शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

कोरपन्यात ३१ वर्षांत ३२ ठाणेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:38 IST

जयंत जेनेकर कोरपना : कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कोरपना येथे ३१ वषापूर्वी ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या ठाण्याअंतर्गंत ...

जयंत जेनेकर

कोरपना : कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कोरपना येथे ३१ वषापूर्वी ठाण्याची निर्मिती करण्यात आली. या ठाण्याअंतर्गंत चार बिट असून ६२ गावांचा कारभार पोलिसांवर आहे. या ३१ वर्षामध्ये तब्बल ३२ ठाणेदारांनी आपली सेवा देत येथील कायदा तसेच सुव्यवस्था सांभाळली.

परिसरात लक्ष ठेवण्यासाठी निजाम काळात शेरज बू. येथे पोलीस ठाणे होते. त्यानंतर त्याचे गडचांदूरला स्थानांतर करण्यात आले आणि कन्हाळगाव येथे पोलीस चौकी देण्यात आली होती. यादरम्यान गुन्ह्याचा वाढता आलेख बघता कोरपना येथे १९८९ ला पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. याला आज ३१ वर्षे पूर्ण झाले आहे.

सुरुवातीला अशपाक पटेल यांच्या वाड्यातून येथील ठाण्याचा कारभार चालायचा.२००० मध्ये वणी मार्गावर ठाण्याची स्वतंत्र इमारत बांधण्यात आली. या इमारतीचे उद्घाटन तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक मधुकर पांडे यांच्या हस्ते पार पडले. ठाण्याच्या निर्मितीपासून १६ पोलीस निरीक्षक, सात सहाय्यक पोलीस निरीक्षक, नऊ पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख पदाचा कार्यभार सांभाळला. ठाण्याचे पहिले ठाणेदार एम. वी. बाकडे तर विद्यमान ठाणेदार अरुण गुरनुले आहे. सद्यस्थितीत ६२ गावे असून कोरपना , नारंडा, वनसडी, पारडी या चार बिटामचा समावेश आहे. पूर्वी या ठाणे हद्दीत जिवती तालुक्यातील येलापूर भागातील कोटापर्यंतची गावे समाविष्ट होती. मध्यतरी ती गावे कपात करण्यात आली. यामुळे आता पूर्वेस सोनुली, पश्चिम तेलंगणा राज्य सीमा, उत्तरेस यवतमाळ जिल्हा सीमा , दक्षिणेस सावलहिरा गाव पर्यंत ठाण्याची हद्द असून या अंतर्गत येणाऱ्या गावातील प्रत्येक हालचालींवर येथील कर्मचारी लक्ष ठेवून आहे.

यांनी दिली सेवा

पोलीस निरीक्षक दीपक देशपांडे, पी. पी. पाटील, सेवानंद तामगाडगे, जी. बी. यादव, नानाजी ठुसे, पी. पी. परदेशी, शोभाराव शेंडे, आर. एम. यादव, ए. डी. चौधरी, व्ही. डब्ल्यू. कुवर, अशोक कोळी, किसन शेळके , गजानन विखे पाटील , पी एस परघने, एन डी कोसुरकर , अरुण गुरणुले , साहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाचे बी. एस. खोडके , एस. ए. शेख , अनिल किनगे, एस. के. वळवी , एस व्ही. भोसले, योगेश पारधी, मंगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे एम व्हीं बाकडे , बी बी सय्यद , पी एस धोटे , बी एम मोगल , यू. एम. सुखदेवे , आर ए वाघचौरे , जयेश भांडारकर, एस. एन. खैरनार, जे. झेड. वाळके आदींनी प्रमुख पदाचा कारभार सांभाळला.