शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

२०२५ पर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:27 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. २०२५ पर्यंत जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकºयांच्या शेतामध्ये पाटाद्वारे, विहिरीद्वारे वा अन्य कोणत्याही माध्यमातून मुबलक पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याकडे आपण वाटचाल सुरू केली असून २०२५ पर्यंत प्रत्येकाच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : घाटकुळ-मुधोली रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. २०२५ पर्यंत जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकºयांच्या शेतामध्ये पाटाद्वारे, विहिरीद्वारे वा अन्य कोणत्याही माध्यमातून मुबलक पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याकडे आपण वाटचाल सुरू केली असून २०२५ पर्यंत प्रत्येकाच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.घाटकुळ व परिसरातील नागरिकांची गेल्या २५ वर्षांपासूनची पुलाची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याचा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणाºया घाटकुळ-मुधोली रस्त्यावरील ५० कोटी रू. किंमतीच्या मोठया पुलाचा लोकार्पण सोहळा तसेच महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान ग्रामपंचायत घाटकुळ अंतर्गत आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रम ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, खासदार अशोक नेते, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी प्रामुख्याने उपस्थित होते.बल्लारपूर मूल पोंभूर्णा मतदार संघाने राज्याच्या अर्थमंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याचे सोने करत आतापर्यंत जिल्ह्याला पाच हजार कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देऊन विकासाची गंगा जिल्ह्यात आणली, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.आयएसओ नामांकनकार्यक्रमादरम्यान घाटकुळच्या अंगणवाडी, शाळा व ग्रामपंचायतीला एकाच वर्षी आयएसओ नामांकन प्राप्त झालेले असून त्याचे प्रमाणपत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उपस्थित अंगणवाडी प्रमुख, शाळा प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले.सिंचनाच्या प्रश्नाला नेहमीच अग्रक्रमसिंचनाच्या प्रश्नाला आपण नेहमीच अग्रक्रम दिला असल्याचे सांगत ना. मुनगंटीवार म्हणाले, पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून १० गावातील दोन हजार ४६२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा तीरावरील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांधलेला चीचडोह प्रकल्प, २३ कोटी रू. किंमतीची चिचाळा व लगतच्या सहा गावांमध्ये पाईपलाईनद्वारे सिंचनाची सुविधा आदी कामे पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली.