शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

यंदा खतांचा तुटवडा

By admin | Updated: May 30, 2014 00:37 IST

बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मागणी १.५ लाख टन खताची, उपलब्ध केवळ २४ हजार टन !

बुलडाणा : खरीप हंगामासाठी जिल्ह्यात रासायनिक खतांचा पुरवठा गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी झाला आहे. २0१३ च्या खरीप हंगामात ७१ हजार २८७ मे.टन रासायनिक खत उपलब्ध करून देण्यात आले होते; मात्र यंदाच्या खरीप हंगामासाठी मे महिन्याच्या अखेरपर्यंत केवळ २४ हजार ७९६ मे. टन खत उपलब्ध झाले आहे. यामुळे खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍यांना खतापासून वंचित राहावे लागणार आहे. शेतकर्‍यांची खरीप हंगामासाठी जोरदार तयारी सुरू असून, शेती मशागतीच्या कामांना वेग आला आहे. शिवाय काही ठिकाणी पिकांची लागवडही सुरू आहे. पिकांसाठी आवश्यक रासायनिक खतांची उपलब्धता कमी आहे. येत्या काही महिन्यात खत पुरवठय़ात वाढ होईल, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे; मात्र वर्तमानात खताची कमतरता शेतकर्‍यांसाठी अडचण निर्माण करणारी ठरू शकते. हीच बाब लक्षात घेऊन व्यापारीही चढत्या भावाने खतविक्री करीत शेतकर्‍यांची लुबाडणूक होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी कृषी विभागाकडून खरीप हंगामासाठी ७.४५ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होती. यावर्षी खरीप पेरणी क्षेत्रात वाढ झाली असून जिल्हा प्रशासनाने १ लाख ५६ हजार मे. टन खताची मागणी नोंदविली असतानाही मे महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेशा प्रमाणात खतसाठा उपलब्ध झाला नाही.