शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

३२ टक्के पेरण्या अपूर्णच

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे.

पावसाची हुलकावणी कारणीभूत : आतापर्यंत ६८ टक्के पेरण्या चंद्रपूर : गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही शंभर टक्के पेरण्या आटोपल्या नसून पावसाच्या हुलकावणीने ३२ टक्के पेरणीचे कामे खोळंबल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मृग नक्षत्रात समाधानकरक पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी लगबग सुरू करून कामांना सुरूवात केली. त्यावेळी चार ते पाच दिवस झालेल्या पावसाने यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, अशी अशा शेतकरी व्यक्त करू लागले. मात्र पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर तब्बल १५ ते २० दिवस पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या शेतकऱ्यांची पिके उगवून जमिनीतच करपू लागली. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात अनेकांची पिके तीव्र उन्हामुळे करपून गेली. पावसाने १५ ते २० दिवस हुलकावणी दिल्याने हतबल झालेला शेतकरी संकटात सापडला होता. त्यानंतर २१ जुलैला पावसाचे आगमन झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सध्या रिमझीम पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे पिके करपून गेली त्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. जिल्ह्यात भाताचे १ लाख ६६ हजार ३१२ हेक्टर क्षेत्र असून यापैकी २२ हजार ५५३ क्षेत्रावर रोवणी झाली आहे. तर, कापूस, सोयाबीन या पिकांचीही पेरणी मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझीम पावसाने ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अपूर्ण आहेत त्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)१४ टक्के हेक्टर क्षेत्रावर रोवणी अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली असली तरी ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी लवकर पऱ्हे टाकल्याने १४ टक्के क्षेत्रावर रोवणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. तर आवत्या १०६ टक्के क्षेत्रावर झाले आहे.मुसळधार पावसाचीशेतकऱ्यांना प्रतीक्षाचजिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रोवणीच्या कामांना वेग येईल. तर इतर पिकांनाही पावसाचा फायदा होणार आहे. ५१ टक्के सोयाबीन पेरण्याजिल्ह्यात सोयाबीन पिकाचे सर्व साधारण क्षेत्र ८६ हजार ४६० असून यापैकी ५१ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. तर कापूस पिकाचे यावर्षी दुप्पटीने क्षेत्र वाढल्याने २४९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.