शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

वाहनधारकांकडून वसूल केला १.१४ कोटींचा दंड

By admin | Updated: November 23, 2014 23:15 IST

वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे,

पोलिसांची कामगिरी : ४८ हजार ४३५ वाहनधारकांवर कारवाईचंद्रपूर : वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, त्यांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाने चालू वर्षामध्ये विविध मोहीम राबवून वाहनधारकांना नियमांची ओळख करून दिली आहे. एवढेच नाही तर, ज्यांनी नियम तोडले त्यांच्याकडून मागील १० महिन्यांमध्ये तब्बल १ कोटी १४ लाख रुपये दंड वसुल केला आहे.चंद्रपूर शहराचा विचार केल्यास मागील १० महिन्यांत २८ हजार ५३० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ३३ लाख ५३ हजार ५० रुपयांचा दंड वसुल केला आहे. यात सर्वाधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. सर्वाधिक दंड वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या तथा पीयुसी नसलेल्या वाहनधारकांकडून वसुल केला गेला आहे. चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. वाहतूक विभागाने ३०२ वाहनांवर कारवाई करीत २ लाख ९६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. तर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ५ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ९० हजार ३५० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.ग्रामीण क्षेत्रातही वाहनधारक पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करीत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. काही वाहनधारकांवर ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमार्फत कारवाई करण्यात आली. मागील १० महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये १९ हजार ८९६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६७ लाख १४ हजार १३० रुपये वसूल करण्यात आले आहे. यात १७ हजार ३२३ वाहनधारकांकडून २२ लाख २९ हजार ९५० रुपये, ६७३ ओव्हरलोड वाहनधारकांकडून २५ लाख ९७ हजार ७८० रुपये तसेच अवैध यात्रा परिवहन करणाऱ्या १ हजार ९०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १८ लाख ८६ हजार ४०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. दंड वसुल केला असला तरी वाहनधारक वाहतूक नियमानुसार वाहन वाचविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.(नगर प्रतिनिधी)