शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी

By admin | Updated: November 23, 2014 23:15 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे.

चंद्रपूर : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. यंदा सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यामुळे सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी २५ हजारांची मदत करावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.यावेळी ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला भाजप नेत्यांनी टोलमुक्त महाराष्ट्रासह मोठमोठी आश्वासने दिली. या आश्वासनाची पूर्तता करण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. मात्र बहुमतात नसलेल्या सरकारकडून टोलमुक्त महाराष्ट्र अशक्य असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुमतात नसलेल्या सरकारने टाईम बाऊंड घोषित करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पुढील वर्षी चंद्रपुरात मेडीकल कॉलेज निर्माण होईल, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले होते. परंतु मेडिकल कौन्सिलने मेडिकल कॉलेजची परवानगी नाकारली असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. त्यामुळे चंद्रपुरातील केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासाठी प्रयत्न करावे. महानगरपालिकांतर्गत येणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन सध्याच्या सरकारकडून देण्यात आले होते. त्याची पूर्तता सरकारने करावी. अन्यथा व्यापाऱ्यांकडून या सरकारविरोधात जाहीर पत्र काढावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, डॉ. रजनी हजारे, संतोष लहामगे, रामू तिवारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)