शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

महिलेने मागितली इच्छामरणाची परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:25 IST

लोणार तालुक्यात १३ पॉझिटिव्ह लोणार : तालुक्यात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शुक्रवारी सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये भरती ...

लोणार तालुक्यात १३ पॉझिटिव्ह

लोणार : तालुक्यात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शुक्रवारी सापडले आहेत. त्यांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे; तर काही रुग्णांवर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू करण्यात आले आहेत.

बदलत्या हवामानाचा फटका

बुलडाणा : नागरिकांना बदलत्या हवामानाचा फटका बसत आहे. कधी ढगाळ वातावरण, तर कधी ऊन पडत आहे. हे बदलते हवामान रोगराईसाठी आमंत्रण देणारे ठरत आहे. त्यामुळे अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत असल्याचे दिसून येते.

ग्रामपंचायतीला सापडेना नालेसफाईचा मुहूर्त

मेहकर : तालुक्याच्या गावातील तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई करण्यास ग्रामपंचायतीला मुहूर्त सापडत नसल्याचे दिसून येते. बोटांवर मोजण्याइतक्याच ग्रामपंचायतींकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून, उर्वरित सफाईची कामे केव्हा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कपाशीचे लागवड क्षेत्र वाढणार

सिंदखेड राजा : एकेकाळी ‘कॉटन बेल्ट’ म्हणून ओळख असलेल्या वऱ्हाडात कापसाची सातत्याने सरासरीपेक्षा लागवड कमी होत आहे. यामध्ये सिंदखेड राजा तालुक्यात कापसाची लागवड घटलेली होती; परंतु मागील वर्षी सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना फटका दिल्याने यंदा सिंदखेड राजा तालुक्यात कपाशीचे लागवड क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.

नक्कल विभागाला संगणकीकरणाची गरज

बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक तहसील कार्यालयांत नक्कल विभागात सुविधांचा अभाव आहे. शेतजमिनीचे फेरफार, कोतवाल बुकाची प्रत मिळविण्यासाठी जाणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना या विभागात इंग्रज काळापासून असलेली दप्तरी नोंद जीर्ण झालेली आहे. या संपूर्ण मालमत्तेच्या कागदपत्राची संगणकीकृत नोंद होणे आवश्यक आहे.

शहर स्वच्छतेसाठी पालिका सरसावली

लोणार : शहरातील स्वच्छतेसाठी पालिका कर्मचारी सरसावले आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहरातील अंतर्गत स्वच्छता कमालीची ढासळली होती. कचरा, नालेसफाई, सांडपाण्याची विल्हेवाट यांवर लक्ष देण्यात येणार आहे.

पाणीबचतीचे संदेश लक्षवेधी

सिंदखेड राजा : सध्या तालुक्यातील अनेक भागांत तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. कित्येक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होत आहे. जनजागृतीसाठी प्रशासनातर्फे देण्यात येणारे पाणीबचतीचे संदेश लक्ष वेधणारे ठरत आहेत. परिसरातील ग्रामपंचायत, शाळा-महाविद्यालये अशा अनेक ठिकाणी पाणीबचतीचे संदेश लावण्यात आलेले आहेत.

कमी दाबाच्या वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त

देऊळगाव मही : काही ठिकाणी विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विद्युत पुरवठ्याचा कमी-अधिक दाब होत असल्याने विद्युत उपकरणे धोक्यात आले आहेत. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र समस्यांच्या गर्तेत

बुलडाणा : जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रे विविध समस्यांच्या गर्तेत सापडत आहेत. रुग्णांकरिता विविध सुविधांचा अभाव असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्य केंद्रात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य केंद्रांतील स्वच्छतेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

नदी खोलीकरण कामाला कोरोनाचा फटका

धामणगाव बढे : मागील वर्षी टाकळी शिराळ येथे भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासन यांच्यातर्फे राबविल्या जात असलेल्या सुजलाम‌् सुफलाम‌् प्रकल्पांतर्गत जिल्हा परिषद सिंचन यांच्या कार्यक्षेत्रातील नदी खोलीकरण करण्यात आले होते. परंतु यंदा नदी खोलीकरणाच्या कामाला कोरोनाचा फटका बसला आहे.

अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्यांचा अभाव

अमडापूर : ग्रामीण भागातील लहान बालकांसाठी शासनाने बालविकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत अंगणवाड्या सुरू केल्या आहेत. मात्र अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र खोल्या नसल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत अंगणवाड्यातील पोषण आहाराचे धान्य ठेवायचे, कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी

सुलतानपूर : शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य पाऊस पडेपर्यंत पेरणी करण्याची घाई करू नये. बियाण्याला शिफारशीनुसार बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. जेणेकरून पीक जोमदार वाढीस लागेल, असे मत शेतीशाळा तज्ज्ञांकडून व्यक्त केले. कृषी विभागाकडून गावोगावी खरीपपूर्व नियोजनाच्या ऑनलाइन सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा करणारे टँकर गायब

बुलडाणा : हंडाभर पाण्यासाठी लहान मुले व महिलांना वणवण भटकावे लागत आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टँकर सुरू केले आहेत; परंतु काही ठिकाणी पाणीपुरवठा करणारे टँकर कमी खेपा मारत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करणारे टँकर गायब कसे होतात, असा प्रश्न नागरिकांना पडतो.