शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
3
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
4
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
5
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
6
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
7
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
10
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
11
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
12
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
13
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
14
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
15
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
16
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
17
कडक सॅल्यूट! ऐकता, बोलता, पाहता येत नाही; कठोर परिश्रमाने मिळवली सरकारी नोकरी
18
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
19
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट

कालव्याचा पाणीप्रश्न पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST

मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पावर मोठा कालवा आहे. या कालव्याद्वारे हजारो हेक्टर शेती सिंचन होते. मात्र, हा कालवा डिसेंबर ...

मेहकर तालुक्यातील पेन टाकळी प्रकल्पावर मोठा कालवा आहे. या कालव्याद्वारे हजारो हेक्टर शेती सिंचन होते. मात्र, हा कालवा डिसेंबर महिन्यात फुटल्याने या कालव्याद्वारे पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत नाही. त्यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेली गावे वरवंड, उटी, पार्डी, घाटनांद्रा, गोमेधर याठिकाणी पाणी पोहोचत नाही. जसे कालव्यात मोठी झाडे, गवत, झुडपे असल्याने हे पाणी पाहिजे त्या प्रमाणात जोराने वाहत नाही. यामुळे कालव्याला काही ठिकाणी पाझर लागल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे. सध्या रब्बी हंगामात कालव्याचे पाणी न मिळाल्यामुळे कालव्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यांचे गहू, हरभरा पिके सुकू लागली आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.

शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले.

पेनटाकळी प्रकल्प तुडुंब भरलेला आहे. कालव्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी रब्बी हंगामात सिंचनापासून वंचित राहत आहेत. यामुळे उन्हाळी हंगामाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नियोजनही कोलमडले आहे.

कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, कालव्याच्या दुरवस्थेमुळे कालव्याला काही ठिकाणी पाझर फुटले आहेत. काही ठिकाणी विद्युत पंप लावून अतिरिक्त पाणी उपसा करण्यात येत आहे. यामुळे शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचण्यास वेळ लागत आहे.

एस. बी. चौगुले, उपविभागीय अभियंता, पेनटाकळी प्रकल्प, मेहकर.