शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

३२ टक्के पेरण्या अपूर्णच

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे.

पावसाची हुलकावणी कारणीभूत : आतापर्यंत ६८ टक्के पेरण्या चंद्रपूर : गेल्या १५ ते २० दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपुर्वी हजेरी लावली. जिल्ह्यात सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे. मात्र जिल्ह्यात अद्यापही शंभर टक्के पेरण्या आटोपल्या नसून पावसाच्या हुलकावणीने ३२ टक्के पेरणीचे कामे खोळंबल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. मृग नक्षत्रात समाधानकरक पाऊस झाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पेरण्यांसाठी लगबग सुरू करून कामांना सुरूवात केली. त्यावेळी चार ते पाच दिवस झालेल्या पावसाने यावर्षी समाधानकारक पाऊस पडेल, अशी अशा शेतकरी व्यक्त करू लागले. मात्र पावसाने हुलकावणी दिली. त्यानंतर तब्बल १५ ते २० दिवस पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या शेतकऱ्यांची पिके उगवून जमिनीतच करपू लागली. अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध सिंचन व्यवस्थेच्या माध्यमातून पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात अनेकांची पिके तीव्र उन्हामुळे करपून गेली. पावसाने १५ ते २० दिवस हुलकावणी दिल्याने हतबल झालेला शेतकरी संकटात सापडला होता. त्यानंतर २१ जुलैला पावसाचे आगमन झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जिल्ह्यात सध्या रिमझीम पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांचे पिके करपून गेली त्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. जिल्ह्यात भाताचे १ लाख ६६ हजार ३१२ हेक्टर क्षेत्र असून यापैकी २२ हजार ५५३ क्षेत्रावर रोवणी झाली आहे. तर, कापूस, सोयाबीन या पिकांचीही पेरणी मोठ्या प्रमाणात अपूर्ण आहे. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझीम पावसाने ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या अपूर्ण आहेत त्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)१४ टक्के हेक्टर क्षेत्रावर रोवणी अनेक शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली असली तरी ज्या शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, त्यांनी लवकर पऱ्हे टाकल्याने १४ टक्के क्षेत्रावर रोवणी झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. तर आवत्या १०६ टक्के क्षेत्रावर झाले आहे.मुसळधार पावसाचीशेतकऱ्यांना प्रतीक्षाचजिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू असली तरी अद्यापही मुसळधार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. मुसळधार पाऊस झाल्यास रोवणीच्या कामांना वेग येईल. तर इतर पिकांनाही पावसाचा फायदा होणार आहे. ५१ टक्के सोयाबीन पेरण्याजिल्ह्यात सोयाबीन पिकाचे सर्व साधारण क्षेत्र ८६ हजार ४६० असून यापैकी ५१ टक्के क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. तर कापूस पिकाचे यावर्षी दुप्पटीने क्षेत्र वाढल्याने २४९ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.