शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

दोन महिन्यांत २० मृत्यू

By admin | Updated: December 4, 2015 01:18 IST

राजुरा तालुक्यातील राज्याच्या शेवटच्या टोकावरील लक्कडकोट, घोट्टा, कोष्टाळा व गुड्यातील शेकडो रुग्ण दोन-तीन महिन्यांपासून डेंग्यू, ...

राजुरा : राजुरा तालुक्यातील राज्याच्या शेवटच्या टोकावरील लक्कडकोट, घोट्टा, कोष्टाळा व गुड्यातील शेकडो रुग्ण दोन-तीन महिन्यांपासून डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, मेंदूज्वर अशा विविध प्रकारच्या आजाराची लागण झाल्याने त्रस्त झाले आहेत. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपचार फक्त ‘रेफर’ व मलेरियाच्या गोळ्या यापर्यंत मर्यादित असल्यामुळे येथील सुमारे २० लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भयभित झालेल्या शेकडो रुग्णांनी खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार सुरू केल्याची माहिती आहे.देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लक्कडकोट, घोट्टा, कोष्टाळा ही गावे व गुडे येतात. येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्यामुळे भेट देऊन उपचार करणे अवघड होते. माहे आॅगस्टपासून या गावातील लोकांना मलेरिया, डेग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर आदी आजाराची लागण होणे सुरु झाले. रुग्णास आरोग्य केंद्रातून योग्य उपचार मिळत नव्हता. हा परिसर आदिवासी व दुर्बल घटकाचा आहे. नापिकीमुळे हतबल झालेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवा हीच त्याच्यासाठी मृत्यूपासून बचाव करण्याचे एकमात्र साधन आहे. परंतु तिच सेवा कोलमडल्यामुळे या परिसरातील सुमारे २० रुग्णांना विविध आजाराने दोन महिन्याच्या कालावधीत जीव गमवावा लागला. यातील काही रुग्णांचा मृत्यू रस्त्यात झाला तर काहींचा रुग्णालयात व घरी झाला आहे.मृत पावलेल्यांमध्ये राजीव मोंडी ओडरे, विठ्ठल भीमराव सेरकुरे, लिंगू मारु मेश्राम, भिमराव पुजारी, पार्वताबाई अर्जुन बंडी, लक्ष्मय्या किमय्या पोरका, शांताबाई पुलय्या बोगना, रमेश बापू कुंदरप्पा, सदाशिव जाणू आदे, येलय्या रामलू तोगर, कल्पना हनमंतु गंगुला, ब्रम्हराज मुत्ताबाई मारोती पाल, गंगाराम नानाजी मुडे, जलमुबाई महादू जुमनाके, गंगय्या नागेद्र आलेटी, कुळसंगे, व पिंपळगाव येथील मुलगा, मुलगी, यांचा सप्टेंबर महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो रुग्णांनी ग्रामीण रुग्णालय राजुरा, आशाधाम विरुर व खाजगी रुग्णालय राजुरा, चंद्रपूर येथे उपचार करुन मृत्यूच्या खाईतून बचाव केला आहे.शासनाकडून विविध प्रकाराच्या आजारावर उपचाराचा गवगवा केला जातो. परंतु देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णाचा आजार पाहून आजारी पडले होते. याबाबत सदर प्रतिनिधीने वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, उपजिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी राजुरा यांना मोबाईलद्वारे शेकडो रुग्ण घरोघरी तापाणे फणफणत असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या परिसरात फेरफटका मारुन थातूरमातूर उपचार करुन रेफर अनेकांना रेफर केले. बरेच रुग्ण खासगी उपचार घेत होते. मृत्यूपासून बचाव करण्यासाठी बऱ्याच लोकांनी उसनवारी घेऊन खाजगी उपचार केला व ज्यांच्याकडे काहीच नव्हते, त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला, ही वास्तविकता आहे.चिकन गुनियाच्या आजराने ग्रस्त असलेले रुग्ण आजही पूर्णपणे तंदुरुस्त झाले नाही. बऱ्याच रुग्णास उठणे बसणे त्रासदायक आहे. देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय असल्यामुळे तेदेखील गांभीर्याने कर्तव्य पार पाडत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. येथील जनता मृत्यूपासून बचाव करावयाचा असल्याने खाजगी रुग्णालयाचा आधार घेताना दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)