शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
2
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
3
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
4
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
5
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
6
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
7
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
8
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
9
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
10
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
11
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
12
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा
13
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
14
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
15
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
16
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
17
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
18
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
19
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
20
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

३२ टक्के पेरण्या अपूर्णच

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे.

पावसाची हुलकावणी कारणीभूत : आतापर्यंत ६८ टक्के पेरण्या चंद्रपूर : गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही शंभर टक्के पेरण्या आटोपल्या नसून पावसाच्या हुलकावणीने ३२ टक्के पेरणीचे कामे खोळंबल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मृग नक्षत्रात समाधानकरक पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी लगबग सुरू करून कामांना सुरूवात केली. त्यावेळी चार ते पाच दिवस झालेल्या पावसाने यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, अशी अशा शेतकरी व्यक्त करू लागले. मात्र पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर तब्बल १५ ते २० दिवस पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या शेतकऱ्यांची पिके उगवून जमिनीतच करपू लागली. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात अनेकांची पिके तीव्र उन्हामुळे करपून गेली. पावसाने १५ ते २० दिवस हुलकावणी दिल्याने हतबल झालेला शेतकरी संकटात सापडला होता. त्यानंतर २१ जुलैला पावसाचे आगमन झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सध्या रिमझीम पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे पिके करपून गेली त्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. जिल्ह्यात भाताचे १ लाख ६६ हजार ३१२ हेक्टर क्षेत्र असून यापैकी २२ हजार ५५३ क्षेत्रावर रोवणी झाली आहे. तर, कापूस, सोयाबीन या पिकांचीही पेरणी मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझीम पावसाने ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अपूर्ण आहेत त्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)१४ टक्के हेक्टर क्षेत्रावर रोवणी अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली असली तरी ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी लवकर पऱ्हे टाकल्याने १४ टक्के क्षेत्रावर रोवणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. तर आवत्या १०६ टक्के क्षेत्रावर झाले आहे.मुसळधार पावसाचीशेतकऱ्यांना प्रतीक्षाचजिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रोवणीच्या कामांना वेग येईल. तर इतर पिकांनाही पावसाचा फायदा होणार आहे. ५१ टक्के सोयाबीन पेरण्याजिल्ह्यात सोयाबीन पिकाचे सर्व साधारण क्षेत्र ८६ हजार ४६० असून यापैकी ५१ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. तर कापूस पिकाचे यावर्षी दुप्पटीने क्षेत्र वाढल्याने २४९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.