठुसे, पी. पी. परदेशी, शोभाराव शेंडे, आर. एम. यादव, ए. डी. चौधरी, व्ही. डब्ल्यू. कुवर, अशोक कोळी, किसन शेळके , गजानन विखे पाटील , पी एस परघने, एन डी कोसुरकर , अरुण गुरणुले , साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे बी. एस. खोडके , एस. ए. शेख , अनिल किनगे, एस. के. वळवी , एस व्ही. भोसले, योगेश पारधी, मंगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे एम व्हीं बाकडे , बी बी सय्यद , पी एस धोटे , बी एम मोगल , यू. एम. सुखदेवे , आर ए वाघचौरे , जयेश भांडारकर, एस. एन. खैरनार, जे. झेड. वाळके आदींनी प्रमुख पदाचा कारभार सांभाळला.