शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
4
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
5
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
6
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
7
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
8
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
9
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
10
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
11
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
12
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
13
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
14
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
15
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
16
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
17
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
18
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
19
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
20
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत

गावपुनर्वसनाच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:38 IST

गारखेडा गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्ष आणि गावकऱ्यांचे बुधवारी जलसमाधी आंदोलन सिंदखेडराजा : तालुक्यातील गारखेडा हे मूळ ...

गारखेडा गावाचे पुनर्वसन करण्याची मागणी

राष्ट्रीय समाज पक्ष आणि गावकऱ्यांचे बुधवारी जलसमाधी आंदोलन

सिंदखेडराजा : तालुक्यातील गारखेडा हे मूळ गाव धरणाच्या खाली वसलेले आहे. १९७२ मध्ये बांधलेले हे धरण फुटल्यास शंभर घरे असलेले हे गाव पाण्याखाली येण्याची भीती असल्याने येथील गावकऱ्यांनी गावाचे इतरत्र पुनर्वसन करण्याची मागणी लावून धरली आहे. दरम्यान, हा प्रश्न त्वरेने निकाली न काढल्यास ८ सप्टेंबर रोजी गावातीलच धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्ष युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष राम लवहकरे यानी ५ सप्टेंबर रोजी दिला आहे.

गारखेडा गावातच ही पत्रकार परिषद झाली. सिंदखेडराजापासून २० किमी अंतरावर हे गाव आहे. स्वतंत्र ग्रामपंचायत असलेल्या या गावात ग्रामपंचायत कार्यालय नाही हीच एक मोठी समस्या आहे. दरी, डोंगर अशी नैसर्गिक साधनं असलेल्या या गावात १९७२ मध्ये दोन डोंगरांच्या मध्ये माती धरण बांधले गेले. मात्र, नागरी सुविधांचा गावाला स्पर्श नसल्याने आजही येथे अनेक नागरी समस्या आहेत. दरम्यान, गाव खाली आणि धरण वरच्या बाजूला असल्याने आणि धरणाच्या बांधकामाला ५० वर्षे होत असल्याने गावकऱ्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गावाच्या पुनर्वसनाचा मुद्दा चर्चिला जात आहे. १५ वर्षांपासून गावाच्या पुनर्वसनाची मागणी आहे. याच काळात गावातील दोन वॉर्ड स्वतंत्र जागेत विभागले गेले. एक तांडा आणि एक वस्ती असे हे गाव असून, मूळ गारखेडा गाव आजही धरणाच्या किंबहुना नदीच्या काठावर आहे. याच मूळ गावाचे नदीच्या पलीकडे म्हणजे पूर्वेला असलेल्या शिरणेर शिवारात पुनर्वसन करण्याची मागणी आहे. पत्रकार परिषदेला रासपाचे जिल्हाध्यक्ष अमोल काकडे, शेख मतलब शेख अहमद, राधाकृष्ण इंगळे, सोपान इंगळे, मधुकर लवहकरे, रघुनाथ भिसे, जगणं भिसे, सुदाम राठोड, रामप्रसाद, ज्ञानेश्वर आटोळे उपस्थित होते. जलसमाधी आंदोलनासंदर्भात तहसीलदार सुनील सावंत यांनाही एक निवेदन देण्यात आलेले आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटणार : जानकर

गारखेडा गावाच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, कार्यकर्ते आपल्या हक्कांसाठी लढतात. त्यामुळे त्यांच्या प्रश्नांकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. गावाचे पुनर्वसन न झाल्यास कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील. त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. या संदर्भात आपण स्वत: मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.