शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

सोयाबीन व धान उत्पादकांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यावी

By admin | Updated: November 23, 2014 23:15 IST

केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे.

चंद्रपूर : केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आल्यानंतर तांदळाची निर्यात बंद केली. त्यामुळे धानाचे दर घसरले असून निर्यातबंदी उठली नाही तर धान उत्पादक शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. यंदा सोयाबीन शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यामुळे सोयाबीन व धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी २५ हजारांची मदत करावी, अशी मागणी विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.यावेळी ते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीपूर्वी जनतेला भाजप नेत्यांनी टोलमुक्त महाराष्ट्रासह मोठमोठी आश्वासने दिली. या आश्वासनाची पूर्तता करण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. मात्र बहुमतात नसलेल्या सरकारकडून टोलमुक्त महाराष्ट्र अशक्य असल्याचेच दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात बहुमतात नसलेल्या सरकारने टाईम बाऊंड घोषित करावा, अशी मागणीही त्यांनी केली. पुढील वर्षी चंद्रपुरात मेडीकल कॉलेज निर्माण होईल, असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिले होते. परंतु मेडिकल कौन्सिलने मेडिकल कॉलेजची परवानगी नाकारली असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी यावेळी दिली. त्यामुळे चंद्रपुरातील केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी यासाठी प्रयत्न करावे. महानगरपालिकांतर्गत येणाऱ्या व्यापाऱ्यांना एलबीटी रद्द करण्याचे आश्वासन सध्याच्या सरकारकडून देण्यात आले होते. त्याची पूर्तता सरकारने करावी. अन्यथा व्यापाऱ्यांकडून या सरकारविरोधात जाहीर पत्र काढावे, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संगीता अमृतकर, डॉ. रजनी हजारे, संतोष लहामगे, रामू तिवारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)