शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

मूल तालुक्यात मोफत धान्याचे २४ हजार ३४५ लाभार्थी कुटुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:28 IST

राजू गेडाम मूल : कोरोनामुळे गरिबांचे रोजगार हिरावून घेतल्याने अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. आर्थिक पाया डगमगला असताना ...

राजू गेडाम

मूल : कोरोनामुळे गरिबांचे रोजगार हिरावून घेतल्याने अनेकांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागले. आर्थिक पाया डगमगला असताना शासनाने सर्वसामान्यांची भूक मिटविता यावी, यासाठी मे ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्याची घोषणा केली. त्याअनुषंगाने मे महिन्यापासून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाला मोफत गहू व तांदळाचे वितरण सुरू आहे. मूल तालुक्यात २४ हजार ३४५ लाभार्थी कुटुंब असून महिन्याला ४ हजार ३६३ क्विंटल धान्याचे वितरण केले जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात अनेकांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाची दुसरी लाट मार्च २०२१ आल्यानंतर सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले होते. सर्वसामान्य जनतेचा रोजगार गेल्याने आर्थिक संकट ओढवले होते. त्यामुळे शासनाने सर्वसामान्यांना दिलासा देत मे ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत मोफत धान्य देण्याचे जाहीर केले. त्यामुळे सर्वसामान्य जनता सुखावली गेली. मूल तालुक्यात धान्य लाभार्थी कुटुंब संख्या २४,३४५ असून यात अंत्योदयचे ८,१५१ तर प्राधान्य कुटुंबाचे १६,१९४ लाभार्थी कुटुंब आहेत. शासनाने एका व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्याचे प्रमाण ठरवून देण्यात आले आहे. यात एका महिन्याला अंत्योदय कुटुंबातील व्यक्तीला ८६०.७३ क्विंटल गहू तर ५७३.८२ क्विंटल तांदूळ दिले जात आहेत. तसेच प्राधान्य कुटुंबाच्या व्यक्तीला १७५८.५७ क्विंटल गहू व ११७२.३८ क्विंटल तांदूळ वितरण केला जात आहेत. एकंदरीत २४ हजार ३४५ कुटुंब लाभार्थींना दर महिन्याला ४ हजार ३६३ क्विंटल मोफत धान्याचे वितरण केले जात आहे.

कोट

कोरोनाच्या काळात कुणीही अन्नापासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाला मोफत गहू व तांदूळ दिले जात आहेत. नोव्हेंबर २१ पर्यंत ते दिले जाणार आहे. रेशन दुकानात धान्य दर महिन्याच्या ५ ते ६ तारखेपर्यंत पोहोचत असते. कुटुंबप्रमुखाच्या बोटाचे ठसे घेतल्याशिवाय धान्य वाटप केले जात नसल्याने लाभार्थी कुटुंबांनी महिन्याच्या ३० तारखेपर्यंत नेणे आवश्यक आहे.

-डॉ. रवींद्र होळी, तहसीलदार, मूल.