शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव राजात जाेरदार पावसाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:23 IST

गजानन तिडके देऊळगाव राजा : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्केच पाऊस झाला असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे़ काही ...

गजानन तिडके

देऊळगाव राजा : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्केच पाऊस झाला असून शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे़ काही भागात पावसाअभावी पेरण्या खाेळंबल्या आहेत़ यावर्षी शेतकऱ्यांचा कल साेयाबीन पिकाकडे असल्याचे चित्र आहे़

देऊळगाव राजा तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ४७ हजार ६७५ हेक्‍टर एवढे असून पेरणीयोग्य क्षेत्र ३५ हजार ९४१ हेक्टर आहे़ याच क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली हाेती़ तसेच रब्बीची पेरणी १२ हजार ३९० हेक्टरवर करण्यात आली होती़ यामध्ये कडधान्य पिकामध्ये उडीद,मूग,तूर, एकूण पाच हजार ४७ हेक्‍टर होते़ तृणधान्यामध्ये बाजरी, मका ,ज्वारी याचे क्षेत्रफळ ६०३ हेक्टर होते़ तालुक्यामध्ये सर्वात जास्त कापूस १८ हजार २२८ हेक्टरवर लागवड करण्यात आली होती़ गळीत धान्यामध्ये भुईमूग, सोयाबीन १२ हजार ५६५ हेक्टरवर पेरणी करण्यात आली होती़ विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या देऊळगावराजा तालुक्याला कापसाची पंढरी म्हणून समजली जाते़ त्यामुळे येथे १० ते १२ जिनिंग फॅक्टरी आहेत़ परंतु मागील वर्षी हाती आलेल्या कापूस पिकावर बोंड अळी आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाचे उत्पादन घटले़ औषध फवारणी आणि खत तसेच इतर खर्चही निघाला नाही़ तसेच मूग आणि इतर पिकांचे काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले़ गतवर्षीचा अनुभव पाहता कपाशीच्या पेऱ्यात घट हाेण्याची शक्यता आहे़

४७ मिमी पावसाची नाेंद

रोहिणी व मृग नक्षत्रात पावसाने उघड दिल्यामुळे बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागले आहेत़ मागील वर्षी या महिन्यात आजच्या तारखेपर्यंत ८१ .४० मि. मी. पाऊस झाला होता़ परंतु यावर्षी आजपर्यंत ४७ मिलिमीटर पाऊस झालेला आहे़ पावसाचे प्रमाण पाहता काही भागात शेतकऱ्यांनी कपाशी लागवड सुरू केली आहे़

मार्गदर्शनाचा अभाव

ग्रामीण भागात शेतकऱ्यांना बाजारात येणाऱ्या नवनवीन बियाणे तसेच खत यांच्या प्रमाणासंदर्भात तसेच बियाणे लागवडीसंदर्भात कृषी विभागामार्फत मार्गदर्शन होणे गरजेचे आहे़ प्रत्येक गावाला कृषी सहायक, कृषीसेवक यांची तालुका कृषी कार्यालयाकडून नेमणूक केलेली असते़ परंतु बहुतांश गावामध्ये फिरकत सुद्धा नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही आणि काही वेळेस चुकीच्या पद्धतीने पिकांची लागवड तसेच पेरणी केली जाते आणि यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होते़

काेट

जमिनीमध्ये पाच ते सहा इंच ओल गेल्याशिवाय शेतकऱ्यांनी पीक पेरणीला तसेच लागवडीला सुरुवात करू नये़ शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदी करताना दुकानदाराकडून सीलबंद पाकिटासह पक्के बिल घ्यावे़ तसेच कृषी विभागाच्या शिफारशीप्रमाणे खताचा वापर करावा़ फवारणी संदर्भात कृषी विभागाचा सल्ला घ्यावा़

कृणाल चिंचोले, कृषी अधिकारी,पंचायत समिती देऊळगाव राजा