शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१२ हजारांवर कोतवालांना हवा हक्काचा पगार !

By admin | Updated: December 11, 2015 01:24 IST

इंग्रज काळापासून शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राज्यातील १२ हजार ६३६ कोतवाल यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघटित झाले आहेत.

बल्लारपूर/ नंदोरी: इंग्रज काळापासून शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राज्यातील १२ हजार ६३६ कोतवाल यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघटित झाले आहेत. आम्हाला पाच हजार रूपयांचे तुटपुंजे मानधन नको तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सन्मानपूर्वक शासनाच्या सेवेत सहभागी करा, अशी मागणी घेऊन राज्यभरातील कोतवाल नागपूरच्या विधानसभेवर पायदळ मोर्चाची धडक देणार आहेत. सरकारने मागणी ऐकली नाही तर जिथे अडविले तिथेच १६ डिसेंबरला ठिय्या देण्याचा निर्धारही राज्य कोतवाल संघटनेने व्यक्त केला आहे.महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्याच्या आधीपासून कोतवालांची पदे आहेत. या कोतवालांकडे गावात दवंडी घालणे, शेतकऱ्यांकडून महसूल, शेतसारा गोळा करणे, सरकारच्या वतीने बजावण्यात येणाऱ्या नोटीस तामिल करणे, रेती घाट, गिट्ट-मूरूम खदाणींवर पाळत ठेवणे, गौण खनिजांची चोरी रोखणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती प्रशासनाला कळविणे, तलाठी व मंडल स्तरावर सांगितली जाणारी कामे करणे अशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. एका साझ्यामध्ये किमान सहा गावे असतात. त्यात एक तलाठी आणि एक कोतवाल असतो. या सर्व गावातील शेतकरी आणि महसूल विभाग यांच्या समन्वय राखणारा घटक म्हणून कोतवालांकडे पाहीले जाते. मात्र जबाबदाऱ्यांच्या तुलनेत त्यांना मिळणारे मानधन अल्प आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ आणि मागणीसाठी राज्य कोतवाल संघटनेने १४ ते १६ डिसेंबर या काळात वर्धा ते नागपूर अशा पायदळ मोर्चाचे आयोजन केले आहे. १६ तारखेपर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास १६ डिसेंबरला विधानभवनासमोच बेमुदत ठिय्या देण्याचा त्यांचा निर्धार आहे.या मागण्यांसंदर्भात मंत्रीस्तरावर अनेकदा निवेदने देण्यात आली. काँग्रेसच्या काळात तत्कालिन आमदार सुधीत मुनगंटीवार यांनी कोतवालांची दखल घऊन त्यांचे मानधन अडीच हजारांवरून पाच हजारांवर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. वित्तमंत्री झाल्यावर कोतवाल संघटनेने गतवर्षी सत्कार केला असता वर्षभर थांबण्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र आता अर्थ मंत्रालय आणि महसूल मंत्रालयाकडून फाईलची टोलवाटोलवी सुरू असल्याचा अनुभव कोतवालांना येत आहे. (लोकमत चमू)