शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवरच नव्हे तर शेतकऱ्यांच्या कष्टावरही फिरलं पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST

तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ४८९६३ असून, खरीप हंगामात ४० हजार हेक्टरच्या वर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ११८१७, ...

तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ ४८९६३ असून, खरीप हंगामात ४० हजार हेक्टरच्या वर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ११८१७, कापूस १८२१८, मका ५१८ ,ज्वारी ७५०, मूग ८६८, उडीद ७२६, तूर २५४० हेक्टर पेरणी करण्यात आली आहे. पेरणीपासूनच वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण होते. तालुक्यात ७५० मि.मी. पाऊस पडतो. मात्र, सप्टेंबर महिन्यातही सरासरी पूर्ण करताना दिसत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे संत चोखा सागर प्रकल्पही भरला असून, १९ दरवाजे उघडण्यात आले. सर्वच नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. लहान-मोठे तलाव भरले. सतत होणाऱ्या पावसाने शेतामध्ये पाणी साचले असून, पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पिके कुजून नष्ट होत आहेत. अतिरिक्त पावसामुळे पिकावर मर रोग येत असून, बुरशी लागणे, पिकांची वाढ खुंटणे, पिके पिवळी पडून जळणे, असे प्रकार उद्भवत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षीदेखील पावसाने तोंडचा घास हिरावला होता. यावर्षी कोरोना संकट हाताला काम नाही तरीदेखील शेतकऱ्यांनी उसनवारी करत कर्ज काढून पेरणी केली. मात्र, निसर्गाने अवकृपा करून चांगली आलेली पिके धोक्यात आणली आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातुर दिसून येत आहेत.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करणे आवश्यक आहे.

सतत होणाऱ्या पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. कोरोना महामारी आपत्तीमुळे त्रस्त असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर दिवसेंदिवस संकट वाढते असून, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी, अशी मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी दिली.

पालकमंत्र्यांकडे मागणी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करू

तालुक्यात कधी दुष्काळी परिस्थिती, तर ओला दुष्काळ सतत डोके वर काढत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडून जाते. कोरोनामुळे अनेक लोक बरोजगार झाले. ते अनेक वर्षांनतंर शेतीकडे वळले. मात्र, पदरी निराशा दिसत असल्याने चिंताग्रस्त आहे. या नुकसानीबाबतीत आपण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बाजार समितीचे माजी सभापती नितीन शिंगणे यांनी सांगितले.