शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
3
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
4
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
5
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
6
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
7
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
8
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
9
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
10
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
11
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
12
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
13
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
14
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
15
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
16
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
17
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
18
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
19
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
20
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन

फेसबुकवर आहात? - मग तपासा या 4 सवयी, त्या तुमचं करिअर नासवत तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 15:50 IST

तुम्ही फेसबुक वापरुन आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार की, नेटवर्किग करत स्वतःची इमेज सुधारणार हे तुमची प्रत्येक पोस्ट ठरवते. तेव्हा, जरा सावधान!

ठळक मुद्देआपण फार बोलतो, वाद घालतो, हमरीतुमरीवर येतो का? -तपासा.आपल्या प्रोफेशनल लाईफवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

तुम्ही फेसबुवकर आहात? हा काय प्रश्न झाला, असतोच हल्ली प्रत्येकजण फेसबुकवर! करतोच टाइमपास, चालतेच भंकस! पण आपल्या लक्षातही येत नाही, फेसबुकर आपण जे जे लिहितो, पोस्ट करतो, शेअर करतो, त्या सार्‍यातून लोक आपली परीक्षाच करत असतात. आणि आपण जे अगाध  ज्ञान उधळतो, जो काय उद्धटपणा किंवा बालीशपणा करतो त्यातून आपल्याकडे पाहण्याची ‘नजर’ ही बदलू शकते. तुमच्या एखाद्या पोस्टचा किंवा कमेण्टचा भलताच अर्थ काढत लोकं तुमच्याविषयी बरीवाईट मतं बवनत असतात. मुख्य म्हणजे आभासी जगात हे सारं चालत असलं तरी मतं जी बनतात ती प्रत्यक्ष जगातही कायमच राहतात. हल्ली अनेक तरुण मुल फेसबुक वापरताना काही चुका हमखास करतात किंवा आपल्या नकळत  त्या होतील. त्या चूका कोणत्या, त्या टाळायच्या कशा, यावर एक नजर घालाच.

 

विरोधातली कॉमेण्ट मार डीलीट

काहीही लिहा, कितीही गंभीर असू द्या विषय काहीजण असे असतात तुमच्या पोस्टवर भंकसच करतात. तुम्हा टपली मारतात, विरोधाला विरोध करतात. काहीतरी पांचट कमेण्ट करतात. मुद्दाम तुम्हाला त्रास देतात. पोस्ट कशी तद्दन चुकीची आहे, तुमचा विचारच कसा मूर्खपणाचा आहे असं काहीजण असतात. काही मित्र तर विषय सोडून भलतंच काहीतरी बोलतात. आणि कधीकधी खरंच तुमच्या पोस्टवर कुणीतरी गांभीर्यानं टीका करत तुमच्या मुद्दाच खोडून काढतं. त्यावेळी काय करता तुम्ही? तावातावानं वाद घालता, शिवीगाळ करता, चिडून लिहिता, जातीय टिकाटिपणी करता, व्यंगावरुन शिव्या घालता, समोरच्याची औकात अकारण हुज्जत घालत बसता? हे सगळं इतर लोकं वाचतात तेव्हा काय मत होतं तुमच्याविषयी याचा विचार काही विचार केलाय? अशा वादग्रस्त मतांशी तुम्ही कशी डील करता, काय सभ्यतेनं वाद मिटवता, चूक मान्य करता, माघार घेता किंवा अत्यंत डिप्लोमॅटिक पद्धतीनं गोष्टी हाताळता हे सारं म्हणजे  तुमचे उत्तम प्रोफेशनल असण्याचे गुण. ते तुम्हाला जमलं तर तुम्हाला माणसं हाताळलं जमलं असं. समजा.

 

मला पहा, फुलं वाहा

सेल्फ ऑबसेशन म्हणतात याला. सतत मी-मी. मी अमुक खाल्लं. तमुक खाल्लं, अमुक सिनेमा पाहिला, तो बकवास आहे, मला तमका रंग आवडतो, ढमुकच मी केलं. मी श्वास घेतला आणि सोडला एवढंच लिहायचं काही लोकं बाकी ठेवतात. फक्त स्वतर्‍विषयी बोलतात. स्वतर्‍चेच अनुभव सांगतात. स्वतर्‍ची अखंड जाहिरात करत राहतात. दुसर्‍यांच्या पोस्टवर जाऊनसुद्धा कमेण्टमध्ये मी-मी करत राहतात. हे असं सतत मला पहा, फुलं वाहा. असं पाहून लोकं कंटाळतात. ‘मी-मी’ करणार्‍यांची आत्मप्रौढी इतरांना इरीटेट करते. हळूहळू लोक त्यांना टाळतात तरी किंवा मग अशी माणसं फक्त इतरांच्या गॉसिपचा आणि मनोरंजनाचा विषय ठरतात. विशेषतर्‍ जे तरुण प्रोफेशनल नेटवर्किगसाठी फेसबुक वापरतात निदान त्यांनी तरी हे असं ‘आत्मगान’ टाळायलाच हवं.

 

वॉच युवर क्लॉक

सगळ्यांत महत्त्वाचं, आपण किती थोर, आपल्याला काय काय येतं, पण त्यासाठी आपण खरंच हॅपनिंग असायला हवं. रात्रंदिवस फेसबुकवर राहून तुम्ही ते कसं जमवणार? त्यापेक्षा आपलं काम पूर्ण फोकस्ड करा, दिवसाकाठी फार तर अर्धातास टाइमपास आणि नेटवर्किग साठी द्या. याहून जास्त वेळ दिला तर आपल्या कामावर आपल्याही नकळत परिणाम होतोच.

 

किती बकबक कराल?

काहीजण सतत काही ना काही पोस्ट करतच असतात. इतकं की कधीही फेसबुकवर जा, तेच दिसतात. ते आवारा, कण्ट्रोल करा तुमचं दिसणं आणि व्यक्त होणं. तरच तिथंही तुमच्या शब्दाला काहीतरी मान राहील. नाही तर काय लोक म्हणतात, आहेच सुरु बकबक.