शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

१८ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण

By admin | Updated: September 5, 2015 01:07 IST

खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अमरपूरी भान्सुली येथे तीन दिवसांपासून ग्रामपंचातीच्या

ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा : अमरपुरी भान्सुलीत रुग्णांच्या संख्येत वाढखडसंगी : खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अमरपूरी भान्सुली येथे तीन दिवसांपासून ग्रामपंचातीच्या सार्वजनिक विहिरीचे पाणी पिल्याने मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोची (अतिसार) लागण झाली असून आजपर्यंत १८ रुग्ण खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार घेत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. चिमूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गटग्रामपंचायत अमरपुरी (भान्सुली) ची लोकसंख्या अंदाजे दोन हजारांच्या जवळपास आहे. गावामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची नळयोजना नसल्याने पूर्ण गावाला ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विहिरीमध्ये ब्लिचींग पावडर टाकणे गरजेचे असते तर विहिरीच्या स्त्रोतामध्ये दुसऱ्या ठिकाणाचे दूषित पाणी येत तर नाही याची दक्षता स्थानिक ग्रामपंचायतीने घ्यायला हवी. मात्र मागील अनेक दिवसांपासून विहिरीत ब्लिचींग पावडर न टाकल्याने व बाजुला संडासचे गटर असल्याने या विहिरीचे पाणी दूषित झाल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.गेल्या तीन दिवसांपासून गॅस्ट्रोच्या आजाराच्या रुग्णांत वाढ होत आहे. अनिल देवराव घोगडे (३५), शिवाणी संपत नन्नावरे (४), सुहासिनी हरिदास जांभुळे हे रुग्ण खडसंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. रेखा तुळशीराम श्रीरामे (३०), बाळू देवराव दडमल (३५), सुमन रामदास ताजने (५०), पीयूष तुळशिराम श्रीरामे (५), वंदना वामन घेताडे (४५), मंगेश महादेव दडमल (२५), अरुण कवडू श्रीरामे, किरण नन्नावरे (२५), मनिषा रविंद्र श्रीरामे (२०), मंजुळा महादेव दडमल (४५), लक्ष्मण सातपैसे (५०), विनोद सातपैसे (२५), प्रदीप गायकवाड (२१), वेदांत शांताराम ताजने (५०), आणि संगीता संदीप समर्थ यांचा समावेश आहे. हे सर्वजण अमरपुरी भान्सुलीचे रहिवासी आहे. त्यांच्यावर चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतली असती तर एवढे रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली नसती. त्यामुळे याकरीता आरोग्य विभागाचा अलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तर ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताजवळ स्वच्छता व ब्लिचींग पुरवठा वेळेवर केला असता तर गॅस्ट्रोची लागण झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)