शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

चोरीचा २० टन कोळसा जप्त

By admin | Updated: March 29, 2017 01:50 IST

काही दिवसांपासून बल्लारशाह आणि राजुरा येथील कोळसा खदानीमध्ये कोळसा चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यापासून होणारी गुंडागर्दी सुद्धा वाढली आहे.

पोलीस पथकाची कारवाई : दोघांवर गुन्हे दाखल चंद्रपूर : काही दिवसांपासून बल्लारशाह आणि राजुरा येथील कोळसा खदानीमध्ये कोळसा चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यापासून होणारी गुंडागर्दी सुद्धा वाढली आहे. कोळसा खाणीतून निघालेला कोळसा भरलेल्या ट्रकला थांबवून कोळसा चोरी करणे आणि ट्रक चालकास मारझोड करणे असे प्रमाण वाढल्याने कोळसा खाणीतील अधिकाऱ्यानी पोलिसांकडे धाव घेतली. याची दखल घेत पोलीस पथक तयार करून पेट्रोलिंग करण्यात आली. या पथकाने बल्लारशहा खाण परिसरात २० टन चोरीचा कोळसा जप्त करण्यात पोलिसांना यश आले. २८ मार्च रोजी बल्लारशाह खदान परिसरात पेट्रोलिंग करीत असता, विक्की ठाकुर रा. रामपूर, राजुरा व रामचंद्र उर्फ रसीया निशाद रा. बल्लारशाह हे दोन इसम मागील काही दिवसांपासून कोळसा चोरी करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. दोन्ही इसमाने काही दिवसापूर्वी राजुरा येथील पवनी ते कढोली मार्गावर रस्त्याच्या बाजूला अंदाजे २० टन कोळसा साठवून ठेवलेला आहे, या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि गौरी ओपन कास्ट माईनचे सेक्युरिटी इन्चार्ज तात्काळ पवनी ते कढोली रस्त्यावर जावून पाहणी केली. यात तेथे अंदाजे २० टन कोळसा पडून असलेला दिसला. सदर कोळसा पोलिस पथकाने आपल्या ताब्यात घेवून गौरी ओपन कास्ट माईन येथून हायवा ट्रक व पेलोडर मशीन बोलावून जप्त केला. कोळसा ट्रकमध्ये भरून गौरी ओपन कास्ट माईन कोल स्टाक येथे काट्यावर आणून वजन केले असता सदर कोळसा १९ हजार ९४० किलो भरला. या कोळशाची किमंत एक लाख रूपये आहे. आरोपी विक्की ठाकूर रा. रामपूर व रामचंद्र उर्फ रसीया निशाद रा. बल्लारशा यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन राजुरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)