शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

प्रतीक्षा यादीतील शिक्षकांना ठेंगा!

By admin | Updated: July 13, 2016 02:11 IST

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेच्या दुस-या टप्प्यात अन्याय झाल्याचा शिक्षकांचा आरोप.

हर्षनंदन वाघ / बुलडाणाजिल्ह्यातील परंतु बाहेर जिल्ह्यात नोकरीवर असलेल्या १३५ शिक्षकांची २१ जून रोजी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये पदस्थापना केल्यानंतर दुसर्‍या टप्प्यात ५ जुलै रोजी १८८ आंतरजिल्हा शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार होत्या. मात्र दुसर्‍या टप्प्यात आंतरजिल्हा शिक्षकांची पदस्थापना न करता सिईटीच्या प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांवर अन्याय झाला आहे.बुलडाणा जिल्ह्यात मागील काही वर्षापासून आंतरजिल्हा शिक्षकांच्या पदस्थापन प्रक्रिया राबविण्याचा प्रश्न प्रलंबित होता. याबाबत प्रतिक्षेत असलेल्या जवळपास ६00 शिक्षक उमेदवारांनी पदस्थापना करण्याबाबत अर्ज दिले होते. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने आंतरजिल्हा बदलीला हिरवी झेंडी दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २१ जून रोजी शिक्षकांच्या पदस्थापनेची प्रक्रीया सुरू केली. यावेळी १३५ शिक्षकांना जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळेत पदस्थापना दिली. बुलडाणा जिल्ह्यात विविध शाळांमध्ये शिक्षकांची ३२३ पदे ही रिक्त होती. त्यापैकी १३५ शिक्षकांना पदस्थापना मिळाल्यानंतर उर्वरित १८८ शिक्षकांची पदस्थापना ५ जुलै रोजी दुसर्‍या टप्प्यात करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन शिक्षण विभागाने दिले होते. मात्र ५ जुलै रोजी आंतरजिल्हा बदलीसाठी प्रतिक्षेत असलेल्या शिक्षकांना डावलून २0१0 मध्ये सिईटीच्या प्रतिक्षा यादीत असलेल्या उमदेवारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीसाठी दुसर्‍या टप्प्याच्या प्रतिक्षेत असलेले शिक्षकांमध्ये तिव्र रोष व्यक्त होत आहे.