शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

१८ लाखांचे सौर ऊर्जा संयंत्र कचऱ्यात

By admin | Updated: April 28, 2015 01:23 IST

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सरकार लक्षावधी रुपयांचा खर्च करीत असले तरी यंत्रणांच्या उदासीनतेमुळे

शासकीय आश्रमशाळेतील प्रकार : विहिरीत साचला कचऱ्याचा ढिगशंकर मडावी  देवाडा (राजुरा)आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सरकार लक्षावधी रुपयांचा खर्च करीत असले तरी यंत्रणांच्या उदासीनतेमुळे चांगल्या योजनांचा कसा बट्ट्याबोळ होतो, याची प्रचिती देवाडा येथील शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेत येत आहे. नियोजन करून हा प्रकल्प उभारण्यात न आल्याने लाखो रुपये खर्चूनही हा प्रकल्प निरर्थक ठरला आहे. राजुरा तालुक्यातील देवाडा येथील शासकीय पोस्ट बेसीक आदिवासी आश्रमशाळेत शासनाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सोईसाठी १८ लाख रुपये खर्च करून सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आला. मात्र हा प्रकल्प सध्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडून आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने सदर आश्रमशाळेला भेट दिली असता, हा गंभीर प्रकार उजेडात आला. यासोबतच या आश्रमशाळेत अनेक समस्या असून विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अधीक्षक आणि मुख्याध्यापकांचे अज्ञानदेवाडा येथील आश्रमशाळेत मुला-मुलींना राहण्याची व्यवस्था आहे. त्यांना आंघोळीसाठी गरम पाण्याची गरज असते. यासह विजेसंदर्भातील विविध गरजाही या प्रकल्पातून भागू शकतात, ही बाब लक्षात घेऊनच शासनाने या आश्रमशाळेत सौरऊर्जा प्रकल्प उभारला. हा प्रकल्प दोन भागात उभा आहे. मात्र या प्रकल्पाची अतिशय दुरवस्था झाली असून तो सध्या बंद अवस्थेत आहे. मुळातच वसतिगृह अधीक्षक व मुख्याध्यापकाच्या अज्ञानामुळे हा प्रकल्प चुकीच्या ठिकाणी उभारण्यात आला. कर्मचारी मद्याच्या आहारीयेथील जबाबदार कर्मचारी मद्याच्या आहारी गेले असून दारूच्या नशेत हे कर्मचारी विद्यार्थ्यांशी असभ्य वर्तन करीत असल्याच्या तक्रारी यापूर्वी विद्यार्थिनी केल्यानंतर पंचायत समिती सदस्य व सरपंचांनी वसतिगृह अधीक्षकांविरुद्ध प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र त्या तक्रारीची साधी चौकशीही करण्याचे धाडस अधिकाऱ्यांनी दाखविले नाही.आश्रमशाळेतील विहिरीचीही तीच अवस्थालाखो रुपये खर्च करून आश्रमशाळेत उभारण्यात आलेल्या विहिरीचीही तिच अवस्था झाली आहे. या विहिरीभोवती कचऱ्याचे ढिगारे उभे आहे. या विहिरीतील पाण्याचा वापरदेखील केला जात नसल्याचे वास्तव आहे. याप्रकाराकडे मात्र वसतिगृह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सदर विहिरीसभोवतालचा कचरा स्वच्छ केल्यास या विहिरीतील पाण्याचा वापर केला जाऊ शकतो.लाखो रुपयांचा निधी जातो कुठे? शासकीय वसतीगृहाच्या देखभाल दुरूस्तीसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी दिला जातो. मात्र या निधीचा उपयोग नेमका कशासाठी करण्यात येतो, ही बाब अद्यापही गुलदस्त्यात आहे. या निधीची चौकशी केल्यास मोठे गौडबंगाल उजेडात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.