शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

१२ हजारांवर कोतवालांना हवा हक्काचा पगार !

By admin | Updated: December 11, 2015 01:24 IST

इंग्रज काळापासून शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राज्यातील १२ हजार ६३६ कोतवाल यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघटित झाले आहेत.

बल्लारपूर/ नंदोरी: इंग्रज काळापासून शेतकऱ्यांकडून महसूल गोळा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे राज्यातील १२ हजार ६३६ कोतवाल यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने संघटित झाले आहेत. आम्हाला पाच हजार रूपयांचे तुटपुंजे मानधन नको तर, चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सन्मानपूर्वक शासनाच्या सेवेत सहभागी करा, अशी मागणी घेऊन राज्यभरातील कोतवाल नागपूरच्या विधानसभेवर पायदळ मोर्चाची धडक देणार आहेत. सरकारने मागणी ऐकली नाही तर जिथे अडविले तिथेच १६ डिसेंबरला ठिय्या देण्याचा निर्धारही राज्य कोतवाल संघटनेने व्यक्त केला आहे.महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येण्याच्या आधीपासून कोतवालांची पदे आहेत. या कोतवालांकडे गावात दवंडी घालणे, शेतकऱ्यांकडून महसूल, शेतसारा गोळा करणे, सरकारच्या वतीने बजावण्यात येणाऱ्या नोटीस तामिल करणे, रेती घाट, गिट्ट-मूरूम खदाणींवर पाळत ठेवणे, गौण खनिजांची चोरी रोखणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती प्रशासनाला कळविणे, तलाठी व मंडल स्तरावर सांगितली जाणारी कामे करणे अशा जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. एका साझ्यामध्ये किमान सहा गावे असतात. त्यात एक तलाठी आणि एक कोतवाल असतो. या सर्व गावातील शेतकरी आणि महसूल विभाग यांच्या समन्वय राखणारा घटक म्हणून कोतवालांकडे पाहीले जाते. मात्र जबाबदाऱ्यांच्या तुलनेत त्यांना मिळणारे मानधन अल्प आहे. या अन्यायाच्या निषेधार्थ आणि मागणीसाठी राज्य कोतवाल संघटनेने १४ ते १६ डिसेंबर या काळात वर्धा ते नागपूर अशा पायदळ मोर्चाचे आयोजन केले आहे. १६ तारखेपर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास १६ डिसेंबरला विधानभवनासमोच बेमुदत ठिय्या देण्याचा त्यांचा निर्धार आहे.या मागण्यांसंदर्भात मंत्रीस्तरावर अनेकदा निवेदने देण्यात आली. काँग्रेसच्या काळात तत्कालिन आमदार सुधीत मुनगंटीवार यांनी कोतवालांची दखल घऊन त्यांचे मानधन अडीच हजारांवरून पाच हजारांवर करण्यासाठी पुढाकार घेतला होता. वित्तमंत्री झाल्यावर कोतवाल संघटनेने गतवर्षी सत्कार केला असता वर्षभर थांबण्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र आता अर्थ मंत्रालय आणि महसूल मंत्रालयाकडून फाईलची टोलवाटोलवी सुरू असल्याचा अनुभव कोतवालांना येत आहे. (लोकमत चमू)