शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

२०२५ पर्यंत शेतकऱ्यांना सिंचनाचे पाणी देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:27 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. २०२५ पर्यंत जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकºयांच्या शेतामध्ये पाटाद्वारे, विहिरीद्वारे वा अन्य कोणत्याही माध्यमातून मुबलक पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याकडे आपण वाटचाल सुरू केली असून २०२५ पर्यंत प्रत्येकाच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : घाटकुळ-मुधोली रस्त्यावरील पुलाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. २०२५ पर्यंत जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकºयांच्या शेतामध्ये पाटाद्वारे, विहिरीद्वारे वा अन्य कोणत्याही माध्यमातून मुबलक पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था निर्माण करण्याकडे आपण वाटचाल सुरू केली असून २०२५ पर्यंत प्रत्येकाच्या बांधापर्यंत पाणी नेण्याची आपला प्रयत्न आहे, असे प्रतिपादन राज्याचे वित्त नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.घाटकुळ व परिसरातील नागरिकांची गेल्या २५ वर्षांपासूनची पुलाची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याचा या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला मनापासून आनंद होत असल्याचे ते यावेळी बोलताना म्हणाले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला जोडणाºया घाटकुळ-मुधोली रस्त्यावरील ५० कोटी रू. किंमतीच्या मोठया पुलाचा लोकार्पण सोहळा तसेच महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान ग्रामपंचायत घाटकुळ अंतर्गत आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रम ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, खासदार अशोक नेते, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.देवराव होळी प्रामुख्याने उपस्थित होते.बल्लारपूर मूल पोंभूर्णा मतदार संघाने राज्याच्या अर्थमंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी दिली त्याचे सोने करत आतापर्यंत जिल्ह्याला पाच हजार कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध करून देऊन विकासाची गंगा जिल्ह्यात आणली, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.आयएसओ नामांकनकार्यक्रमादरम्यान घाटकुळच्या अंगणवाडी, शाळा व ग्रामपंचायतीला एकाच वर्षी आयएसओ नामांकन प्राप्त झालेले असून त्याचे प्रमाणपत्र पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उपस्थित अंगणवाडी प्रमुख, शाळा प्रशासन तसेच ग्रामपंचायत प्रशासनाला प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी गावकऱ्यांचे कौतुक केले.सिंचनाच्या प्रश्नाला नेहमीच अग्रक्रमसिंचनाच्या प्रश्नाला आपण नेहमीच अग्रक्रम दिला असल्याचे सांगत ना. मुनगंटीवार म्हणाले, पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून १० गावातील दोन हजार ४६२ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा तीरावरील शेतकºयांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बांधलेला चीचडोह प्रकल्प, २३ कोटी रू. किंमतीची चिचाळा व लगतच्या सहा गावांमध्ये पाईपलाईनद्वारे सिंचनाची सुविधा आदी कामे पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी दिली.