शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

२५ पालकांना मिळणार राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामुग्रह अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:25 IST

चंद्रपूर : विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास पालकांना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामुग्रह योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. ...

चंद्रपूर : विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू झाल्यास पालकांना शासनाकडून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सामुग्रह योजनेतून आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला असून जिल्ह्यातील २५ पालकांना लवकरच शाळांमार्फत धनादेश वितरीत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांमध्ये १३५ विद्यार्थ्यांचा अपघात मृत्यू झाला.

विद्यार्थ्याचा अपघात झाल्यास पालकांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरु करण्यात आली आहे. योजनेनुसार एखाद्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना ७५ हजार रुपयांची तर कायम अपंगत्व आल्यास ५० हजार रुपयांची मदत दिली जाते. मागील पाच वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात १३७ प्रकरणापैकी ११० विद्यर्थ्यांच्या कुटुंबीयांना लाभ देण्यात आला तर मागील दोन वर्षात २७ प्रकरणाचे अनुदान प्रलंबित होते. यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने शासनाकडे पाठपुरावा केला. दरम्यान, यातील २५ प्रकरणाचे अनुदान प्राप्त झाले असून शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची रक्कम वर्ग केली आहे. लकरच पालकांना ७५ हजार रुपयाचे धनादेश वितरीत केले जाणार आहे.

बाॅक्स

मागील पाच वर्षातील मृत्यूचे कारण

पाण्यात बुडून ५२

सर्प दंश १२

वाहन अपघात ५०

वाघ हल्ला ०४

अन्य कारण १६

बाॅक्स

तालुकानिहाय सानुग्रहचंद्रपूर १

भद्रावती २

सावली ५

ब्रह्मपुरी २

कोरपना १

चिमूर ४

नागभीड २

मूल १

सिंदेवाही १

राजुरा २

बल्लारपूर २

गोंडपिपरी २