शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

निराधारांना पेन्शनची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:33 IST

देऊळगाव मही : शासनाच्या विविध योजना निराधारांसाठी असल्या तरी सध्या कोरोनाच्या काळात अधीच हाल झालेल्या निराधार व्यक्तींना गेल्या दोन ...

देऊळगाव मही : शासनाच्या विविध योजना निराधारांसाठी असल्या तरी सध्या कोरोनाच्या काळात अधीच हाल झालेल्या निराधार व्यक्तींना गेल्या दोन महिन्यापासून या विशेष योजनांचे पैसेच अद्याप न मिळाल्याने त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शासनाकडून अजूनही पेन्शन न आल्याने या निराधारांना पोस्ट कार्यालय आणि बँकेत चकरा माराव्या लागत आहेत.

ग्रामीण भागातील निराधार लाभार्थी पोस्टमनची दरदिवशी आतूरतेने वाट पाहत आहेत.

विशेष योजनांतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्फे मासिक लाभांच्या विविध योजना राबविण्यात येतात. त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना दोन राज्य सरकारच्या तर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटूंब लाभ योजना सरकार तर्फे राबविण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थ्यांला दरमहा एक हजार रुपये अनुदान देण्यात येते. कोरोना काळात शासनाच्या विविध योजनांचे पैसे रखडले आहेत. त्याचा फटका निराधार लोकांसाठी असलेल्या या विशेष योजनांच्या लाभार्थ्यांनाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. शासनाकडून ही पेन्शन प्रत्येक महिन्याला वेळेवर मिळत नसल्याने या लोकांचे हाल होत आहेत. यापैकी बहुतेक निराधार व्यक्ती ७० ते ८० वर्षांचे असल्याने काही वृद्ध महिलांना भीक मागून गुजराण करण्याची वेळ आली आहे. खेडोपाडी पोस्टाच्या शाखा असल्याने या लभर्थ्यांना थेट खात्यावर पैसे जमा होतात. ज्यांना पोस्टात जाऊन पैसे काढणे शक्य होत नाही. अशांना पोस्टाच्या विशेष सुविधामुळे पोस्टमन त्या गावात लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांच्या आधार लिंक असलेल्या मोबाईलद्वारे त्यांना पैसे काढून देतात. मात्र सध्या या निराधारांची जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांची पेन्शन अजूनही ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत पोहचलेली नाही. सध्या होळी सण जवळ आलेला आहे. त्यामुळे ही पेन्शन या उत्सवापूर्वी शासन देईल, अशी आशा त्यांना वाटत आहे. त्यामुळे पोस्टातून पैसे आणणाऱ्या पोस्टमनची दरदिवशी वाट वघत आहेत. मात्र त्यांच्या पदरी निराशाच येत आहेत. ही पेन्शन कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहेत.

प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रशासन दुर्लक्षामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. कोरोनाच्या काळात मेटाकुटीला आलेल्यांना आता पेन्शन धारकांना पेन्शनसाठी झगडावे लागत आहेत.