शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

वरोरा तालुक्यात १७ पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2016 01:05 IST

वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या जंगलात उन्हाळ्याची चाहूल लागताच वन विभागाने जंगलात वन्यप्राण्याची तहान भागविण्यासाठी १७ पानवठे तयार केले आहे.

वनविभागाचा उपक्रम : वन्यप्राण्यांची भटकंती थांबविण्याचा प्रयत्नप्रविण खिरटकर वरोरावनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा अंतर्गत येणाऱ्या जंगलात उन्हाळ्याची चाहूल लागताच वन विभागाने जंगलात वन्यप्राण्याची तहान भागविण्यासाठी १७ पानवठे तयार केले आहे. यामध्ये आठ नैसर्गिक तर नऊ कृत्रीम पाणवठ्याचा समावेश आहे.मागील काही वर्षात वनविभागाने नागरिकांच्या सहकार्याने जिथे जंगल लुप्त झाले होते, त्या ठिकाणी झाडे लावून त्यांची जतन केल्याने अनेक ठिकाणी घनदाट जंगले उभी राहिली आहे. वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात झाला असून वन्यप्राण्यांची संख्याही झपाट्याने वाढली आहे. वन्यप्राण्यांमध्ये निल गाय, हरीण, सांबर, रानडुकर यांच्यासोबत वरोरा तालुक्यातील जंगलात मागील काही वर्षापासून वाघाचे वास्तव्य आहे. घनदाट जंगलामुळे वन्यप्राण्यांना खाद्य जंगलात मिळत असल्याने जंगल बाहेर भटकंती कमी झाल्याचे मानले जात आहे. जंगलगतच्या गावातील बहुतांश कुटुंबीयांना वनविभगाच्या वतीने अनुदानावर गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आल्याने नागरिकांचे सरपणासाठी जंगलात जाणे कमी झाले आहे. यामुळे वन्यप्राणी व मानवी संघर्ष टळत असल्याचे दिसून येत आहे. उन्हाळ्याला मार्च महिन्यापासून सुरुवात झाल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करीत गावामध्ये येऊ नये, याचे नियोजन वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने करीत १७ पाणवठे तयार केले आहे. त्याचे मजबूतीकरण करुन त्यामध्य ेटँकरने पाणी सोडणे सुरु केले आहे. संपूर्ण उन्हाळ्यामध्ये पाणवठ्यात पाणी राहणार असल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी भटकंती करणार नाही, असे मानले जात आहे. १७ पाणवठ्यात १२ बारमाही तर पाच पाणवठे हंगामी आहेत.