शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

३० टक्के बसेस अद्याप आगारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर बससेवासुद्धा बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत अनलाॅक झाले असले तरी ७० ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर बससेवासुद्धा बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत अनलाॅक झाले असले तरी ७० टक्केच बस रस्त्याने धावत आहेत. परिणामी ग्रामीण प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, वरोरा, चिमूर आणि राजुरा हे आगार येतात. या आगारातून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत बसेस चालविल्या जातात. मात्र, लाॅकडाऊन झाल्यानंतर बस बंद करण्यात आल्या. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर नागपूर तसेच लांब पल्ल्याच्या अन्य बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र, आजही ग्रामीण भागात एसटी पोहोचली नसून येथील नागरिकांनी काळीपिवळी, ऑटो तसेच दुचाकीने शहरात यावे लागत आहे. यामध्ये त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. चंद्रपूर विभागामध्ये २४५ बसेस असून, १ हजार ५०५ कर्मचारी आहे. मात्र, सद्यस्थितीत ७० टक्केच बसेस चालविल्या जात आहेत.

बाॅक्स

एकूण बस - २४५

एकूण कर्मचारी-१,५०५

सध्या सुरू असलेल्या बस-१७०

चालक-५८२

वाहक-३६८

सध्या कामावर चालक-४८०

सध्या कामावर वाहक-२५६

बाॅक्स

या गावांना बस कधी

राजुरा तालुक्यातील गोवरी, मानोली, बाबापूर, कढोली, साखरी, पवनी, मार्डा आदी, कोरपना तालुक्यात मांगलहिरा, येरगवान, कोडशी, चंद्रपूर - कोरपना (भोयेगाव मार्गे), जिवती तालुक्यातील गडचांदूर - जिवती येलापूर ही बस बंद आहे. राजुरा - गडचांदूर - शेणगाव, भारी, बाबापूर, राजुरा - पुडियालमोहदा, राजुरा - गडचांदूर, शेणगाव - टेकामांडवा, नागभीड तालुक्यात नागभीड - बाळापूर, नागभीड मौशी आदी बस फेऱ्या बंद आहेत.

बाॅक्स

प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार

औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे रोजगारासाठी इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येथे नागरिक येतात. मात्र, लाॅकडाऊननंतर बऱ्याच गावातील बस अद्याप बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषत: नागपूर तसेच इतर काही मोठ्या शहरांसाठी ट्रॅव्हल्स आहेत. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना जाण्यासाठी काळीपिवळी, ग्रामीण ऑटोंचाच आधार आहे.

बाॅक्स

काय म्हणतात प्रवास करणारे

कोट

लाॅकडाऊननंतर अनेक गावातील बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना शहरात येण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त पैसा मोजावा लागत आहे. सध्या अनलाॅक असल्यामुळे नागरिक खरेदी तसेच इतर कामांसाठी शहरात येतात. मात्र, प्रवास करणे कठीण झाले आहे.

विजय ठाकरे, प्रवासी

कोट

लाॅकडऊनमुळे बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. काही गावांतील बस सुरू झाल्या आहेत. मात्र, आजही अनेक गावांतील बस सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळाने पूर्वीप्रमाणे सर्व बसफेऱ्या सुरू कराव्या.

- रमेश कोडापे, चंद्रपूर