शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
3
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
5
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
6
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
7
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
8
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
9
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
10
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
11
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
12
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
13
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
14
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
15
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
16
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
17
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
18
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
19
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
20
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा

१ लाख १७ हजार शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी

By admin | Updated: June 13, 2017 00:35 IST

गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले होते.

चंद्रपूर : गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात जिल्ह्यातील १ लाख १७ हजार ३४९ शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण करण्यात आले होते. तर यावर्षी खरीप हंगामामध्ये मे अखेरीस ४५ हजार १५१ शेतकऱ्यांंना कर्ज वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे थकीत कर्ज नसल्याने त्यांना यावर्षी नवीन कर्ज देण्यात आलेले आहे. गेल्या वर्षी खरीप व रबी हंगामात ७४१ कोटी ४६ लाख ८ हजार रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले. त्यामध्ये जिल्हा बँकेने ७७ हजार ५९७ शेतकऱ्यांना ४३३ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपये, राष्ट्रीयकृत बँकांनी ३३ हजार ३६१ शेतकऱ्यांंना २५९ कोटी ५८ लाख ६० हजार रुपये आणि ग्रामीण विकास बँकेने ६ हजार ३९१ शेतकऱ्यांना ४८ कोटी ३५ लाख ६० हजार रुपयांचे पीककर्ज दिले. त्यापैकी जिल्हा बँकेकडून ३५ हजार ३६०, राष्ट्रीयकृत बँक ८ हजार ५५० आणि ग्रामीण बँकेकडून १ हजार २४१ शेतकऱ्यांनी नवीन कर्जाची उचल केली आहे, अशीही माहिती सुत्राने दिली.डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी स्वावलंबन मिशन२००८मध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देतानाच विदर्भातील आत्महत्याग्रस्त अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला, बुलडाणा व वाशिम या सहा जिल्ह्यांमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख शेतकरी स्वावलंबन मिशन राबविण्यात आले होते. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीपुरक उद्योग व व्यवसाय करण्यासाठी मदत करण्यात आली. तसेच मोठ्या शेतकऱ्यांना कर्जसवलत देण्यात आली होती. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा बँकेअंतर्गत पाच एकपेक्षा अधिक शेती असलेल्या ६ हजार २२७ शेतकऱ्यांना ११ कोटी ११ लाख ५७ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला होता.