शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गॅस महागल्याने इंधन जमा करण्यासाठी ग्रामस्थांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:34 IST

किनगाव जट्टू : शासनाने मोठा गाजावाजा करून पर्यावरणयुक्त गाव संकल्पना चूलमुक्त धूरमुक्त अभियान राबवून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सबसिडीवर स्वयंपाकाचे गॅस ...

किनगाव जट्टू : शासनाने मोठा गाजावाजा करून पर्यावरणयुक्त गाव संकल्पना चूलमुक्त धूरमुक्त अभियान राबवून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना सबसिडीवर स्वयंपाकाचे गॅस दिले; परंतु गत चार महिन्यांत गॅसची किंमत झपाट्याने वाढत असल्याने ग्रामीण भागातील जनतेला मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून परवडत नसल्याने पुन्हा स्वयंपाकाकरिता चुलीचा आधार घेण्यात येत आहे. त्यासाठी स्वयंपाक करण्याकरिता सरपण गाेळा करण्यासाठी उन्हातानात जंगलात धाव घेण्याची वेळ आली आहे़

शासनाने जंगलतोड होऊ नये व महिलांना सुद्धा स्वयंपाक करताना धुराचा त्रास होऊ नये या उदात्त हेतूने पर्यावरणयुक्त गाव संकल्पना चूलमुक्त धूरमुक्त अभियान राबून गरिबांना सबसिडीवर केवळ १०० रुपयांत गॅस सिलिंडर दिले होते. त्यामुळे गरिबांनी सुद्धा प्रतिसाद देऊन गॅस सिलिंडरचा वापर पसंत केला होता; परंतु या चार- पाच महिन्यांत गॅसचे दर वाढल्याने गरिबांना सिलिंडर वापरणे कठीण झाले आहे. त्यामुळे गोरगरीब मजुरांनी शेतातून लाकूड फाटा जमा करून चूल पेटवावी लागत आहे. ई क्लास जमिनी नागरिकांनी वहिती केल्यामुळे गुरांना चराईकरिता जंगल नसल्याने दिवसेंदिवस गुरेढोरे यांची संख्या घटली आहे. झाडेसुद्धा कटाई करण्याकरिता शासनाची मनाई असल्याने नागरिक चक्क कपाशी पिकाची उलंगवाडी झाल्याने स्वयंपाक करण्याकरिता वाळलेले पऱ्हाटी व तुरीची धस्कटे जमा करीत असल्याचे चित्र परिसरात आहे़

मजुरी करावी की सरपण गाेळा करावे

ग्रामीण भागात सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. दुसरीकडे अनेक महिलांना सरपण गाेळा करावे की सरपण गाेळा करावे, असा प्रश्न पडला आहे. अगोदरच किराणा मालासह इतर जीवनावश्यक वस्तूचे भाव गगनाला भिडले असल्याने आर्थिक बाजू कोलमडली आहे. शेतातील कपाशी गाडी-बैलांनी घरी आणून बारा महिने पुरेल या बेताने गंजी करून ठेवल्या जात आहे. कोरोना संसर्ग आजाराने सुद्धा कहर केल्याने नागरिक हतबल झाले आहेत.