शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख १७ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By admin | Updated: June 13, 2017 00:35 IST

गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले होते.

चंद्रपूर : गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले होते. तर यावर्षी खरीप हंगामामध्ये मे अखेरीस ४५ हजार १५१ शेतकऱ्यांंना कर्ज वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज नसल्याने त्यांना यावर्षी नवीन कर्ज देण्यात आलेले आहे. गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात ७४१ कोटी ४६ लाख ८ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा बँकेने ७७ हजार ५९७ शेतकऱ्यांना ४३३ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपये, राष्ट्रीयकृत बँकांनी ३३ हजार ३६१ शेतकऱ्यांंना २५९ कोटी ५८ लाख ६० हजार रुपये आणि ग्रामीण विकास बँकेने ६ हजार ३९१ शेतकऱ्यांना ४८ कोटी ३५ लाख ६० हजार रुपयांचे पीककर्ज दिले. त्यापैकी जिल्हा बँकेकडून ३५ हजार ३६०, राष्ट्रीयकृत बँक ८ हजार ५५० आणि ग्रामीण बँकेकडून १ हजार २४१ शेतकऱ्यांनी नवीन कर्जाची उचल केली आहे, अशीही माहिती सुत्राने दिली.डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी स्वावलंबन मिशन२००८मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देतानाच विदर्भातील आत्महत्याग्रस्त अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी स्वावलंबन मिशन राबविण्यात आले होते. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपुरक उद्योग व व्यवसाय करण्यासाठी मदत करण्यात आली. तसेच मोठ्या शेतकऱ्यांना कर्जसवलत देण्यात आली होती. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा बँकेअंतर्गत पाच एकपेक्षा अधिक शेती असलेल्या ६ हजार २२७ शेतकऱ्यांना ११ कोटी ११ लाख ५७ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला होता.