शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार १०८९ कोटींचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:28 IST

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी पैशाची कमतरता पडू नये, याकरिता जिल्ह्याच्या सहकार विभागामार्फत ६ जून २०१९ रोजी कर्ज वाटपासाठी तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील शेतकºयांसाठी यावर्षी १०८९ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, हे विशेष.

ठळक मुद्देजिल्ह्यासाठी उद्दिष्ट : ६ जूनला प्रत्येक तालुक्यात कर्जवाटप मेळावे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांच्या खरेदीसाठी पैशाची कमतरता पडू नये, याकरिता जिल्ह्याच्या सहकार विभागामार्फत ६ जून २०१९ रोजी कर्ज वाटपासाठी तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यावर्षी १०८९ कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, हे विशेष.राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांप्रति संवेदनशीलता दाखवत बँकांनी कर्जपुरवठा करावा, याबाबतीत बँकांवर देखरेख ठेवण्यासाठी अग्रणी बँकेने तशी व्यवस्था निर्माण करावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यंदा ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करणार नाही व शेतकऱ्यांची अडवणूक करतील, अशा बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील बँकांना दिलेला आहे.चंद्रपूर जिल्ह्याला खरीप हंगामात १०८९ कोटी १५ लाख ५० हजार कर्जवाटपाचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना सहज कर्जपुरवठा करता यावा, यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रत्येक तालुक्याच्या बँक शाखेत ६ जून रोजी कर्ज वाटप मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.शेतकऱ्यांना सदर मेळाव्यात तत्काळ पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर मेळाव्याला संबंधित तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे गटसचिव व तालुक्यातील संबंधित सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका व सेवा सहकारी संस्था सोसायटीमार्फत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित राहणार आहेत.शेतकऱ्यांनी अद्यावत सातबारा, गाव नमुना आठ-अ, आधार कार्ड दोन पासपोर्ट फोटो या आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सहकार विभागामार्फत करण्यात आलेले आहे.कापूस पेरावे की सोयाबीन? शेतकरी संभ्रमातशेतकºयांनी खरीप हंगामाकडे वेगाने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी नापिकी, उत्पादन खर्च जास्त उत्पादन कमी, वाढता मजूर दर, खताच्या किमती विचारात घेता आता शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. शेती फायद्याची व्हावी, यासाठी कापसाची लागवड करावी की सोयाबीनची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दोन्ही नगदी पिके आहे. परंतु दोन्ही पिकाला लागणारा खर्च जवळजवळ सारखाच आहे. परंतु मालाला भाव मात्र तोकडा मिळत आहे. पूर्वी सोयाबिन पेरुन डवरणी केली असता व एक खताची मात्रा दिली असता भरघोस सोयाबिनचे उत्पादन होत होते. परंतु आज ती परिस्थिती नाही. आज सोयाबिनची बियाण्याची बॅग अडीच ते तीन हजार रुपयाची आहे व त्याच्या तणनाशकाचा खर्च व निंदन खूरपण, खताची मात्रा, या सर्व गोष्टीचा विचार करता शेतकऱ्याच्या हातात त्याचा मेहनतीची किंवा केलेल्या कष्टाचाही पैसा मिळत नाही. तीच परिस्थिती आज कापसाचीदेखील आहे. नगदी व वार्षिक कमी खर्चाचे पिक म्हणून शेतकºयाने कापसाला पसंती दिली होती. परंतु आजच्या घडीला कापसाचाही खर्च कमी राहिलेला नाही आहे. आज फवारणीचा भाव वाढलेला आहे. पूर्वी एक, दोन फवाणीत काम व्हायचे. आज तणनाशकाच्याच दोन ते तीन फवारण्या करण्या लागत आहे. व इतर सहा खात फवारण्याही कराव्या लागत आहे व वेचणीचा खर्चही मजूर टंचाईमुळे वाढलेला आहे. कापसावर अलिकडे अनेक रोगाचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. तसेच भावही पाच ते सहा हजारादरम्यान असतो. यावर्षी पाच हजार दराने शेतकऱ्यांनी कापूस विकला व नंतर शासनाने भाव सहा हजार रुपये केला. त्याचा फायदा शेतकºयाला न होता व्यापाºयाला अधिक झाला. त्यामुळे यंदा सोयाबीन पेरावे की कापूस या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.मजुरांची टंचाई व वाढतात मजुरीचे दरआज शेतात शेती कामाला मजूर वर्ग मिळत नाही आहे. त्यामुळे मजुराची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने त्याच्या दरात वाढ झालेली दिसून येत आहे. आजच्या घडीला सालगड्याचीच वार्षिक मजुरी ही एक ते दीड लाखाच्या घरात पोहचली आहे. महिन्याची दिवसाची मजुरी ही दीडशे ते दोनशे रुपये झाली आहे. तर पुरुष वर्गाची मजुरी ही ३०० ते पाचशे रुपये झाली आहे. त्यामुळे शेतात खर्च करुन शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीस आला आहे.६ जून रोजी प्रत्येक तालुक्याच्या बँक शाखेत कर्ज वाटप मेळावे आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्याला हजर राहून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीककजार्चा लाभ घ्यावा,-डी. आर. खाडे, जिल्हा उपनिबंधक, चंद्रपूरशासनाने शेत मालाला उत्पादन खर्चाच्या दुप्पट हमीभाव द्यावा व सरकारतर्फे शेती मालाची खरेदी व्हावी. जेणेकरुन कसलीही हमाली, दलाली द्यावी लागणार नाही.-पंढरीनाथ उपरे, शेतकरी, पळसगाव

टॅग्स :Crop Loanपीक कर्ज