शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

दोन महिन्यांत २० मृत्यू

By admin | Updated: December 4, 2015 01:18 IST

राजुरा तालुक्यातील राज्याच्या शेवटच्या टोकावरील लक्कडकोट, घोट्टा, कोष्टाळा व गुड्यातील शेकडो रुग्ण दोन-तीन महिन्यांपासून डेंग्यू, ...

राजुरा : राजुरा तालुक्यातील राज्याच्या शेवटच्या टोकावरील लक्कडकोट, घोट्टा, कोष्टाळा व गुड्यातील शेकडो रुग्ण दोन-तीन महिन्यांपासून डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, मेंदूज्वर अशा विविध प्रकारच्या आजाराची लागण झाल्याने त्रस्त झाले आहेत. शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपचार फक्त ‘रेफर’ व मलेरियाच्या गोळ्या यापर्यंत मर्यादित असल्यामुळे येथील सुमारे २० लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर भयभित झालेल्या शेकडो रुग्णांनी खासगी रुग्णालयात दाखल होऊन उपचार सुरू केल्याची माहिती आहे.देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात लक्कडकोट, घोट्टा, कोष्टाळा ही गावे व गुडे येतात. येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असल्यामुळे भेट देऊन उपचार करणे अवघड होते. माहे आॅगस्टपासून या गावातील लोकांना मलेरिया, डेग्यू, चिकनगुनिया, मेंदूज्वर आदी आजाराची लागण होणे सुरु झाले. रुग्णास आरोग्य केंद्रातून योग्य उपचार मिळत नव्हता. हा परिसर आदिवासी व दुर्बल घटकाचा आहे. नापिकीमुळे हतबल झालेले शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवा हीच त्याच्यासाठी मृत्यूपासून बचाव करण्याचे एकमात्र साधन आहे. परंतु तिच सेवा कोलमडल्यामुळे या परिसरातील सुमारे २० रुग्णांना विविध आजाराने दोन महिन्याच्या कालावधीत जीव गमवावा लागला. यातील काही रुग्णांचा मृत्यू रस्त्यात झाला तर काहींचा रुग्णालयात व घरी झाला आहे.मृत पावलेल्यांमध्ये राजीव मोंडी ओडरे, विठ्ठल भीमराव सेरकुरे, लिंगू मारु मेश्राम, भिमराव पुजारी, पार्वताबाई अर्जुन बंडी, लक्ष्मय्या किमय्या पोरका, शांताबाई पुलय्या बोगना, रमेश बापू कुंदरप्पा, सदाशिव जाणू आदे, येलय्या रामलू तोगर, कल्पना हनमंतु गंगुला, ब्रम्हराज मुत्ताबाई मारोती पाल, गंगाराम नानाजी मुडे, जलमुबाई महादू जुमनाके, गंगय्या नागेद्र आलेटी, कुळसंगे, व पिंपळगाव येथील मुलगा, मुलगी, यांचा सप्टेंबर महिन्यापासून नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो रुग्णांनी ग्रामीण रुग्णालय राजुरा, आशाधाम विरुर व खाजगी रुग्णालय राजुरा, चंद्रपूर येथे उपचार करुन मृत्यूच्या खाईतून बचाव केला आहे.शासनाकडून विविध प्रकाराच्या आजारावर उपचाराचा गवगवा केला जातो. परंतु देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र रुग्णाचा आजार पाहून आजारी पडले होते. याबाबत सदर प्रतिनिधीने वेळोवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, उपजिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी राजुरा यांना मोबाईलद्वारे शेकडो रुग्ण घरोघरी तापाणे फणफणत असल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या परिसरात फेरफटका मारुन थातूरमातूर उपचार करुन रेफर अनेकांना रेफर केले. बरेच रुग्ण खासगी उपचार घेत होते. मृत्यूपासून बचाव करण्यासाठी बऱ्याच लोकांनी उसनवारी घेऊन खाजगी उपचार केला व ज्यांच्याकडे काहीच नव्हते, त्यांचा उपचाराअभावी मृत्यू झाला, ही वास्तविकता आहे.चिकन गुनियाच्या आजराने ग्रस्त असलेले रुग्ण आजही पूर्णपणे तंदुरुस्त झाले नाही. बऱ्याच रुग्णास उठणे बसणे त्रासदायक आहे. देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकच वैद्यकीय असल्यामुळे तेदेखील गांभीर्याने कर्तव्य पार पाडत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शासकीय आरोग्य सेवेवरील जनतेचा विश्वास उडाला आहे. येथील जनता मृत्यूपासून बचाव करावयाचा असल्याने खाजगी रुग्णालयाचा आधार घेताना दिसत आहे. (तालुका प्रतिनिधी)