शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
3
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
4
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
5
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
6
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
7
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
8
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
9
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
10
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
11
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
12
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
13
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
14
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
15
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
16
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
17
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
18
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
19
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
20
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...

१८ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण

By admin | Updated: September 5, 2015 01:07 IST

खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अमरपूरी भान्सुली येथे तीन दिवसांपासून ग्रामपंचातीच्या

ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा : अमरपुरी भान्सुलीत रुग्णांच्या संख्येत वाढखडसंगी : खडसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या अमरपूरी भान्सुली येथे तीन दिवसांपासून ग्रामपंचातीच्या सार्वजनिक विहिरीचे पाणी पिल्याने मोठ्या प्रमाणात गॅस्ट्रोची (अतिसार) लागण झाली असून आजपर्यंत १८ रुग्ण खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचार घेत आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे. चिमूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गटग्रामपंचायत अमरपुरी (भान्सुली) ची लोकसंख्या अंदाजे दोन हजारांच्या जवळपास आहे. गावामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा योजनेची नळयोजना नसल्याने पूर्ण गावाला ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीच्या पाण्यावरच आपली तहान भागवावी लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विहिरीमध्ये ब्लिचींग पावडर टाकणे गरजेचे असते तर विहिरीच्या स्त्रोतामध्ये दुसऱ्या ठिकाणाचे दूषित पाणी येत तर नाही याची दक्षता स्थानिक ग्रामपंचायतीने घ्यायला हवी. मात्र मागील अनेक दिवसांपासून विहिरीत ब्लिचींग पावडर न टाकल्याने व बाजुला संडासचे गटर असल्याने या विहिरीचे पाणी दूषित झाल्याचा अंदाज गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे.गेल्या तीन दिवसांपासून गॅस्ट्रोच्या आजाराच्या रुग्णांत वाढ होत आहे. अनिल देवराव घोगडे (३५), शिवाणी संपत नन्नावरे (४), सुहासिनी हरिदास जांभुळे हे रुग्ण खडसंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत. रेखा तुळशीराम श्रीरामे (३०), बाळू देवराव दडमल (३५), सुमन रामदास ताजने (५०), पीयूष तुळशिराम श्रीरामे (५), वंदना वामन घेताडे (४५), मंगेश महादेव दडमल (२५), अरुण कवडू श्रीरामे, किरण नन्नावरे (२५), मनिषा रविंद्र श्रीरामे (२०), मंजुळा महादेव दडमल (४५), लक्ष्मण सातपैसे (५०), विनोद सातपैसे (२५), प्रदीप गायकवाड (२१), वेदांत शांताराम ताजने (५०), आणि संगीता संदीप समर्थ यांचा समावेश आहे. हे सर्वजण अमरपुरी भान्सुलीचे रहिवासी आहे. त्यांच्यावर चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतली असती तर एवढे रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली नसती. त्यामुळे याकरीता आरोग्य विभागाचा अलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे तर ग्रामपंचायतने पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताजवळ स्वच्छता व ब्लिचींग पुरवठा वेळेवर केला असता तर गॅस्ट्रोची लागण झाली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. (वार्ताहर)