शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

१ कोटी ४ लाख ७१ हजार १६१ वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 23:47 IST

पर्यावरणाचा समतोल राखता यावा, वाढते तापमान, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप, यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवाचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम सुरू केली.

ठळक मुद्देमोहिमेला २३ दिवस पूर्ण : जिल्हाभरात वृक्षारोपण सुरूच, ग्रामपंचायत व सामाजिक संस्थांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखता यावा, वाढते तापमान, पाण्याची टंचाई, जमिनीची धूप, यासारख्या नैसर्गिक आपत्तीपासून मानवाचे संरक्षण व्हावे, यासाठी राज्याचे वित्त, नियोजन, वन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चार वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीची मोहीम सुरू केली. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत असून राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी अवघ्या २३ दिवसातच राज्यात २३ कोटी तर जिल्ह्यात १ कोटींपेक्षा अधिक वृक्ष लागवड करण्यात आली.पर्यावरणाच्या संवर्धनाची उपयुक्तता पटल्याने नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासन, सामाजिक संस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अवघ्या २३ दिवसात राज्यात १४ कोटी ७४ लक्ष ९७ हजार वृक्षलागवड करण्यात आली आहे. राज्याने आतापर्यंत ४०.४९ टक्के उद्दिष्ट गाठले. यामध्ये ठाणे जिल्हा आपल्या उद्दिष्टात अव्वल ठरला आहे. ठाणे जिल्ह्याचे ६६ लक्ष ८७ हजार ५५० वृक्षलागवडीचे उद्दिष्ट असून ६९ हजार ३३३ वृक्षलागवड करून ७८. ४० टक्के गाठले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असून ४१ लक्ष ६५ हजार ९०० वृक्षलागवडीचे लक्ष्य होते. आतापर्यंत ५७ हजार १८५ वृक्षांची लागवड करून ७५.८१ टक्के गाठले. कोल्हापूर जिल्ह्याने ८५ लक्ष ८७ हजार ७८५ वृक्षलागवड करून ७३.८७ टक्के ध्येय गाठले आहे. चंद्रपूर जिल्ह्याने २५ दिवसात १ कोटी ४ लक्ष ७१ हजार १६१ वृक्षांची लागवड केली.जिल्ह्यातून वन विभागाने २२ लक्ष १४ हजार ९६० वृक्षांची लागवड करून ८४.५६ टक्के मध्य चांदा विभागाने २४ लक्ष ४० हजार ४६४ वृक्षलागवड करून ८६.५९ टक्के, सामाजिक वन विभागाने ७ लक्ष १५ हजार ६९६ वृक्षलागवड करून ४८.२ टक्के तर ग्रामपंचायतींनी १० लक्ष ६९ हजार २३२ वृक्षलागवड करून ५३.८४ टक्के आणि माय प्लांट अ‍ॅपद्वारे जिल्ह्यात १ हजार ५७३ वृक्षांची लागवड करण्यात आले आहे.लोकसहभागातून उद्दिष्ट होणार पूर्णचंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात लोकसहभाग वाढत आहे. वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरणाची चळवळ गतीमान झाली. ग्रामीण व आदिवासी क्षेत्रात कार्य करणाºया विविध संस्था, महिला बचतगट आणि ग्रामपंचायतींचा सहभाग उल्लेखनीय ठरत आहे. राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिम यशस्वी करण्यासाठी वन विभागासोबतच शासनाचे सर्व विभाग जोमाने कार्य करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनाही प्रेरणा मिळाली आहे.