बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी झाला आहे. २0१३ च्या खरीप हंगामात ७१ हजार २८७ मे.टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आले होते; मात्र यंदाच्या खरीप हंगामासाठी मे महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ २४ हजार ७९६ मे. टन खत उपलब्ध झाले आहे. यामुळे खरिपाच्या तोंडावर शेतकर्यांना खतापासून वंचित राहावे लागणार आहे. शेतकर्यांची खरीप हंगामासाठी जोरदार तयारी सुरू असून, शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शिवाय काही ठिकाणी पिकांची लागवडही सुरू आहे. पिकांसाठी आवश्यक रासायनिक खतांची उपलब्धता कमी आहे. येत्या काही महिन्यात खत पुरवठय़ात वाढ होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे; मात्र वर्तमानात खताची कमतरता शेतकर्यांसाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते. हीच बाब लक्षात घेऊन व्यापारीही चढत्या भावाने खतविक्री करीत शेतकर्यांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी ७.४५ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होती. यावर्षी खरीप पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून जिल्हा प्रशासनाने १ लाख ५६ हजार मे. टन खताची मागणी नोंदविली असतानाही मे महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेशा प्रमाणात खतसाठा उपलब्ध झाला नाही.
यंदा खतांचा तुटवडा
By admin | Updated: May 30, 2014 00:37 IST