शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर तालुक्यातील १८ गावे शुद्ध पाणी पुरवठ्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:37 IST

नऊ महिन्यापासून कामात अडथळे : पाणी टंचाईच्या योजना सुरु करण्याची मागणी मंगल जीवने बल्लारपूर : राज्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या ...

नऊ महिन्यापासून कामात अडथळे : पाणी टंचाईच्या योजना सुरु करण्याची मागणी

मंगल जीवने

बल्लारपूर : राज्यातील ग्रामीण भागातील जनतेच्या दीर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करून शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्याच्या पाणीपुरवठा व आरोग्य विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाच्या अंतर्गत ३५ कोटीच्या योजनेमुळे बल्लारपूर तालुक्यातील १८ गावांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार आहे.

परंतु मौजा आमडी येथील पाण्याच्या टाकीचे काम विनाकारण थांबविण्यात आले असल्याने ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या गावखेड्यातील नागरिकांनी या योजनांतर्गत शुद्ध पिण्याचे पाणी पिण्यासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, असा सवाल केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ग्रीड पाणीपुरवठा योजना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने मूल,पोंभुर्णा व बल्लारपूर येथे होत आहे. यामुळे ग्रामीण विभागातील जनतेस शुद्ध पाणी मिळणार आहे. या योजनेंतर्गत येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत बल्लारपूर पॉवर हाऊस जवळील परिसरात १८ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी साडेचार लाख लिटरची मुख्य संतुलन टाकी बांधण्यात आली आहे. तसेच टाकीत पाणी घेण्यासाठी कोलगाव वर्धा नदीवर पंप बसविण्याचे कामही पूर्ण झाले आहे. अलीकडेच या योजनेचा प्रगती आढावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता सतीश सुषीर यांनी घेतला आहे व समाधान व्यक्त केले आहे.

या योजनेचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून मौजा आमडी येथील पाण्याच्या टाकीच्या वादाची तक्रार उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, बल्लारशाह, व जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागीय कार्यालयाने सांगितले आहे.

बॉक्स या गावाला होणार पाणीपुरवठा

विसापूर,नांदगाव पोडे,बामणी, दुधोली, हडस्ती, चारवट, चुनाभट्टी, भिवकुंड, लावारी, जोगापूर, कोर्टी मक्ता, कोर्टी तुकूम, कळमना, कवडजई, किन्ही, दहेली, केमतुकूम,पळसगाव या गावांना शुद्ध पाणीपुरवठा होणार आहे. कारण या ग्रामीण विभागात उन्हाळ्याच्या दिवसात नेहमीच पाण्याचा प्रश्न भेडसावत असतो.

कोट

उन्हाळ्यात पाण्याची चणचण सगळीकडे असतेच. परंतु ग्रीड पाणीपुरवठा योजनांतर्गत बामणी गावाला घरोघरी शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याने गावकरी ही योजना सुरु होण्याची प्रतीक्षा करीत आहे.

- सुभाष ताजने,सरपंच,ग्रामपंचायत,बामणी.