शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

केंद्राकडून येणाऱ्या २३९ कोटींच्या निधीची जिगावला प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:35 IST

बुलडाणा : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिगाव प्रकल्पाचा बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत समावेश असून गेल्या दोन वर्षापासून ...

बुलडाणा : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिगाव प्रकल्पाचा बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत समावेश असून गेल्या दोन वर्षापासून या प्रकल्पासाठी आनुषंगिक योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळणारा २३९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधीच उपलब्ध झालेला नाही. गेल्या वर्षी जवळपास ९० टक्के भूसंपादनाची प्रकरणे व्यपगत होण्याची भीती पाहता थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावावा लागला होता. दरम्यान, बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या या प्रकल्पाला केद्र सरकारकडून मिळणारा २५ टक्के निधीही उपलब्ध होऊ शकलेला नाही. परिणामी २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला खो बसण्याची भीती व्यक्त होत आहे. बळिराजा संजीवनी योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी राज्याकडून ७५ टक्के तर केंद्र सरकाकडून २५ टक्के निधी मिळतो. त्यापैकी केंद्राच्या हिश्श्याचा दोन वर्षाचा निधी उपलब्ध झालेला नाही.

प्रकल्पाच्या बांधकामावर आतापर्यंत २,२३२ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. २०१७ पासून आजपर्यंत हा निधी खर्च झाला आहे. दरम्यान, यातील राज्याच्या वाट्याचा १,६७ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी तर केंद्राच्या वाट्याचा ५५८ कोटी १४ लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. मात्र केंद्र सरकाकडून अद्यापही २३९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणे बाकी आहे. २०१९-२० या वर्षात अपेक्षित असलेला १०६ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीपैकी केंद्राकडून प्रत्यक्षात ३९ कोटी ५३ लाख रुपयेच प्रकल्पासाठी देण्यात आले होते. २०२० मध्ये कोरोनाची साथ महत्तम पातळीवर असल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊन व वित्त विभागाच्या काही निर्णयांमुळे प्रकल्पाला अपेक्षित निधी मिळू शकला नाही. त्यात केंद्राकडून अपेक्षित असलेला १७२ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षाचा विचार करता २०१९-२० या वर्षाचा रखडलेला ६६ कोटी ८८ लाख आणि २०२०-२१ या वर्षाचा १७२ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. दरम्यान, जिगाव प्रकल्पासाठी १३ हजार ८७४ कोटी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ४,६०० कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत प्रकल्पावर झालेला आहे.

जिगाव प्रकल्पाच्या कामाची स्थिती

१) मातीधरण काम- ९० टक्के

२) सांडवा- ८५ टक्के काम

३) वक्रद्वार-९० टक्के काम

४) उपसा सिंचन योजना- ७५ टक्के

५) बाधित पुलांचे काम - ८० टक्के

६) पुनर्वसनाची कामे- २५ टक्के

नियामक मंडळाच्या मान्यतेची गरज

प्रकल्पातंर्गत अतिक्रमित असलेल्या सुमारे २७०० घरांच्या मूल्यांकनासाठी नियामक मंडळाची मान्यता गरजेची असून मार्च २०२४ पर्यंत ४७ गावांच्या पुनर्वसनासाठी गावठाणांचे भूसंपादन, प्लॉटवाटप, प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर करण्यासोबतच प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांच्या घरांची बाधकामे होणे गरजेचे आहे.