शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

३० टक्के बसेस अद्याप आगारातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर बससेवासुद्धा बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत अनलाॅक झाले असले तरी ७० ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे लाॅकडाऊन करण्यात आले. त्यानंतर बससेवासुद्धा बंद करण्यात आली होती. सद्यस्थितीत अनलाॅक झाले असले तरी ७० टक्केच बस रस्त्याने धावत आहेत. परिणामी ग्रामीण प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.

चंद्रपूर विभागाअंतर्गत चंद्रपूर, वरोरा, चिमूर आणि राजुरा हे आगार येतात. या आगारातून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत बसेस चालविल्या जातात. मात्र, लाॅकडाऊन झाल्यानंतर बस बंद करण्यात आल्या. कोरोना रुग्ण कमी झाल्यानंतर नागपूर तसेच लांब पल्ल्याच्या अन्य बसेस सुरू करण्यात आल्या. मात्र, आजही ग्रामीण भागात एसटी पोहोचली नसून येथील नागरिकांनी काळीपिवळी, ऑटो तसेच दुचाकीने शहरात यावे लागत आहे. यामध्ये त्यांना आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. चंद्रपूर विभागामध्ये २४५ बसेस असून, १ हजार ५०५ कर्मचारी आहे. मात्र, सद्यस्थितीत ७० टक्केच बसेस चालविल्या जात आहेत.

बाॅक्स

एकूण बस - २४५

एकूण कर्मचारी-१,५०५

सध्या सुरू असलेल्या बस-१७०

चालक-५८२

वाहक-३६८

सध्या कामावर चालक-४८०

सध्या कामावर वाहक-२५६

बाॅक्स

या गावांना बस कधी

राजुरा तालुक्यातील गोवरी, मानोली, बाबापूर, कढोली, साखरी, पवनी, मार्डा आदी, कोरपना तालुक्यात मांगलहिरा, येरगवान, कोडशी, चंद्रपूर - कोरपना (भोयेगाव मार्गे), जिवती तालुक्यातील गडचांदूर - जिवती येलापूर ही बस बंद आहे. राजुरा - गडचांदूर - शेणगाव, भारी, बाबापूर, राजुरा - पुडियालमोहदा, राजुरा - गडचांदूर, शेणगाव - टेकामांडवा, नागभीड तालुक्यात नागभीड - बाळापूर, नागभीड मौशी आदी बस फेऱ्या बंद आहेत.

बाॅक्स

प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार

औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. त्यामुळे रोजगारासाठी इतर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने येथे नागरिक येतात. मात्र, लाॅकडाऊननंतर बऱ्याच गावातील बस अद्याप बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. विशेषत: नागपूर तसेच इतर काही मोठ्या शहरांसाठी ट्रॅव्हल्स आहेत. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना जाण्यासाठी काळीपिवळी, ग्रामीण ऑटोंचाच आधार आहे.

बाॅक्स

काय म्हणतात प्रवास करणारे

कोट

लाॅकडाऊननंतर अनेक गावातील बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना शहरात येण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त पैसा मोजावा लागत आहे. सध्या अनलाॅक असल्यामुळे नागरिक खरेदी तसेच इतर कामांसाठी शहरात येतात. मात्र, प्रवास करणे कठीण झाले आहे.

विजय ठाकरे, प्रवासी

कोट

लाॅकडऊनमुळे बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. काही गावांतील बस सुरू झाल्या आहेत. मात्र, आजही अनेक गावांतील बस सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांसह कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महामंडळाने पूर्वीप्रमाणे सर्व बसफेऱ्या सुरू कराव्या.

- रमेश कोडापे, चंद्रपूर