शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

राजुऱ्यात साकारणार १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय

By admin | Updated: September 3, 2014 23:15 IST

चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात अनेक उद्योगही आहेत. त्यामुळे येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णाललय निर्माण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. आमदार सुभाष धोटे

दिलासा : सुभाष धोटे यांच्या प्रयत्नांना यशचंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा आहे. राजुरा, कोरपना तालुक्यात अनेक उद्योगही आहेत. त्यामुळे येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णाललय निर्माण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. आमदार सुभाष धोटे यांनी या मागणीचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी प्राप्त करून घेतली होती. ८ कोटी ४३ लाख ४६ हजार एवढ्या रकमेच्या अंदाजपत्रक व नकाशांना प्रशासकीय मान्यता देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी आठ कोटी ४३ लाख ४६ हजार एवढ्या रकमेच्या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. त्यामुळे लवकरच १०० खाटांचे हे रुग्णालय नागरिकांच्या सेवेत येणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणाऱ्या आठ कोटी रुपयांच्या आर्थिक प्रस्तावास मान्यता दिल्याचे आरोग्य सेवा संचालनालयाचे १४ जानेवारी २०१४ रोजी निर्गमीत करण्यात आलेले पत्र नुकतेच २ सप्टेंबर २०१४ रोजी प्राप्त झाले असून लवकरच राजुरा येथे या उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू होणार आहे. सदर उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे खेचून आणल्यात आमदार सुभाष धोटे यांनी शासन दरबारी पुर्ण ताकद लावली होती. त्यामुळेच १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे साकार होत आहे. राजुरा विधानसभा क्षेत्र अतिदुर्गम व नक्षलग्रस्त असून या क्षेत्रात एकही १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय नव्हते या उपजिल्हा रुग्णालयाच्या निर्मितीमुळे संबंधित कोरपना व जिवती तालुक्यातील रुग्णांनाही या उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ मिळणार आहे. तसेच सीमेलगतच्या तेलंगाना राज्यातील अनेक गावातील अनेक रुग्ण थेट चंद्रपूरला उपचारासाठी जात असतात. त्यांंनाही आता राजुरा येथे उपचार घेण्याची संधी या रुग्णालयामुळे मिळणार आहे.राजुरा येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय निर्माण व्हावे, अशी या परिसरातील नगारिकांची अनेक दिवसांपासून मागणी होती. त्यामुळे आपल्या मतदार संघातील नागरिकांच्या आरोग्य सुदृढ राहावे, त्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळावा, छोट्या छोट्या व्याधीसाठी चंद्रपूरला जावे लागु नये, या बाबीचा विचार करुन आमदार सुभाष धोटे यांनी हा ज्वलंत प्रश्न शासनाकडे लावून धरला होता व अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. (नगर प्रतिनिधी)