शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी, मोठं अनुदान देण्याचा निर्णय
5
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
6
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
7
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
8
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
9
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
10
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
11
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
12
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
13
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
14
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
15
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
16
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
17
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
18
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
19
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
20
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!

फेसबुकवर आहात? - मग तपासा या 4 सवयी, त्या तुमचं करिअर नासवत तर नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 15:50 IST

तुम्ही फेसबुक वापरुन आपल्या पायावर धोंडा पाडून घेणार की, नेटवर्किग करत स्वतःची इमेज सुधारणार हे तुमची प्रत्येक पोस्ट ठरवते. तेव्हा, जरा सावधान!

ठळक मुद्देआपण फार बोलतो, वाद घालतो, हमरीतुमरीवर येतो का? -तपासा.आपल्या प्रोफेशनल लाईफवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो.

तुम्ही फेसबुवकर आहात? हा काय प्रश्न झाला, असतोच हल्ली प्रत्येकजण फेसबुकवर! करतोच टाइमपास, चालतेच भंकस! पण आपल्या लक्षातही येत नाही, फेसबुकर आपण जे जे लिहितो, पोस्ट करतो, शेअर करतो, त्या सार्‍यातून लोक आपली परीक्षाच करत असतात. आणि आपण जे अगाध  ज्ञान उधळतो, जो काय उद्धटपणा किंवा बालीशपणा करतो त्यातून आपल्याकडे पाहण्याची ‘नजर’ ही बदलू शकते. तुमच्या एखाद्या पोस्टचा किंवा कमेण्टचा भलताच अर्थ काढत लोकं तुमच्याविषयी बरीवाईट मतं बवनत असतात. मुख्य म्हणजे आभासी जगात हे सारं चालत असलं तरी मतं जी बनतात ती प्रत्यक्ष जगातही कायमच राहतात. हल्ली अनेक तरुण मुल फेसबुक वापरताना काही चुका हमखास करतात किंवा आपल्या नकळत  त्या होतील. त्या चूका कोणत्या, त्या टाळायच्या कशा, यावर एक नजर घालाच.

 

विरोधातली कॉमेण्ट मार डीलीट

काहीही लिहा, कितीही गंभीर असू द्या विषय काहीजण असे असतात तुमच्या पोस्टवर भंकसच करतात. तुम्हा टपली मारतात, विरोधाला विरोध करतात. काहीतरी पांचट कमेण्ट करतात. मुद्दाम तुम्हाला त्रास देतात. पोस्ट कशी तद्दन चुकीची आहे, तुमचा विचारच कसा मूर्खपणाचा आहे असं काहीजण असतात. काही मित्र तर विषय सोडून भलतंच काहीतरी बोलतात. आणि कधीकधी खरंच तुमच्या पोस्टवर कुणीतरी गांभीर्यानं टीका करत तुमच्या मुद्दाच खोडून काढतं. त्यावेळी काय करता तुम्ही? तावातावानं वाद घालता, शिवीगाळ करता, चिडून लिहिता, जातीय टिकाटिपणी करता, व्यंगावरुन शिव्या घालता, समोरच्याची औकात अकारण हुज्जत घालत बसता? हे सगळं इतर लोकं वाचतात तेव्हा काय मत होतं तुमच्याविषयी याचा विचार काही विचार केलाय? अशा वादग्रस्त मतांशी तुम्ही कशी डील करता, काय सभ्यतेनं वाद मिटवता, चूक मान्य करता, माघार घेता किंवा अत्यंत डिप्लोमॅटिक पद्धतीनं गोष्टी हाताळता हे सारं म्हणजे  तुमचे उत्तम प्रोफेशनल असण्याचे गुण. ते तुम्हाला जमलं तर तुम्हाला माणसं हाताळलं जमलं असं. समजा.

 

मला पहा, फुलं वाहा

सेल्फ ऑबसेशन म्हणतात याला. सतत मी-मी. मी अमुक खाल्लं. तमुक खाल्लं, अमुक सिनेमा पाहिला, तो बकवास आहे, मला तमका रंग आवडतो, ढमुकच मी केलं. मी श्वास घेतला आणि सोडला एवढंच लिहायचं काही लोकं बाकी ठेवतात. फक्त स्वतर्‍विषयी बोलतात. स्वतर्‍चेच अनुभव सांगतात. स्वतर्‍ची अखंड जाहिरात करत राहतात. दुसर्‍यांच्या पोस्टवर जाऊनसुद्धा कमेण्टमध्ये मी-मी करत राहतात. हे असं सतत मला पहा, फुलं वाहा. असं पाहून लोकं कंटाळतात. ‘मी-मी’ करणार्‍यांची आत्मप्रौढी इतरांना इरीटेट करते. हळूहळू लोक त्यांना टाळतात तरी किंवा मग अशी माणसं फक्त इतरांच्या गॉसिपचा आणि मनोरंजनाचा विषय ठरतात. विशेषतर्‍ जे तरुण प्रोफेशनल नेटवर्किगसाठी फेसबुक वापरतात निदान त्यांनी तरी हे असं ‘आत्मगान’ टाळायलाच हवं.

 

वॉच युवर क्लॉक

सगळ्यांत महत्त्वाचं, आपण किती थोर, आपल्याला काय काय येतं, पण त्यासाठी आपण खरंच हॅपनिंग असायला हवं. रात्रंदिवस फेसबुकवर राहून तुम्ही ते कसं जमवणार? त्यापेक्षा आपलं काम पूर्ण फोकस्ड करा, दिवसाकाठी फार तर अर्धातास टाइमपास आणि नेटवर्किग साठी द्या. याहून जास्त वेळ दिला तर आपल्या कामावर आपल्याही नकळत परिणाम होतोच.

 

किती बकबक कराल?

काहीजण सतत काही ना काही पोस्ट करतच असतात. इतकं की कधीही फेसबुकवर जा, तेच दिसतात. ते आवारा, कण्ट्रोल करा तुमचं दिसणं आणि व्यक्त होणं. तरच तिथंही तुमच्या शब्दाला काहीतरी मान राहील. नाही तर काय लोक म्हणतात, आहेच सुरु बकबक.