शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार १०८९ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:28 IST

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी पैशाची कमतरता पडू नये, याकरिता जिल्ह्याच्या सहकार विभागामार्फत ६ जून २०१९ रोजी कर्ज वाटपासाठी तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील शेतकºयांसाठी यावर्षी १०८९ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, हे विशेष.

ठळक मुद्देजिल्ह्यासाठी उद्दिष्ट : ६ जूनला प्रत्येक तालुक्यात कर्जवाटप मेळावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी पैशाची कमतरता पडू नये, याकरिता जिल्ह्याच्या सहकार विभागामार्फत ६ जून २०१९ रोजी कर्ज वाटपासाठी तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी १०८९ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, हे विशेष.राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलता दाखवत बँकांनी कर्जपुरवठा करावा, याबाबतीत बँकांवर देखरेख ठेवण्यासाठी अग्रणी बँकेने तशी व्यवस्था निर्माण करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यंदा ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करणार नाही व शेतकऱ्यांची अडवणूक करतील, अशा बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बँकांना दिलेला आहे.चंद्रपूर जिल्ह्याला खरीप हंगामात १०८९ कोटी १५ लाख ५० हजार कर्जवाटपाचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना सहज कर्जपुरवठा करता यावा, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रत्येक तालुक्याच्या बँक शाखेत ६ जून रोजी कर्ज वाटप मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.शेतकऱ्यांना सदर मेळाव्यात तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर मेळाव्याला संबंधित तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे गटसचिव व तालुक्यातील संबंधित सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका व सेवा सहकारी संस्था सोसायटीमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.शेतकऱ्यांनी अद्यावत सातबारा, गाव नमुना आठ-अ, आधार कार्ड दोन पासपोर्ट फोटो या आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सहकार विभागामार्फत करण्यात आलेले आहे.कापूस पेरावे की सोयाबीन? शेतकरी संभ्रमातशेतकºयांनी खरीप हंगामाकडे वेगाने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी नापिकी, उत्पादन खर्च जास्त उत्पादन कमी, वाढता मजूर दर, खताच्या किमती विचारात घेता आता शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. शेती फायद्याची व्हावी, यासाठी कापसाची लागवड करावी की सोयाबीनची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दोन्ही नगदी पिके आहे. परंतु दोन्ही पिकाला लागणारा खर्च जवळजवळ सारखाच आहे. परंतु मालाला भाव मात्र तोकडा मिळत आहे. पूर्वी सोयाबिन पेरुन डवरणी केली असता व एक खताची मात्रा दिली असता भरघोस सोयाबिनचे उत्पादन होत होते. परंतु आज ती परिस्थिती नाही. आज सोयाबिनची बियाण्याची बॅग अडीच ते तीन हजार रुपयाची आहे व त्याच्या तणनाशकाचा खर्च व निंदन खूरपण, खताची मात्रा, या सर्व गोष्टीचा विचार करता शेतकऱ्याच्या हातात त्याचा मेहनतीची किंवा केलेल्या कष्टाचाही पैसा मिळत नाही. तीच परिस्थिती आज कापसाचीदेखील आहे. नगदी व वार्षिक कमी खर्चाचे पिक म्हणून शेतकºयाने कापसाला पसंती दिली होती. परंतु आजच्या घडीला कापसाचाही खर्च कमी राहिलेला नाही आहे. आज फवारणीचा भाव वाढलेला आहे. पूर्वी एक, दोन फवाणीत काम व्हायचे. आज तणनाशकाच्याच दोन ते तीन फवारण्या करण्या लागत आहे. व इतर सहा खात फवारण्याही कराव्या लागत आहे व वेचणीचा खर्चही मजूर टंचाईमुळे वाढलेला आहे. कापसावर अलिकडे अनेक रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. तसेच भावही पाच ते सहा हजारादरम्यान असतो. यावर्षी पाच हजार दराने शेतकऱ्यांनी कापूस विकला व नंतर शासनाने भाव सहा हजार रुपये केला. त्याचा फायदा शेतकºयाला न होता व्यापाºयाला अधिक झाला. त्यामुळे यंदा सोयाबीन पेरावे की कापूस या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.मजुरांची टंचाई व वाढतात मजुरीचे दरआज शेतात शेती कामाला मजूर वर्ग मिळत नाही आहे. त्यामुळे मजुराची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने त्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. आजच्या घडीला सालगड्याचीच वार्षिक मजुरी ही एक ते दीड लाखाच्या घरात पोहचली आहे. महिन्याची दिवसाची मजुरी ही दीडशे ते दोनशे रुपये झाली आहे. तर पुरुष वर्गाची मजुरी ही ३०० ते पाचशे रुपये झाली आहे. त्यामुळे शेतात खर्च करुन शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीस आला आहे.६ जून रोजी प्रत्येक तालुक्याच्या बँक शाखेत कर्ज वाटप मेळावे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याला हजर राहून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीककजार्चा लाभ घ्यावा,-डी. आर. खाडे, जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूरशासनाने शेत मालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव द्यावा व सरकारतर्फे शेती मालाची खरेदी व्हावी. जेणेकरुन कसलीही हमाली, दलाली द्यावी लागणार नाही.-पंढरीनाथ उपरे, शेतकरी, पळसगाव

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज