लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेड राजा : जनुना तांडा येथील शेतकर्याने शेतातील पिकाची अवस्था पाहून १४ सप्टेंबरला सकाळी १0.३0 वाजता विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. दुष्काळी परिस्थितीचा पहिला बळी जनुना तांड्यातील संतोष पवार हा युवक ठरला आहे. संतोष उकंडा पवार हा आई-वडील, पत्नी, आजोबा आणि दोन मुले मिळून एकत्रित राहत होता. तर भाऊ मोलमजुरीकरिता पुणे येथील कंपनीत काम करतो. आठ एकर शेतात त्याने सोयाबीन, मूग आणि लिंबूची लागवड केली आहे. यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाला. मात्र त्यानंतर जुलै, ऑगस्ट महिन्यात पाऊस पडला नाही. निसर्गाने अवकृपा दाखविल्याने सोयाबीनला शेंगाच लागल्या नाहीत. मूग, उडीद झडतीला लागले नाही. पेरणीचाही खर्च निघत नसल्याने कुटुंबाचे पालनपोषण करावे तरी कसे! या आर्थिक विवंचनेत संतोष पवार याने मृत्यूला जवळ केले. सकाळी ८ वाजता शेतातून गुरांना पाणी पाजून येतो म्हणून तो घराबाहेर पडला. मात्र घरी आला नाही म्हणून त्याची पत्नी शेतात गेली, तर पतीने आत्महत्या केल्याचे तिच्या निदर्शनास आले. घरातील कर्त्या व्यक्तीने जीवनयात्रा संपविल्याने आई-वडील, आजोबा, पत्नी, मुले आधाराविना पोरकी झाली. पोलीस पाटील रामेश्वर कायंदे यांच्या माहितीवरून साखरखेर्डा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
सोयाबीनची अवस्था पाहून युवा शेतकर्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:38 IST
जनुना तांडा येथील शेतकर्याने शेतातील पिकाची अवस्था पाहून १४ सप्टेंबरला सकाळी १0.३0 वाजता विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. दुष्काळी परिस्थितीचा पहिला बळी जनुना तांड्यातील संतोष पवार हा युवक ठरला आहे.
सोयाबीनची अवस्था पाहून युवा शेतकर्याची आत्महत्या
ठळक मुद्देविषारी औषध प्राशन करून आत्महत्याजनुना तांड्यातील युवक ठरला दुष्काळी परिस्थितीचा पहिला बळी