शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

मूल तालुक्यात मोफत धान्याचे २४ हजार ३४५ लाभार्थी कुटुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:28 IST

राजू गेडाम मूल : कोरोनामुळे गरिबांचे रोजगार हिरावून घेतल्याने अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. आर्थिक पाया डगमगला असताना ...

राजू गेडाम

मूल : कोरोनामुळे गरिबांचे रोजगार हिरावून घेतल्याने अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. आर्थिक पाया डगमगला असताना शासनाने सर्वसामान्यांची भूक मिटविता यावी, यासाठी मे ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली. त्याअनुषंगाने मे महिन्यापासून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाला मोफत गहू व तांदळाचे वितरण सुरू आहे. मूल तालुक्यात २४ हजार ३४५ लाभार्थी कुटुंब असून महिन्याला ४ हजार ३६३ क्विंटल धान्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात अनेकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाची दुसरी लाट मार्च २०२१ आल्यानंतर सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. सर्वसामान्य जनतेचा रोजगार गेल्याने आर्थिक संकट ओढवले होते. त्यामुळे शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देत मे ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्वसामान्य जनता सुखावली गेली. मूल तालुक्यात धान्य लाभार्थी कुटुंब संख्या २४,३४५ असून यात अंत्योदयचे ८,१५१ तर प्राधान्य कुटुंबाचे १६,१९४ लाभार्थी कुटुंब आहेत. शासनाने एका व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. यात एका महिन्याला अंत्योदय कुटुंबातील व्यक्तीला ८६०.७३ क्विंटल गहू तर ५७३.८२ क्विंटल तांदूळ दिले जात आहेत. तसेच प्राधान्य कुटुंबाच्या व्यक्तीला १७५८.५७ क्विंटल गहू व ११७२.३८ क्विंटल तांदूळ वितरण केला जात आहेत. एकंदरीत २४ हजार ३४५ कुटुंब लाभार्थींना दर महिन्याला ४ हजार ३६३ क्विंटल मोफत धान्याचे वितरण केले जात आहे.

कोट

कोरोनाच्या काळात कुणीही अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाला मोफत गहू व तांदूळ दिले जात आहेत. नोव्हेंबर २१ पर्यंत ते दिले जाणार आहे. रेशन दुकानात धान्य दर महिन्याच्या ५ ते ६ तारखेपर्यंत पोहोचत असते. कुटुंबप्रमुखाच्या बोटाचे ठसे घेतल्याशिवाय धान्य वाटप केले जात नसल्याने लाभार्थी कुटुंबांनी महिन्याच्या ३० तारखेपर्यंत नेणे आवश्यक आहे.

-डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार, मूल.