शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वाहनधारकांकडून वसूल केला १.१४ कोटींचा दंड

By admin | Updated: November 23, 2014 23:15 IST

वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे,

पोलिसांची कामगिरी : ४८ हजार ४३५ वाहनधारकांवर कारवाईचंद्रपूर : वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, त्यांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाने चालू वर्षामध्ये विविध मोहीम राबवून वाहनधारकांना नियमांची ओळख करून दिली आहे. एवढेच नाही तर, ज्यांनी नियम तोडले त्यांच्याकडून मागील १० महिन्यांमध्ये तब्बल १ कोटी १४ लाख रुपये दंड वसुल केला आहे.चंद्रपूर शहराचा विचार केल्यास मागील १० महिन्यांत २८ हजार ५३० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ३३ लाख ५३ हजार ५० रुपयांचा दंड वसुल केला आहे. यात सर्वाधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. सर्वाधिक दंड वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या तथा पीयुसी नसलेल्या वाहनधारकांकडून वसुल केला गेला आहे. चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. वाहतूक विभागाने ३०२ वाहनांवर कारवाई करीत २ लाख ९६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. तर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ५ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ९० हजार ३५० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.ग्रामीण क्षेत्रातही वाहनधारक पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करीत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. काही वाहनधारकांवर ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमार्फत कारवाई करण्यात आली. मागील १० महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये १९ हजार ८९६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६७ लाख १४ हजार १३० रुपये वसूल करण्यात आले आहे. यात १७ हजार ३२३ वाहनधारकांकडून २२ लाख २९ हजार ९५० रुपये, ६७३ ओव्हरलोड वाहनधारकांकडून २५ लाख ९७ हजार ७८० रुपये तसेच अवैध यात्रा परिवहन करणाऱ्या १ हजार ९०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १८ लाख ८६ हजार ४०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. दंड वसुल केला असला तरी वाहनधारक वाहतूक नियमानुसार वाहन वाचविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.(नगर प्रतिनिधी)