शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

वन्यप्राण्यांना पाणवठय़ांची वानवा

By admin | Updated: May 11, 2015 02:13 IST

अभयारण्यात प्राणी हजारांवर; पाण्याअभावी होतेय भटकंती.

बुलडाणा : जिल्ह्यातील अभयारण्यामध्ये वन्यप्राण्यांची संख्या झापाट्याने वाढत आहे; मात्र सूर्य आग ओकत असताना या मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागते. नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेमध्ये हे वास्तव पुढे आले. जंगलातील नैसर्गिक पाणवठय़ांशिवाय यावर्षी नव्याने एकही पाणवठा वनविभगाने उपलब्ध करून दिला नसल्याची माहिती आहे. बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा, अंबाबारवा आणि लोणार हे अभयारण्य ३३0३४.0२ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावर पसरले आहेत. या अभयारण्यात वेगवेगळ्या जातीचे हजारो वन्यप्राणी आहेत; मात्र एप्रिल, मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना, या मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात पाणवठे निर्माण करणे गरजेचे असताना यावर्षी मे महिन्यापर्यंत अभयारण्यात एकही नवा पाणवठा तयार केला नव्हता. या अभयारण्यात मागील वर्षी वन्यप्राण्यांसाठी सुमारे १0४ पाणवठय़ांची निर्मिती करण्यात आली होती. त्यामध्ये टँकरद्वारे नियमित पाणी टाकण्याचे काम वनविभागाला करावे लागते. तथापि, एकदा कागदावर पाणवठे तयार झाले म्हणजे त्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही. दुसरीकडे मात्र या पाणवठय़ावर कागदोपत्री नियमित टँकरद्वारे पाणी पडत असल्याचे सांगितले जात आहे.