शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

दुष्काळाच्या घोषणोची प्रतीक्षा

By admin | Updated: August 19, 2014 23:19 IST

टंचाई जाहीर : तीन तालुके वगळले

बुलडाणा : जिल्हय़ात सरासरी ५0 टक्कांपेक्षा कमी पाऊस गृहीत धरतांना प्रशासानाने १३ ऑगस्टची आकडेवारी गृहीत धरली आहे. या प्रकारामुळे टंचाई जाहिर करताना जिल्ह्यातील बुलडाणा, जळगाव जामोद व संग्रामपूर हे तीन तालुके वगळण्यात आले आहे. वास्तविक संपूर्ण जिल्हाभरात पावसाचे प्रमाण अनियमीत असल्याने सरासरीच्या ५0 टक्के वर पडलेला पाऊसही पिके वाचविण्यासाठी पुरेसा नाही. पावसाने तब्बल महिनाभरापासुन ओढ दिली असल्याने टंचाई नकोच आता दूष्काळच जाहिर करण्याची गरज व्यक्त होत आहे.शेतकरी आभाळाकडे डोळे लाऊन बसले आहेत. गेल्या हंगामापासूनच शेतकर्‍यांना निसर्गाच्या लहरीपणाचा जबर फटका सोसावा लागतोय. यंदा त्यात भर पडली आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकर्‍यांसमोर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. शासनाने दहा तालुक्यात टंचाई घोषीत केली असली तरी संपूर्ण जिल्हाच दूष्काळाच्या उंबरठयावर आहे. उडिद, मूग पिकाचा कालावधी निघून गेल्याने या पिकांचा पेरा कमी झाला आहे. त्यामुळे आता सोयाबीन व कापूस पिकांवरच भिस्त असली तरी पावसाच्या दडीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीनला फटकासोयाबीन हे तेलबिया वर्गातील पीक असल्यामुळे भरपूर पावसाची आवश्यकता असते. यावेळी मुळातच पेरणी उशीरा झाल्याने आता कुठे पिके वर आली आहेत त्यामुळे पाऊस गरजेचा आहे. मात्र,पावसाने दडी मारली तर उत्पादन घटते. जिल्हय़ात सोयाबीन, कपाशी ही प्रमुख पिके असून सोयाबीनचा पेरा सर्वाधिक आहे. केवळ ४२ % पिक विमाजिल्ह्यात पावसाअभावी उशीरा झालेल्या पेरण्यांचा फटका पिक विमा उतरविण्यालाही बसला आहे. त्यातच सोयाबीनचा समावेश नसल्याने केवळ ४२ टक्के म्हणजेच १ लाख ७५ हजार ४१६ खातेदारांनीच पिक विमा उतरविला आहे.यामुळे १ लाख २१ हजार ४५२ हेक्टर क्षेत्र संरक्षीत झाले आहे.कोरडवाहू शेतकरी विवंचनेतजिल्ह्यात पावसाअभावी जून महिना कोरडा गेला. जुलै महिन्यात पडलेला तुरळक पाऊस आणि तुरळक सरी वगळता तब्बल २१ दिवसांपासून वरुणराजाने हजेरी न लावल्याने जिल्ह्यातील कोरडवाहू शेती पाण्याअभावी पूर्णत: धोक्यात आली आहे. जिल्हय़ात कोरडवाहू शेतीचे क्षेत्र सर्वाधिक असल्यामुळे सिंचनाच्या सोईसुविधाही अल्प प्रमाणात आहे. अशात ओलीताच्या शेतीला पाणी देण्यासाठी भारनियमनाचा फटका बसत आहे.