शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याचा पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST

मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पावर मोठा कालवा आहे. या कालव्याद्वारे हजारो हेक्टर शेती सिंचन होते. मात्र, हा कालवा डिसेंबर ...

मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पावर मोठा कालवा आहे. या कालव्याद्वारे हजारो हेक्टर शेती सिंचन होते. मात्र, हा कालवा डिसेंबर महिन्यात फुटल्याने या कालव्याद्वारे पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत नाही. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेली गावे वरवंड, उटी, पार्डी, घाटनांद्रा, गोमेधर याठिकाणी पाणी पोहोचत नाही. जसे कालव्यात मोठी झाडे, गवत, झुडपे असल्याने हे पाणी पाहिजे त्या प्रमाणात जोराने वाहत नाही. यामुळे कालव्याला काही ठिकाणी पाझर लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. सध्या रब्बी हंगामात कालव्याचे पाणी न मिळाल्यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यांचे गहू, हरभरा पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले.

पेनटाकळी प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. कालव्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी रब्बी हंगामात सिंचनापासून वंचित राहत आहेत. यामुळे उन्हाळी हंगामाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नियोजनही कोलमडले आहे.

कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कालव्याच्या दुरवस्थेमुळे कालव्याला काही ठिकाणी पाझर फुटले आहेत. काही ठिकाणी विद्युत पंप लावून अतिरिक्त पाणी उपसा करण्यात येत आहे. यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास वेळ लागत आहे.

एस. बी. चौगुले, उपविभागीय अभियंता, पेनटाकळी प्रकल्प, मेहकर.