शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राकडून येणाऱ्या २३९ कोटींच्या निधीची जिगावला प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:35 IST

बुलडाणा : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिगाव प्रकल्पाचा बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत समावेश असून गेल्या दोन वर्षापासून ...

बुलडाणा : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्याच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या जिगाव प्रकल्पाचा बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत समावेश असून गेल्या दोन वर्षापासून या प्रकल्पासाठी आनुषंगिक योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मिळणारा २३९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधीच उपलब्ध झालेला नाही. गेल्या वर्षी जवळपास ९० टक्के भूसंपादनाची प्रकरणे व्यपगत होण्याची भीती पाहता थेट मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन त्यासंदर्भातील प्रश्न मार्गी लावावा लागला होता. दरम्यान, बळीराजा संजीवनी योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या या प्रकल्पाला केद्र सरकारकडून मिळणारा २५ टक्के निधीही उपलब्ध होऊ शकलेला नाही. परिणामी २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाला खो बसण्याची भीती व्यक्त होत आहे. बळिराजा संजीवनी योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी राज्याकडून ७५ टक्के तर केंद्र सरकाकडून २५ टक्के निधी मिळतो. त्यापैकी केंद्राच्या हिश्श्याचा दोन वर्षाचा निधी उपलब्ध झालेला नाही.

प्रकल्पाच्या बांधकामावर आतापर्यंत २,२३२ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. २०१७ पासून आजपर्यंत हा निधी खर्च झाला आहे. दरम्यान, यातील राज्याच्या वाट्याचा १,६७ कोटी ४१ लाख रुपयांचा निधी तर केंद्राच्या वाट्याचा ५५८ कोटी १४ लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. मात्र केंद्र सरकाकडून अद्यापही २३९ कोटी ५८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध होणे बाकी आहे. २०१९-२० या वर्षात अपेक्षित असलेला १०६ कोटी ४१ लाख रुपयांच्या निधीपैकी केंद्राकडून प्रत्यक्षात ३९ कोटी ५३ लाख रुपयेच प्रकल्पासाठी देण्यात आले होते. २०२० मध्ये कोरोनाची साथ महत्तम पातळीवर असल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊन व वित्त विभागाच्या काही निर्णयांमुळे प्रकल्पाला अपेक्षित निधी मिळू शकला नाही. त्यात केंद्राकडून अपेक्षित असलेला १७२ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीचाही समावेश आहे. गेल्या दोन वर्षाचा विचार करता २०१९-२० या वर्षाचा रखडलेला ६६ कोटी ८८ लाख आणि २०२०-२१ या वर्षाचा १७२ कोटी ७० लाख रुपयांच्या निधीचा समावेश आहे. दरम्यान, जिगाव प्रकल्पासाठी १३ हजार ८७४ कोटी ६० लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यापैकी ४,६०० कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत प्रकल्पावर झालेला आहे.

जिगाव प्रकल्पाच्या कामाची स्थिती

१) मातीधरण काम- ९० टक्के

२) सांडवा- ८५ टक्के काम

३) वक्रद्वार-९० टक्के काम

४) उपसा सिंचन योजना- ७५ टक्के

५) बाधित पुलांचे काम - ८० टक्के

६) पुनर्वसनाची कामे- २५ टक्के

नियामक मंडळाच्या मान्यतेची गरज

प्रकल्पातंर्गत अतिक्रमित असलेल्या सुमारे २७०० घरांच्या मूल्यांकनासाठी नियामक मंडळाची मान्यता गरजेची असून मार्च २०२४ पर्यंत ४७ गावांच्या पुनर्वसनासाठी गावठाणांचे भूसंपादन, प्लॉटवाटप, प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर करण्यासोबतच प्रत्यक्ष प्रकल्पग्रस्तांच्या घरांची बाधकामे होणे गरजेचे आहे.