शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वाहनधारकांकडून वसूल केला १.१४ कोटींचा दंड

By admin | Updated: November 23, 2014 23:15 IST

वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे,

पोलिसांची कामगिरी : ४८ हजार ४३५ वाहनधारकांवर कारवाईचंद्रपूर : वाहतूक सुरळीत चालावी यासाठी वाहतूक विभागाने अनेक नियम लावून दिले आहे. मात्र वाहनधारक नियमांना पायदळी तुडवीत अपघातांना आमंत्रण देत आहे. वाहनधारकांनी नियमांचे पालन करावे, त्यांना शिस्त लागावी यासाठी वाहतूक विभागाने चालू वर्षामध्ये विविध मोहीम राबवून वाहनधारकांना नियमांची ओळख करून दिली आहे. एवढेच नाही तर, ज्यांनी नियम तोडले त्यांच्याकडून मागील १० महिन्यांमध्ये तब्बल १ कोटी १४ लाख रुपये दंड वसुल केला आहे.चंद्रपूर शहराचा विचार केल्यास मागील १० महिन्यांत २८ हजार ५३० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात ३३ लाख ५३ हजार ५० रुपयांचा दंड वसुल केला आहे. यात सर्वाधिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. सर्वाधिक दंड वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या तथा पीयुसी नसलेल्या वाहनधारकांकडून वसुल केला गेला आहे. चंद्रपूर शहरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. वाहतूक विभागाने ३०२ वाहनांवर कारवाई करीत २ लाख ९६ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे. तर ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या ५ वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ९० हजार ३५० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.ग्रामीण क्षेत्रातही वाहनधारक पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेक करीत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरु आहे. काही वाहनधारकांवर ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमार्फत कारवाई करण्यात आली. मागील १० महिन्यांमध्ये जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये १९ हजार ८९६ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६७ लाख १४ हजार १३० रुपये वसूल करण्यात आले आहे. यात १७ हजार ३२३ वाहनधारकांकडून २२ लाख २९ हजार ९५० रुपये, ६७३ ओव्हरलोड वाहनधारकांकडून २५ लाख ९७ हजार ७८० रुपये तसेच अवैध यात्रा परिवहन करणाऱ्या १ हजार ९०० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात १८ लाख ८६ हजार ४०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. दंड वसुल केला असला तरी वाहनधारक वाहतूक नियमानुसार वाहन वाचविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी अपघाताच्या संख्येत वाढ झाली आहे.(नगर प्रतिनिधी)