शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

१ कोटी ४ लाख ७१ हजार १६१ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:47 IST

पर्यावरणाचा समतोल राखता यावा, वाढते तापमान, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप, यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवाचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम सुरू केली.

ठळक मुद्देमोहिमेला २३ दिवस पूर्ण : जिल्हाभरात वृक्षारोपण सुरूच, ग्रामपंचायत व सामाजिक संस्थांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखता यावा, वाढते तापमान, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप, यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवाचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम सुरू केली. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी अवघ्या २३ दिवसातच राज्यात २३ कोटी तर जिल्ह्यात १ कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली.पर्यावरणाच्या संवर्धनाची उपयुक्तता पटल्याने नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन, सामाजिक संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवघ्या २३ दिवसात राज्यात १४ कोटी ७४ लक्ष ९७ हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे. राज्याने आतापर्यंत ४०.४९ टक्के उद्दिष्ट गाठले. यामध्ये ठाणे जिल्हा आपल्या उद्दिष्टात अव्वल ठरला आहे. ठाणे जिल्ह्याचे ६६ लक्ष ८७ हजार ५५० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून ६९ हजार ३३३ वृक्षलागवड करून ७८. ४० टक्के गाठले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून ४१ लक्ष ६५ हजार ९०० वृक्षलागवडीचे लक्ष्य होते. आतापर्यंत ५७ हजार १८५ वृक्षांची लागवड करून ७५.८१ टक्के गाठले. कोल्हापूर जिल्ह्याने ८५ लक्ष ८७ हजार ७८५ वृक्षलागवड करून ७३.८७ टक्के ध्येय गाठले आहे. चंद्रपूर जिल्ह्याने २५ दिवसात १ कोटी ४ लक्ष ७१ हजार १६१ वृक्षांची लागवड केली.जिल्ह्यातून वन विभागाने २२ लक्ष १४ हजार ९६० वृक्षांची लागवड करून ८४.५६ टक्के मध्य चांदा विभागाने २४ लक्ष ४० हजार ४६४ वृक्षलागवड करून ८६.५९ टक्के, सामाजिक वन विभागाने ७ लक्ष १५ हजार ६९६ वृक्षलागवड करून ४८.२ टक्के तर ग्रामपंचायतींनी १० लक्ष ६९ हजार २३२ वृक्षलागवड करून ५३.८४ टक्के आणि माय प्लांट अ‍ॅपद्वारे जिल्ह्यात १ हजार ५७३ वृक्षांची लागवड करण्यात आले आहे.लोकसहभागातून उद्दिष्ट होणार पूर्णचंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लोकसहभाग वाढत आहे. वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरणाची चळवळ गतीमान झाली. ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात कार्य करणाºया विविध संस्था, महिला बचतगट आणि ग्रामपंचायतींचा सहभाग उल्लेखनीय ठरत आहे. राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी वन विभागासोबतच शासनाचे सर्व विभाग जोमाने कार्य करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनाही प्रेरणा मिळाली आहे.