शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले

By admin | Updated: May 29, 2014 00:50 IST

निधी अभावी गेल्या दोन वर्षापासून या योजनेचे काम रखडले आहे.

बुलडाणा : देऊळघाटसह सहा गावातील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपुष्टात यावी, यासाठी शासनाने सन २00९ मध्ये महत्वाकांक्षी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. परंतु केवळ निधी अभावी गेल्या दोन वर्षापासून या योजनेचे काम रखडले आहे. परिणामी या गावांना उन्हाच्या चटक्यासोबतच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट हे गाव गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या गावात पावसाळय़ातही पाणीटंचाई असते. उन्हातान्हात हंडाभर पाण्यासाठी महिलांना कोसोदुर पायपिट करावी लागत आहे. त्यामुळे देऊळघाटसह इतर गावांची पाणीटंचाई कायमस्वरुपी संपुष्टात आणावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर शासनाने १0 कोटी ७८ लाख रुपयाची धाड, बोरखेड, देऊळघाट, चांडोळ, चौथा, गिरडा व करडी या सहा गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. या महत्वाकांक्षी योजनेसाठी मासरुळ धरणातील १.0७ दलघमी साठा आरक्षीत करण्यात आला आहे. या योजनेला मंजूरात मिळताच या कामाचा ठेका लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नागपूर या कंपनीला देण्यात आला आहे. या योजनेच्या कामासाठी चार वष्रे कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये दोन वष्रे काम पुर्ण करण्यासाठी व दोन वष्रे देखभाल दुरूस्तीसाठी देण्यात आले होते. परंतु या कामाची निविदा २00९ मध्ये मंजूर करण्यात आल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. शिवाय मुळ योजनेत भाववाढ व पाईप देखभाल खर्च विचारात घेण्यात आला नाही. तसेच या योजनेसाठी रोड परवानगी चाज्रेस, जमीन संपादन, वसाहत, एक्सप्रेस फिडर आदी कामामुळे या योजनेच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी जास्तीचा निधी देण्यात यावा, असा सुधारीत प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला आहे. परंतु प्रस्ताव सादर होवून दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला असतानादेखील अद्याप शासनाने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. परिणामी उपरोक्त सहा गावातील पाईपलाईन, पाण्याची साठवण टाकी, पंप घराचे काम व जलशुध्दीकरण केंद्र निर्माण करण्यात आले नाही. तसेच देऊळघाट, चांडोळ, करडी व चौथा येथील पाण्याच्या टाकीचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. परिणामी योजना मंजूर होवूनही सहा गावातील नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. देऊळघाट सहा गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची गरज आहे.