शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी

By admin | Updated: November 23, 2014 23:15 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे.

चंद्रपूर : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. यंदा सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यामुळे सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी २५ हजारांची मदत करावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.यावेळी ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला भाजप नेत्यांनी टोलमुक्त महाराष्ट्रासह मोठमोठी आश्वासने दिली. या आश्वासनाची पूर्तता करण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. मात्र बहुमतात नसलेल्या सरकारकडून टोलमुक्त महाराष्ट्र अशक्य असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुमतात नसलेल्या सरकारने टाईम बाऊंड घोषित करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पुढील वर्षी चंद्रपुरात मेडीकल कॉलेज निर्माण होईल, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले होते. परंतु मेडिकल कौन्सिलने मेडिकल कॉलेजची परवानगी नाकारली असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. त्यामुळे चंद्रपुरातील केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासाठी प्रयत्न करावे. महानगरपालिकांतर्गत येणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन सध्याच्या सरकारकडून देण्यात आले होते. त्याची पूर्तता सरकारने करावी. अन्यथा व्यापाऱ्यांकडून या सरकारविरोधात जाहीर पत्र काढावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, डॉ. रजनी हजारे, संतोष लहामगे, रामू तिवारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)