शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

१५२ कोटी कपातीचा कृषी क्षेत्राला सर्वाधिक फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:27 IST

कृषी विकास योजना ठप्प : लॉकडाऊनमध्ये कृषी क्षेत्रानेच जिल्ह्याला तारले राजेश मडावी चंद्रपूर : जिल्ह्यातील विकास कामांकरिता २०२०-२१ साठी ...

कृषी विकास योजना ठप्प : लॉकडाऊनमध्ये कृषी क्षेत्रानेच जिल्ह्याला तारले

राजेश मडावी

चंद्रपूर : जिल्ह्यातील विकास कामांकरिता २०२०-२१ साठी ६०६.३२ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. यामध्ये १७९.९५ कोटी नियतव्यय तर ४२६.३१ कोटींच्या निधीची अतिरिक्त मागणी होती. मात्र, शासनाने फक्त २२३.६० कोटी मंजूर केले. गतवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या ३७५ कोटींना मंजुरी मिळाली. दरम्यान, कोरोनामुळे तब्बल १५२ कोटींची कपात झाल्याने याचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कृषी क्षेत्रावर झाला.

लॉकडाऊन कालावधीत सर्व उद्योगांना कुलूप लागले असताना कृषी क्षेत्रानेच जिल्ह्याला तारले. मात्र, या वर्षात अनेक योजना कागदावरच राहिल्या आहेत.

खरीप हंगामात नुकसान रब्बीवर संकट

निसर्गाने यंदाच्या खरीप हंगामात शेतकºयांचे मोठे नुकसान केले. आता रब्बी हंगामातही सतत ढगाळ वातावरण राहत असल्याने शेतकरी चिंतातूर आहे. अवकाळी पावसाने कापसाचे सर्वाधिक नुकसान झाले. सोयाबीन व कडधान्याचे नुकसान झाल्याने शेतकºयांची अर्थव्यवस्था कोलमडली.

नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत वर्षे संपले

यंदा पहिल्यांदाच गव्हावर अळी दिसून आली आहे. मावा, तुडतुडे, करप्याचा प्रादूर्भाव झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची भीती आहे. यंदा थंडी कमी असल्याने गव्हासाठी वातावरण प्रतिकूल आहे. भद्रावती, वरोरा, सिंदेवाही, नागभीड या तालुक्यात भाजीपाल्याची लागवड केली जाते. अनेकांच्या वाड्या आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण झाले. मात्र, भरपाई अद्याप मिळाली नाही.

शेतकºयांचे कर्ज खाते प्रथमच अपडेट

१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीतील पीककर्ज, मध्यम मुदतकर्ज व पुनर्गठण झालेल्या थकीत कर्जाची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात लेखा परिक्षकांच्या नियुक्त्या झाल्या. कर्जाच्या तपासणीमुळे शेतकºयांचे बँक खाते सरत्या वर्षात प्रथमच अपडेट झाले. त्यामुळे शेतकºयांना डीसीसी व विविध कार्यकारी सहकारी संस्थांकडून पीककर्ज व मध्यम मुदत कर्ज घेणे शक्य झाले.

आयकर भरणाºयांकडून वसुली

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेणाºया आयकर भरणाºया ५ ०० पेक्षा जास्त शेतकºयांना वसुलीच्या नोटीसा बजावण्यात आल्या. चुकीची माहिती सादर करून या शेतकºयांनी प्रशासनाची दिशाभूल केल्याचा दावा अधिकाºयांनी केला.

४४८ गावांची ५३ हजार ९७८ हेक्टर जमिनमालकी

जंगलाला लागून असलेल्या ५५१ गावांपैकी ४४८ गावांनी अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम अंतर्गत दाखल केलेले सामूहिक वनहक्क दावे जिल्हा समितीने मंजूर केले. त्यामुळे या गावांना ५३ हजार ९७८. ४० हेक्टर क्षेत्राची जमीन मालकी मिळाली आहे.

शेतकरी अपघात विमा ५१ प्रस्ताव फेटाळले

शेतकरी कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतून २ लाखांची मदत मिळते. या विमा योजनेतंर्गत या वर्षात प्रशासनाकडे २८६ प्रस्ताव आले होते. यातील १२३ प्रकरणांचा दावा प्रशासन व विमा कंपनीने मान्य केला. मात्र, ५१ प्रस्ताव फेटाळले.