शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले

By admin | Updated: May 29, 2014 00:50 IST

निधी अभावी गेल्या दोन वर्षापासून या योजनेचे काम रखडले आहे.

बुलडाणा : देऊळघाटसह सहा गावातील पाणीटंचाई कायमस्वरुपी संपुष्टात यावी, यासाठी शासनाने सन २00९ मध्ये महत्वाकांक्षी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. परंतु केवळ निधी अभावी गेल्या दोन वर्षापासून या योजनेचे काम रखडले आहे. परिणामी या गावांना उन्हाच्या चटक्यासोबतच पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. बुलडाणा तालुक्यातील देऊळघाट हे गाव गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करीत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी या गावात पावसाळय़ातही पाणीटंचाई असते. उन्हातान्हात हंडाभर पाण्यासाठी महिलांना कोसोदुर पायपिट करावी लागत आहे. त्यामुळे देऊळघाटसह इतर गावांची पाणीटंचाई कायमस्वरुपी संपुष्टात आणावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर शासनाने १0 कोटी ७८ लाख रुपयाची धाड, बोरखेड, देऊळघाट, चांडोळ, चौथा, गिरडा व करडी या सहा गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली आहे. या महत्वाकांक्षी योजनेसाठी मासरुळ धरणातील १.0७ दलघमी साठा आरक्षीत करण्यात आला आहे. या योजनेला मंजूरात मिळताच या कामाचा ठेका लक्ष्मी सिव्हील इंजिनिअरिंग सर्व्हिसेस नागपूर या कंपनीला देण्यात आला आहे. या योजनेच्या कामासाठी चार वष्रे कालावधी देण्यात आला होता. त्यामध्ये दोन वष्रे काम पुर्ण करण्यासाठी व दोन वष्रे देखभाल दुरूस्तीसाठी देण्यात आले होते. परंतु या कामाची निविदा २00९ मध्ये मंजूर करण्यात आल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. शिवाय मुळ योजनेत भाववाढ व पाईप देखभाल खर्च विचारात घेण्यात आला नाही. तसेच या योजनेसाठी रोड परवानगी चाज्रेस, जमीन संपादन, वसाहत, एक्सप्रेस फिडर आदी कामामुळे या योजनेच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे या योजनेसाठी जास्तीचा निधी देण्यात यावा, असा सुधारीत प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्यात आला आहे. परंतु प्रस्ताव सादर होवून दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला असतानादेखील अद्याप शासनाने या योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही. परिणामी उपरोक्त सहा गावातील पाईपलाईन, पाण्याची साठवण टाकी, पंप घराचे काम व जलशुध्दीकरण केंद्र निर्माण करण्यात आले नाही. तसेच देऊळघाट, चांडोळ, करडी व चौथा येथील पाण्याच्या टाकीचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. परिणामी योजना मंजूर होवूनही सहा गावातील नागरिकांना पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. देऊळघाट सहा गावे प्रादेशीक पाणी पुरवठा योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची गरज आहे.