शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

वस्ती १६ घरांची; संघर्ष २५ वर्षांचा !

By admin | Updated: April 8, 2016 00:51 IST

गाव आहे पण दळणवळणाला डांबरी रस्ते नाही. विजेचे खांब आहे; पण गावात वीज नाही. माईस कंपनी पाणी पुरवठा करीत असले तरी दगदगही तेवढीच आहे.

गावात शाळाच नाही : कोलामबांधव मुलभूत गरजांपासूनही वंचितशंकर चव्हाण/ संघरक्षित तावाडे जिवतीगाव आहे पण दळणवळणाला डांबरी रस्ते नाही. विजेचे खांब आहे; पण गावात वीज नाही. माईस कंपनी पाणी पुरवठा करीत असले तरी दगदगही तेवढीच आहे. गावात शाळा नाही. अंगणवाडी नाही, अशी विदारक स्थिती स्वातंत्र्याच्या अर्धशतकानंतरही जिवती तालुक्यातील पाटण ग्रामपंचायतमधील पाटागुडा येथील कोलाम बांधव अनुभवत आहेत.लोकमत चमूने या गावाला भेट दिली असता १६ घरांचे हे गाव मागील २५ वर्षांपासून मुलभूत गरजांसाठी प्राणांतिक संघर्ष करीत असल्याचे दिसून आले.उपेक्षित अशा या पाटागुडा कोलाम वस्तीची कहाणीही मोठी केवीलवाणी आहे. येथील लोकांना निवाऱ्याची सोय व्हावी, यासाठी ११ घरकूल मंजूर झाले. त्यापैकी १० घरकुलांचे कामही होत आले. मात्र त्याच घरावर काम करणाऱ्या कोलाम बांधवाना मजुरी मिळाली नसल्याचे बोंब सुरु असून घरकुल बांधकामात आवश्यक साहित्य पाहिजे त्या प्रमाणात वापरले नसल्याचे गावकरी सांगतात. मनकापूर (पंडीतगुडा) गावापासून तीन किमी अंतरावरील कच्च्या रस्त्यावर पाटागुडा हे १६ घरांची वस्ती असलेले कोलामांचे गाव आहे. जेमतेम ६० लोकसंख्या असलेल्या गुड्यात संपूर्ण दारिद्र्य रेषेखालील कुटुंब वास्तव्यास आहे. गावात शाळा नसल्याने कुणालाही शिक्षण घेता आले नाही. आजही हे कोलाम बांधव शिक्षणापासून वंचित आहेत. अंगणवाडी इमारत नाही. अंगणवाडी नाही, पाण्याची टाकी बांधण्यासाठी ग्रामपंचायतीने गेल्या पाच वर्षापूर्वी खड्डा खोदला.पण त्याचे बांधकाम आजही झाले नसून तो खड्डा कोलामांसाठी धोकादायक ठरत आहे. त्याच प्रमाणे चार वर्षापूर्वी गावातील मारु भिमु सिडाम यांना शासनाने घरकूल दिले. त्याचा पायवाही बांधला.परंतु अनुदानाचा पहिला हप्ताही दिला नाही व ग्रामपंचायतीने त्यांच्या घरकुलाचे कामही केले नाही. रेती, दगड, विटा, आजही साक्षीला पडले आहेत.नियमित राशन मिळत नाहीप्रत्येक व्यक्तीला पाच किलो राशन दरमहा शासनाकडून मिळत असले तरी पाटागुडा येथील कोलाम बांधवांना नियमित स्वस्त धान्य तर मिळत नाहीच, पण धान्य मिळाले तरी जनकापूर (पेडीतगुडा) या गावावरुन तीन किमी अंतर पायी चालत जाऊन आणावे लागत असल्याची ओरड पाटागुडा येथील आयु सिडाम, मुत्ता सिडाम, रामू सिडाम, देवराव आत्राम, राजू आत्राम, माधु सिडाम यांनी लोकमतजवळ व्यक्त केली. पाटागुडा गावात निसर्गाचे पाणी अडवून त्या ठिकाणी बोअरवेल मारुन पाण्याची सोय करुन देण्यासाठी त्या ठिकाणी खड्डा खोदला होता. पण ती योजनाच बंद झाल्याने ते काम झाले नाही. त्याच प्रमाणे विजेची सोय व्हावी म्हणून गावात खांब उभे केले. वायरींग झाली पण एकही मीटर नसल्याच्या कारणावरुन विद्युत विभाग वीज पुरवठा करीत नाही.- सीताराम मडावी, सरपंच ग्रा.पं. पाटणलसीकरणालाच शिजते अंगणवाडीची खिचडीगावात कुठले लसीकरण करायचे असल्यावरच यंत्रणेला जाग येते. आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका गावात येतात व गावातील मुले जमा करण्यासाठी त्याच दिवशी खिचडी शिजवितात. असा संतापजनक प्रकार गावकऱ्यांशी बोलल्यावर समोर आला.० ते ६ वयोगटातील बालकांना नियमित पोषण आहार मिळावा, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा, त्यांना शाळेत जाण्याची सवय लागावी. सोबतच कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, हे शासनाचे मुळ उद्देश आहेत. पण गावात अंगणवाडीही नाही आणि खिचडीही शिजत नाही. मग शासनाचे उद्देश साध्य होईल का, यावर आरोग्य विभागाने चिंतन करण्याची गरज आहे.