शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

वेकोलिकडून २६३ शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: March 26, 2017 00:36 IST

वेकोलि व्यवस्थापनाने सिनाळा वाढीव प्रकल्पासाठी चार गावातील २६३ शेतकऱ्यांची ६४२ एकर जमीन अधिग्रहित केली.

६४२ एकर जमीन अधिग्रहित : मोबदल्यासाठी खाण बंदचा इशाराचंद्रपूर : वेकोलि व्यवस्थापनाने सिनाळा वाढीव प्रकल्पासाठी चार गावातील २६३ शेतकऱ्यांची ६४२ एकर जमीन अधिग्रहित केली. मात्र सहा महिने लोटूनही मोबदला न देता शेतकऱ्यांची फसवणूक केली. सात दिवसात मोबदला न दिल्यास दुर्गापूर खुली खाण बंद करण्याचा इशारा सिनाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच संगीता मोटघरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.दुर्गापूर खुल्या खाणीला लागून असलेल्या सिनाळा गावालगत नवीन प्रकल्प वेकोलिच्या वतीने सुरू केला जात आहे. यासाठी सिनाळा, मसाळा, मसाळा तु. आणि नवेगाव या चार गावातील सुमारे २६३ शेतकऱ्यांची ६४२ एकर जमीन २००८ मध्ये अधिग्रहित केली. २०१० मध्ये सेक्शन ९ लावला. ३ सप्टेंबर २०१६ ला झालेल्या बैठकीत वेकोलिचे मुख्य महाप्रबंधक आभासचंद्र सिंग यांनी पाच महिन्याच्या आत मोबदला दिला जाईल, २७२ लोकांच्या नोकरीची प्रक्रिया एका महिन्यानंतर सुरू केली जाईल. चारही गावांचे पुनर्वसन एकाच वेळेस केले जाईल, शेती मजुरांना कंत्राटी स्वरूपात कामे दिली जातील. उर्वरित घरांचे मूल्यांकन एका महिन्यात करून मोबदला देण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते.मात्र पाच महिने लोटूनही या लेखी आश्वासनावर काहीही झालेले नाही. त्यामुळे जमिनी विकता येत नाही आणि मोबदलाही मिळालेला नाही, अशी शोकांतिका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे सर्व शेतकरी कमालीचे अडचणीत सापडले आहेत.वेकोलिने सात दिवसात मोबदला न दिल्यास दुर्गापूर खुली खाण बंद करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला ग्रामपंचायत सदस्य अश्विना रामटेके, माया आत्राम, बाबूराव रायपूरे, मंगलदास रामटेके, गंगाधर माऊलीकर, बबन मडावी, श्याम रोहनकर व अनेक प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)