शहरं
Join us  
Trending Stories
1
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
2
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
3
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
4
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
5
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
6
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
7
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
8
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
9
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
10
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
11
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
12
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
13
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
14
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
17
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
18
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
19
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
20
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

१५ लाख ९३ हजार नागरिकांना मिळणार मोफत धान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:11 IST

चंद्रपूर : कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासनाने यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊनची घोषणा केली. यामुळे संपूर्ण व्यवसाय, बाजारपेठ बंद आहे. अशावेळी ...

चंद्रपूर : कोरोना संकटावर मात करण्यासाठी शासनाने यावर्षीही पुन्हा लाॅकडाऊनची घोषणा केली. यामुळे संपूर्ण व्यवसाय, बाजारपेठ बंद आहे. अशावेळी गरीब नागरिकांचे हाल होऊ नये, त्यांचे पोट भरावे यासाठी प्रथम राज्य सरकारने अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य मोफत वितरित करण्याची घोषणा केली. दरम्यान, आता पुन्हा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तब्बल १५ लाख ९३ हजार ४४३ नागरिकांना मे तसेच जून महिन्याचे धान्य मोफत मिळणार आहे. यामुळे काही प्रमाणात का, होईना गरिबांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशावेळी गरिबांचे मोठे हाल होत आहे. अनेकांच्या हातचा रोजगार गेला आहे. त्यामुळे जगण्याचा प्रश्न आहे. अशावेळी त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी राज्य सरकारने प्राधान्य तसेच अंत्योदय कुटुंबतील सदस्यांना मे महिन्याचे धान्य मोफत देण्याची घोषणा केली. त्यानुसार लाभार्थ्यांना धान्य वितरित केले जात आहे. दरम्यान, आता प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गतही प्राधान्य तसेच अंत्योदय अंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांना प्रती लाभार्थी पाच किलो धान्य मोफत वितरित केले जाणार आहे. यामध्ये ३ किलो गहू तसेच २ किलो तांदळाचा समावेश आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदयचे ५ लाख १५ हजार ४७५ तर प्राधान्य गटातील १० लाख ७७ हजार ९६८ सदस्यांना ७ हजार ९६९ मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात येणार आहे. यासाठी प्रशासकीय स्तरावर धान्य वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून लाभार्थ्यांना मे आणि जून महिन्यामध्ये सदर धान्य मोफत मिळणार आहे.

बाॅक्स

एकूण लाभार्थी

१५,९३,४४३

अंत्योदय लाभार्थी

५,१५,४७५

प्राधान्य कुटुंब सदस्य

१०,७७,९६८

--

बाॅक्स

धान्य मे. टनमध्ये

गहू -४,७४२

तांदूळ - ३,२२७

एकूण- ७,९६९

बाॅक्स

काय मिळणार

३ किलो तांदूळ

२ किलो गहू (प्रती सदस्य)

कोट

अन्नसुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मे आणि जून या महिन्याकरिता प्रती सदस्य ५ किलो धान्य प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत वितरित करण्याबाबत शासनाकडून निर्देश प्राप्त झाले आहे. रास्तभाव दुकानात सदर धान्य पोहोचते करण्याची कार्यवाही सुरू आहे. लाभार्थी नियमित धान्यासोबतच मोफतचे धान्य एकाच वेळी उचल करू शकतात. या महिन्यात नियमित धान्यसुद्धा राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे मोफत मिळणार आहे.

- भारत तुंबडे

अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी, चंद्रपूर

बाॅक्स

येथे करा तक्रार

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील सदस्यांना मोफत धान्य मिळणार आहे. अशावेळी रास्त भाव दुकानदारांनी पैशाची मागणी केल्यास १८००२२४९५० या क्रमांकावर तक्रारही करता येणार आहे.